शहरं
Join us  
Trending Stories
1
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
2
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
3
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
4
दिल्ली ब्लास्ट प्रकरण : आता पठानकोटमधून आणखी एका डॉक्टरला अटक, अल-फलाह विद्यापीठात केली होती नोकरी
5
IPL 2026 : अय्यरसह मसल पॉवर रसेल OUT! मिनी लिलावासाठी शाहरुखच्या KKR च्या पर्समध्ये सर्वाधिक पैसा
6
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
7
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
8
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
9
जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात?
10
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
11
चुकूनही करू नका 'हे' काम, क्षणार्धात तुमचा मोबाईल फोन होऊ शकतो हॅक! गुगलने काय इशारा दिला?
12
नोकरी सोडून आयपीएस अधिकारी उतरले बिहार निवडणुकीच्या मैदानात; मराठमोळ्या लांडेंना किती मिळाली मते?
13
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
14
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
15
दिल्ली स्फोटापूर्वी उमर घाबरला होता, नवीन सीसीटीव्हीमध्ये खुलासा, दोन्ही फोन कुठे लपवले?
16
Ravindra Jadeja : जड्डूनं केली विक्रमांची 'बरसात'! WTC मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Travel : नवीन वर्ष परदेशात सेलिब्रेट करायचा विचार करताय? 'या' देशांमध्ये होऊ शकते खिशाला परवडणारी ट्रीप!
18
'भाजपाला फायदा करून देण्याची सुपारी घेतलीय का?'; काँग्रेसच्या स्वबळाच्या निर्णयावर शरद पवार गट नाराज
19
कुटुंबासोबतचे संबंधच तोडले, लालू प्रसाद यादवांच्या मुलीने आरोप केलेले रझीम कोण, राजदमध्ये काय घडलं?
20
अल फलाह युनिव्हर्सिटीवर क्राईम ब्रांचचा बडगा, UGC च्या तक्रारीवरून २ FIR दाखल
Daily Top 2Weekly Top 5

‘देशी’ला मिळणार संत्रा, मौसंबी, निंबूचा स्वाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2018 23:34 IST

अवैध दारू विक्री रोखण्यासाठी आता देशी दारूचा रंग बदलविण्याची तयारी राज्य उत्पादन शुल्क विभागाने चालविली आहे. यापुढे ‘देशी’ संत्रा, मौसंबी, निंबू, कलिंगड आदी फळांच्या आस्वादात निर्मिती केली जाणार असून, मद्य निर्मात्यांनी त्याअनुषंगाने अबकारी खात्याकडे प्रस्ताव सादर केला आहे.

ठळक मुद्देविविध रंगात उपलब्ध : अबकारी विभागाकडे मद्य निर्मात्यांचे प्रस्ताव

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : अवैध दारू विक्री रोखण्यासाठी आता देशी दारूचा रंग बदलविण्याची तयारी राज्य उत्पादन शुल्क विभागाने चालविली आहे. यापुढे ‘देशी’ संत्रा, मौसंबी, निंबू, कलिंगड आदी फळांच्या आस्वादात निर्मिती केली जाणार असून, मद्य निर्मात्यांनी त्याअनुषंगाने अबकारी खात्याकडे प्रस्ताव सादर केला आहे.शासन तिजोरीत महसूल विभागानंतर अबकारी विभाग उत्पन्न जमा करणारा विभाग, अशी नोंद आहे. हजारो कोटींची रक्कम मद्य निर्मिती, विक्री, हॉटेल, परमीट, बार रूम परवाना शुल्कातून अबकारी विभाग शासनाकडे जमा करते. मात्र, राज्य उत्पादन शुल्क विभागाला अवैध दारू विक्री, उत्पादन रोखणे मोठे ‘चॅलेंजिंग’ आहे. राज्याचे अबकारी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी दी डिस्टिलर्स असोसिएशन आॅफ महाराष्ट्र या संघटनेने देशी दारू विविध स्वादमध्ये निर्मिती करण्याबाबतचा प्रस्ताव सादर केला आहे. देशी दारू अन्य दारुच्या तुलनेत स्वस्त असल्याने मद्यपींची ‘देशी’ला अधिक मागणी आहे. तसेही अबकारी खात्याच्या नोंदी देशी दारू विक्रीचा सर्वाधिक खप आहे. यापुढे देशी दारू बंद बाटलीतच दिली जाणार आहे. देशी दारू सध्या पांढऱ्या रंगात मिळत असून, मद्यविक्रेते संघटनांनी यात बदल करण्याची मागणी केली आहे. देशी दारू संत्रा, मौसंबी, निंबू, कलिंगड आदी फळांचे स्वाद असलेल्या स्वरूपात निर्मिती केल्यास तिला मागणी वाढेल, असे मद्यनिर्मात्यांचे म्हणणे आहे. देशी विविध स्वादमध्ये मिळाल्यास अवैध दारूविक्री रोखणे सुकर होईल, असा प्रस्ताव शासनाकडे सादर केला आहे. सार्वजनिक जागेत मद्य प्राशन करण्यावरही नियंत्रण येणार आहे. सीएल-३ ही देशी दारू दुकानातून खुल्या विक्रीस उपलब्ध व्हायची; त्यामुळे खुले जागेवर सेवनाचे प्रकार वाढले. मात्र आता पॅकबंद देशी दारू उपलब्ध होणार आहे. सीएल -३ व एफएल- २ ही दुकाने सकाळी ८ ते रात्री १० पर्यंत सुरू ठेवण्याचा प्रस्ताव असून, यावर लवकरच तोडगा निघेल.अवैध दारू विक्री रोखण्यासाठी ग्रामरक्षक दलगावातील अवैध दारू विक्री, वाहतूक रोखण्यासाठी सरपंचाकडे महत्त्वाची जबाबदारी आहे. त्याकरिता सरपंचांना ग्रामरक्षक दलाची मदत घेता येणार आहे. गावात दारूबंदीचे पाऊल उचलायचे असल्यास ग्रामरक्षक दलाची स्थापना करणे आवश्यक आहे. पोलीस, महसूल विभागाचे सहकार्य अपेक्षित आहे. गाव, खेड्यांत ग्रामरक्षक दल दारूबंदीचा उठाव करतील, असे शासनाचे नवे धोरण आहे.देशी दारू विविध फळांच्या स्वादमध्ये निर्मित करण्याचा प्रस्ताव शासनस्तावर आहे. मद्य निर्मात्यांची तशी मागणी असून, याबाबत शासनाने निर्णय घेतल्यानंतर कार्यवाही होईल.- प्रमोद सोनोने,अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, अमरावती