शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
5
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
6
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
7
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
8
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
9
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
10
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
11
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
12
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
13
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
14
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
15
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
16
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
17
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
18
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
19
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
20
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 

20 हजार हेक्टरवरील पिकांची नासाडी; 369 घरांना क्षती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 05:00 IST

जिल्ह्यातील १४ पैकी सहा तालुक्यात शेतीचे नुकसान झाले. चांदूर बाजार वगळता इतर सर्व तालुक्यात घरांची पडझड झाली. जिल्हा प्रशासनाच्या प्राथमिक अहवालानुसार २० हजार हेक्टर शेती खरडून गेली, तर ३६९ घरांची पडझड झाली. यापैकी नऊ घरे पूर्णत: पडली असून ३६० घरांचे अंशत: नुकसान झाले आहे. शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून, अतिवृष्टीने शेतात जाण्यासाठी मार्गही गवसत नाही, असे चित्र आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : पाच दिवसातील जोरदार पावसाने जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात घरांची पडझड झाली. सोयाबीन, कापूस, तूर, ज्वारी, केळी, संत्रा आदी प्रमुख पिके वाहून गेल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. जिल्ह्यातील १४ पैकी सहा तालुक्यात शेतीचे नुकसान झाले. चांदूर बाजार वगळता इतर सर्व तालुक्यात घरांची पडझड झाली. जिल्हा प्रशासनाच्या प्राथमिक अहवालानुसार २० हजार हेक्टर शेती खरडून गेली, तर ३६९ घरांची पडझड झाली. यापैकी नऊ घरे पूर्णत: पडली असून ३६० घरांचे अंशत: नुकसान झाले आहे. शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून, अतिवृष्टीने शेतात जाण्यासाठी मार्गही गवसत नाही, असे चित्र आहे. दुसरीकडे विमा कंपन्यांनी भरपाईसाठी ७२ तासांच्या आत पंचनामे सादर करण्याचे फर्मान जारी केल्याने विमा काढूनही शेतकरी विम्यापासून वंचित राहतील.

सहा तालुक्यांना फटकाशेतीचे सर्वाधिक नुकसान दर्यापूर तालुक्यात झाले. या तालुक्यातील ५५५ हेक्टरमधील पीक बाधित झाले. त्याखालोखाल १२० हेक्टर शेती पिके धामणगाव रेल्वे तालुक्यात खराब झाली असून, नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील ९२, वरूड ७८, मोर्शी २० आणि अंजनगाव सुर्जी तालुक्यातील १५ हेक्टरमधील शेती पिके खराब झालीत. अशाप्रकारे जिल्ह्याच्या सहा तालुक्यातील २० हजार हेक्टरमधील पिके खराब झाली.

१२१ गावांमध्ये कहरपाच दिवसाच्या संततधार पावसाने जिल्ह्यातील १२१ गावांमध्ये कहर केला. धामणगाव रेल्वे, भातकुली आणि तिवसा तालुक्यातील अनुक्रमे २७, २३ आणि २२ गावांमध्ये पावसाने अक्षरश: थैमान घातले. त्यामुळे अनेक महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद करण्यात आली. यामुळे ३६९ घरांची पडझड झाली. यापैकी अमरावती व नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील प्रत्येकी तीन, वरूड, दर्यापूर व अंजनगाव सुर्जी तालुक्यातील प्रत्येकी एक अशाप्रकारे नऊ घरे पूर्णत: कोलमडली. ३६० घरांना अंशत: फटका बसला आहे.

अंशत: फटका बसलेले हे आहेत तालुकेअंशत: फटका बसलेल्यांमध्ये सर्वाधिक ८७ घरे तिवसा तालुक्यातील आहेत. भातकुली तालुक्यात ७६, नांदगाव खंडेश्वर तालुक्यात ५१, अमरावती तालुक्यात ४९, तर दर्यापूर तालुक्यातील ३३ गावांचा समावेश आहे. दोन-तीन दिवसांतील पावसामुळे जिल्ह्यात एक व्यक्ती वाहून गेला. मृत व्यक्ती अंजनगाव सुर्जी तालुक्यातील आहे.

 

टॅग्स :floodपूरagricultureशेती