शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

तलाईतील खुली जागा सरकारजमा करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:14 IST

फोटो - धारणी १५ आर नागरिकांची मागणी, सर्व्हे नंबर १३२ मधील जागा पडून, गरीब अतिक्रमणधारकांना पट्टे केव्हा मिळणार? श्यामकांत ...

फोटो - धारणी १५ आर

नागरिकांची मागणी, सर्व्हे नंबर १३२ मधील जागा पडून, गरीब अतिक्रमणधारकांना पट्टे केव्हा मिळणार?

श्यामकांत पाण्डेय

धारणी : शहराला लागून असलेल्या पूर्वेकडील मौजा तलाई येथील सर्व्हे नंबर १३२ मध्ये अनेक गर्भश्रीमंतांनी शासनाकडून काही अटी व शर्तींवर रहिवासी प्रयोजनासाठी जागा घेतली होती. त्याला जवळपास ४० वर्षे होत आले असून, अनेक जागा रिकाम्या आहेत. त्यावर बांधकाम करून राहण्याची तरतूद करण्यात आली नसल्यामुळे अनावश्यक लोकांना वाटण्यात आलेले शासकीय जमीन नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी प्रकरण सुरू करून या जागा सरकारजमा कराव्या, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

सर्व्हे नंबर १३२ या शासकीय जागेत गोरगरिबांना अत्यल्प दरात राहण्यासाठी शासनाने ६४ भूखंडांची निर्मिती करून ले-आउट पाडले होते. यापैकी अनेक जागा रिकाम्या आहेत. शासकीय नियमाप्रमाणे रहिवासी प्रयोजनासाठी जागा देताना एक वर्षाच्या आत बांधकाम करणे आवश्यक असते. यामुळे आजपर्यंत कोणतेही बांधकाम करण्यात न आलेल्या जागांबाबत शासनाकडून कठोर पावले उचलण्याची आवश्यकता आहे. आजमितीस धारणी शहरात अनेक गोरगरीब असे आहेत, ज्यांच्याकडे राहण्यासाठी जागा नाही. त्यामुळे रिकाम्या शासकीय जागा आवंटित केलेल्या लोकांकडून परत घेऊन गरजू लोकांना देण्याची प्रक्रिया राबवणे आवश्यक झाले आहे.

-----------

शासकीय भूखंड रिकामे

सर्व्हे नंबर १३२ मध्ये अमरावती-बर्हाणपूर मुख्य मार्गाला लागून उत्तरेकडे अनेक शासकीय भूखंड रिकामे आहेत. या जागांची किंमत धारणी शहरातील वाढत्या मागणीप्रमाणे कोट्यवधींच्या घरात आहे.

-------

ग्रामपंचायतीकडून कार्यवाहीची प्रतीक्षा

सर्व्हे नंबर १३२ मधील दूरभाष केंद्र कार्यालयाच्या पाठीमागे आणि हरिहरनगरला लागून असलेल्या शासकीय जागेवर अनेक गरिबांनी अतिक्रमण केले. अशा अतिक्रमणधारकांना शासकीय नियमानुसार कारवाई करून मालकी पट्टे देण्याची आवश्यकता आहे. याकरिता दिया ग्रामपंचायतीच्या नवनिर्वाचित सदस्यांकडून अपेक्षित कार्यवाहीची प्रतीक्षा आहे.