लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : ‘सारे बोलो एकसाथ, दुष्काळाशी दोन हात’ अशा घोषणा देत वरुड तालुक्यातील माणिकपूर व झटांगझिरीच्या ग्रामस्थांनी जल संधारणातून दुष्काळ संपविण्याचा निर्धार केला. जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांच्यासह अनेक मान्यवरांनी बुधवारी श्रमदान करून गावकऱ्यांचा उत्साह वाढवला.पाणी फाऊंडेशनच्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत सहभागी माणिकपूरमध्ये गत पंधरवड्यात सलग समतल चर, माती बांध, दगडी अनगळ बांध आदी जलसंधारणाची कामे ग्रामस्थांनी श्रमदानातून सुरू केली आहेत. काही कामे पूर्णही झालीत. भारतीय जैन संघटनेच्या सहकार्याने पाझर तलावातील गाळ काढणे व इतर कामांसाठी यंत्र पुरविण्यात आले.जिल्हाधिकारी अभिजित बांगर हे बुधवारी पहाटेच सहकाºयांसह माणिकपूर येथे काम सुरू असलेल्या ठिकाणी जाऊन पोहोचले. त्यांनी स्वत: कुदळ व फावडे घेऊन सर्वांसह चर खणण्याच्या व दगड माती उचलून श्रमदान केले. त्यामुळे ग्रामस्थ व कार्यकर्त्यांत उत्साह संचारला. उपविभागीय अधिकारी योगेश कुंभेजकर, रोहयो उपजिल्हाधिकारी रमेश काळे, तहसीलदार आशिष बिजवल व विविध अधिकारी-कर्मचाऱ्यांनीही श्रमदान केले. जलसंधारणाच्या कामातून माणिकपूर गावातील जलस्त्रोतांचे पुनर्भरण होऊन एक कोटी लाख लीटरहून अधिक पाणी उपलब्ध होणार आहे. पाझर तलावातील गाळ काढल्यामुळे तेथेही अधिक पाणी साठवण होण्यास मदत होईल. झटांगझिरी येथील कामातून डोंगरावरील माती धरणात वाहून जाणे थांबेल व भूजल पातळी वाढेल. गावकऱ्यांनी जलसंधारणातून गावाच्या कायापालटाचे उद्दिष्ट समोर ठेवून श्रमदान करावे व प्रशासनानेही अधिक लोकसहभाग मिळवून कामे पूर्ण करावी, असे जिल्हाधिकाºयांनी सांगितले.भारतीय जैन संघटनेचाही सहभाग‘जल है तो कल है’ अशा घोषणा ज्ञानेश्वरी शिरसाम या चिमुकल्या बालिकेसह सर्व आबालवृद्ध देत होते. झटांगझिरी गावातही समतल सलग चर, अनगड दगडी बांध आदी कामांमध्ये जिल्हाधिकारी व अधिकारी-कर्मचाऱ्यांनी श्रमदान केले. दगड वाहून नेण्याच्या कामासाठी मानवी साखळीही उभारण्यात आली होती. यामध्ये सरपंच वंदना गुर्जर, भारतीय जैन संघटनेचे सुनील जैन, पानी फाऊंडेशनचे जिल्हा समन्वयक अतुल काळे, तालुका समन्वयक उज्ज्वल कराळे, हरीश खासबागे, चौधरी यासह गावकºयांनी श्रमदानात सहभाग घेतला.
ग्रामस्थांचा निर्धार,‘सारे बोलोे एकसाथ, दुष्काळाशी दोन हात’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2018 01:26 IST
‘सारे बोलो एकसाथ, दुष्काळाशी दोन हात’ अशा घोषणा देत वरुड तालुक्यातील माणिकपूर व झटांगझिरीच्या ग्रामस्थांनी जल संधारणातून दुष्काळ संपविण्याचा निर्धार केला. जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांच्यासह अनेक मान्यवरांनी बुधवारी श्रमदान करून गावकऱ्यांचा उत्साह वाढवला.
ग्रामस्थांचा निर्धार,‘सारे बोलोे एकसाथ, दुष्काळाशी दोन हात’
ठळक मुद्देवॉटर कप स्पर्धा : जिल्हाधिकाऱ्यांच्या श्रमदानातील सहभागाने वाढला नागरिकांचा उत्साह