शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
3
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
4
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
5
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
6
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
7
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
8
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
9
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
10
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
11
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
12
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
13
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
14
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
15
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
16
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
17
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
18
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
19
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
20
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?

माधान येथे लोकसहभागातून नाला खोलीकरण

By admin | Updated: June 30, 2015 00:28 IST

तालुक्यातील संत गुलाबराव महाराजांचे माधान या गावातील गावकऱ्यांनी एकत्रित येऊन लोकसहभागातून गावाच्या...

नवा आदर्श : ६० हजार रूपयांची लोकवर्गणी जमाचांदूरबाजार : तालुक्यातील संत गुलाबराव महाराजांचे माधान या गावातील गावकऱ्यांनी एकत्रित येऊन लोकसहभागातून गावाच्या मध्यातील नाल्याचे खोलीकरण केले. यासाठी लागणारा निधी गावातील लोकांनी लोकवर्गणीतून जमा केला. हा एक नवा आदर्श तालुक्यात दिशादर्शक ठरणारा आहे. माधानवासीयांचा हा आदर्श तालुक्यातील सर्वच नागरिकांनी घेतला तर जलयुक्त शिवार अभियान कार्यक्रम १०० टक्के यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही.संत श्री गुलाबराव महाराजांनी आपले शेतीविषयक विचार मांडताना येणाऱ्या काळात कोणता शेतकरी टिकेल, या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले होते की, पावसाच्या पाण्यावर अवलंबून न राहता थोड्याफार पाण्याची व्यवस्था करून जो आपली शेती पिकवेल तोच शेतकरी भविष्यात शेतीत टिकवेल. महाराजांच्या याच वचनातून प्रेरणा घेऊन माधान येथील गावकऱ्यांनी लोकसहभागातून जलसंधारणाचे नाला खोलीकरणाचे महत्त्वाचे काम हाती घेतले आहे. तसेच या गावाला गांधीवादी विचारसरणीच्या सेवाभावी ताराबेन मश्रुवाला यांच्या जनसेवेचा वारसाही लाभला आहे. या मातीत रुजलेल्या त्यांच्या लोकसेवा वारसाचाही गावकऱ्यांनी यासाठी उपयोग करून घेतला.गावकऱ्यांच्या या भावना ग्रामपंचायतीपर्यंत पोहोचल्यानंतर स्वत: ग्रामपंचायत कार्यालयही या लोकसहभागात समाविष्ट झाले. लोकांकडून जमा झालेल्या लोकवर्गणीत भ्रष्टाचार होऊ नये यासाठी ग्रामपंचायत रीतसर सात नंबरची पावतीही दानदात्याला देण्यात येऊन या कामावरील जमा-खर्चाचा हिशेब ठेवण्याची जबाबदारी गावकऱ्यांनी ग्रामपंचायत कार्यालयावर सोपविली आहे, अशा रीतीने गावकऱ्यांनी एकत्रित येऊन नाला खोलीकरणाच्या निमित्ताने जलशिवार योजनेचा अभिनव शुभारंभ शासनाची कोणतीही मदत न घेता सुरू करून एक आदर्श तालुक्यातील नागरिकांना घालून दिला. गावकऱ्यांच्या या स्तुत्य उपक्रमाला स्थानिक उपविभागीय अधिकारी शरद जावळे यांनी सदिच्छा भेट देऊन या उपक्रमाबाबत त्यांचे अभिनंदन केले.सदर उपक्रम राबविण्याकरिता उपसरपंच दिनेश देशमुख, कस्तुरबा माधान संस्थेचे सचिव बाळासाहेब पटवर्धन, सरपंच अश्विनी धावडे, बाळासाहेब पाटेकर, विजय रेवळकर, रवी सर्वटकर, मोहन धावडे, एस. एम. मोहोड, रावसाहेब भागवत, कृष्णराव कोल्हे, अनिरुद्ध मोहोड यांनी पुढाकार घेतला. या नाला खोलीकरणाच्या कामासाठी गावकऱ्यांनी एकत्रित येऊन ६० हजार रुपये एवढा निधी लोकवर्गणीतून जमा केला, हे विशेष. (शहर प्रतिनिधी)जलयुक्त शिवार अभियानाला प्रतिसादशासनाने सुरू केलेल्या जलयुक्त शिवार अभियानाला येथे उत्तम प्रतिसाद मिळत आहे. येथील नागरिकांची सहकार्याची भावना असून जलयुक्त शिवार योजना त्यांच्या मदतीने १०० टक्के यशस्वी होण्याच्या मार्गावर असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.