शहरं
Join us  
Trending Stories
1
पीएम मोदींच्या स्वागतास अख्खे मंत्रिमंडळच आले; भारत मालदीवला 'इतके' कर्ज देणार
2
कारगिल विजयदिन : वयाच्या विसाव्या वर्षी पती शहीद, आता मुलगाही देशसेवेसाठी झाला सज्ज
3
बापरे! १४,२९८ पुरुषांना ‘लाडकी बहीण’चा लाभ! डल्ला मारला कसा?
4
केवळ ‘आय लव्ह यू’ म्हणणे हा लैंगिक छळ नाही; छत्तीसगड उच्च न्यायालयाचा निकाल
5
राज्यात ८०० कोटींचा रुग्णवाहिका घोटाळा, निधी गेला श्रीकांत शिंदेंच्या ट्रस्टकडे : खा. राऊत 
6
डॉक्टरांनी रुग्णाला उंदीर अन् एटीएम समजून वागवले, डॉक्टरवरील गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार
7
महाराष्ट्रात ‘पीएम-किसान’ लाभार्थी संख्येत चौपट वाढ! शेतकऱ्यांच्या खात्यात किती
8
माणिकराव कोकाटेंची गच्छंती की खातेबदल? पक्षात खल सुरू
9
निवडणूक आयोगाविरोधात विरोधक झाले आक्रमक; बॅनर्स फाडून थेट कचऱ्यात टाकले
10
अश्लील कंटेंट दाखविणाऱ्या उल्लू, देसिफ्लिक्ससह २५ ॲपवर बंदी
11
IND vs ENG 4th Test Day 3 Stumps: टीम इंडियानं ५ विकेट्स घेतल्या; पण अख्खा दिवस यजमानांनी गाजवला
12
आधी मोदींवर थेट हल्ला, आता गाठणार गुजरात, राहुल गांधींची मोठी खेळी, मोदी-भाजपाच्या अडचणी वाढणार?
13
Ben Stokes Retires Hurt : स्टोक्सनं पहिली फिफ्टी ठोकली अन् मग मैदान सोडायची वेळ आली, कारण...
14
अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेचा मुंबईकरांना भुर्दंड का?  मुंबई महानगरपालिकेवर उच्च न्यायालयाचे ताशेरे
15
विद्यार्थी म्हणाले, गुरुजी छप्पर कोसळतंय, पण शिक्षकांनी दरडावून बसवून ठेवले, शाळा दुर्घटनेत धक्कादायक माहिती समोर  
16
LOCजवळ भूसुरुंग स्फोट, अग्निवीराला वीरमरण, २ जवान जखमी, पहलगाम हल्ला करणाऱ्या संघटनेने स्वीकारली जबाबदारी 
17
ब्लॅकमेल करणाऱ्या प्रेयसीचा खून, मृतदेह दौलताबाद घाटात फेकून प्रियकर पोलिस ठाण्यात हजर
18
ना कोळसा, ना डिझेल, ना वीज, भारतातील पहिली हायड्रोजन ट्रेन या इंधनावर चालणार? चाचणी यशस्वी
19
जालन्यात भरधाव बसने दोन मित्रांना चिरडले; केदारखेडा-राजूर महामार्गावर रक्ताचा सडा
20
Joe Root Record With 38th Hundred : रुटची विक्रमी सेंच्युरी! क्रिकेटच्या मैदानातील 'डॉन'ला टाकले मागे

माधान येथे लोकसहभागातून नाला खोलीकरण

By admin | Updated: June 30, 2015 00:28 IST

तालुक्यातील संत गुलाबराव महाराजांचे माधान या गावातील गावकऱ्यांनी एकत्रित येऊन लोकसहभागातून गावाच्या...

नवा आदर्श : ६० हजार रूपयांची लोकवर्गणी जमाचांदूरबाजार : तालुक्यातील संत गुलाबराव महाराजांचे माधान या गावातील गावकऱ्यांनी एकत्रित येऊन लोकसहभागातून गावाच्या मध्यातील नाल्याचे खोलीकरण केले. यासाठी लागणारा निधी गावातील लोकांनी लोकवर्गणीतून जमा केला. हा एक नवा आदर्श तालुक्यात दिशादर्शक ठरणारा आहे. माधानवासीयांचा हा आदर्श तालुक्यातील सर्वच नागरिकांनी घेतला तर जलयुक्त शिवार अभियान कार्यक्रम १०० टक्के यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही.संत श्री गुलाबराव महाराजांनी आपले शेतीविषयक विचार मांडताना येणाऱ्या काळात कोणता शेतकरी टिकेल, या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले होते की, पावसाच्या पाण्यावर अवलंबून न राहता थोड्याफार पाण्याची व्यवस्था करून जो आपली शेती पिकवेल तोच शेतकरी भविष्यात शेतीत टिकवेल. महाराजांच्या याच वचनातून प्रेरणा घेऊन माधान येथील गावकऱ्यांनी लोकसहभागातून जलसंधारणाचे नाला खोलीकरणाचे महत्त्वाचे काम हाती घेतले आहे. तसेच या गावाला गांधीवादी विचारसरणीच्या सेवाभावी ताराबेन मश्रुवाला यांच्या जनसेवेचा वारसाही लाभला आहे. या मातीत रुजलेल्या त्यांच्या लोकसेवा वारसाचाही गावकऱ्यांनी यासाठी उपयोग करून घेतला.गावकऱ्यांच्या या भावना ग्रामपंचायतीपर्यंत पोहोचल्यानंतर स्वत: ग्रामपंचायत कार्यालयही या लोकसहभागात समाविष्ट झाले. लोकांकडून जमा झालेल्या लोकवर्गणीत भ्रष्टाचार होऊ नये यासाठी ग्रामपंचायत रीतसर सात नंबरची पावतीही दानदात्याला देण्यात येऊन या कामावरील जमा-खर्चाचा हिशेब ठेवण्याची जबाबदारी गावकऱ्यांनी ग्रामपंचायत कार्यालयावर सोपविली आहे, अशा रीतीने गावकऱ्यांनी एकत्रित येऊन नाला खोलीकरणाच्या निमित्ताने जलशिवार योजनेचा अभिनव शुभारंभ शासनाची कोणतीही मदत न घेता सुरू करून एक आदर्श तालुक्यातील नागरिकांना घालून दिला. गावकऱ्यांच्या या स्तुत्य उपक्रमाला स्थानिक उपविभागीय अधिकारी शरद जावळे यांनी सदिच्छा भेट देऊन या उपक्रमाबाबत त्यांचे अभिनंदन केले.सदर उपक्रम राबविण्याकरिता उपसरपंच दिनेश देशमुख, कस्तुरबा माधान संस्थेचे सचिव बाळासाहेब पटवर्धन, सरपंच अश्विनी धावडे, बाळासाहेब पाटेकर, विजय रेवळकर, रवी सर्वटकर, मोहन धावडे, एस. एम. मोहोड, रावसाहेब भागवत, कृष्णराव कोल्हे, अनिरुद्ध मोहोड यांनी पुढाकार घेतला. या नाला खोलीकरणाच्या कामासाठी गावकऱ्यांनी एकत्रित येऊन ६० हजार रुपये एवढा निधी लोकवर्गणीतून जमा केला, हे विशेष. (शहर प्रतिनिधी)जलयुक्त शिवार अभियानाला प्रतिसादशासनाने सुरू केलेल्या जलयुक्त शिवार अभियानाला येथे उत्तम प्रतिसाद मिळत आहे. येथील नागरिकांची सहकार्याची भावना असून जलयुक्त शिवार योजना त्यांच्या मदतीने १०० टक्के यशस्वी होण्याच्या मार्गावर असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.