शहरं
Join us  
Trending Stories
1
यश दयालसमोर धोनी ठरला फिका! नो बॉल.. फ्री हिट ट्विस्टनंतरही CSK नं गमावला सामना, RCB टॉपला
2
भारत-पाक सीमेवर मोठी कारवाई, राजस्थानात पाकिस्तानी रेंजर ताब्यात!
3
घरगुती वाद विकोपाला! अकोला येथे दुहेरी खून: पतीकडून पत्नी, सावत्र मुलीची गळा दाबून हत्या
4
रामराजे नाईक-निंबाळकर यांनाही उत्तरे द्यावीच लागणार, मुख्यमंत्र्यांचे यावर बारीक लक्ष- जयकुमार गोरे
5
आयपीएल २०२५ मध्ये युवा फलंदाजांचा दबदबा, आरसीबीविरुद्ध आयुष म्हात्रेचं सुपरफास्ट अर्धशतक
6
अँथनी अल्बानीज पुन्हा होणार ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान! ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींनी केलं अभिनंदन
7
"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले
8
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
9
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
10
IPL 2025 : कोहलीनं जिरवली! खलील अहमदनं दुसऱ्याच्या जीवावर असा काढला राग, मग... (VIDEO)
11
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
12
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
13
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
14
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
15
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
16
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
17
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
18
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
19
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं
20
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप

एकाच रुग्णालयात डेंग्यूचे नऊ 'पॉझिटिव्ह'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2017 21:51 IST

जिल्ह्यात जीवघेण्या डेंग्यू आजाराने पुन्हा डोके वर काढले आहे. राजापेठस्थित एका खासगी रुग्णालयात पाच दिवसांत डेंग्यू आजाराचे नऊ रूग्ण 'पॉझिटिव्ह' आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्देउपचार सुरू : आरोग्य प्रशासनाचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यात जीवघेण्या डेंग्यू आजाराने पुन्हा डोके वर काढले आहे. राजापेठस्थित एका खासगी रुग्णालयात पाच दिवसांत डेंग्यू आजाराचे नऊ रूग्ण 'पॉझिटिव्ह' आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. मात्र, या गंभीर बाबीकडे आरोग्य प्रशासनाचे अद्यापही दुर्लक्ष आहे.राजापेठ परिसरात एका रुग्णालयात १ ते ५ आॅक्टोबरदरम्यान डेग्यू आजाराचे ९ रूग्ण उपचारासाठी दाखल झाले आहे. या सर्व रुग्णांना डेंग्यू आजाराची लक्षणे निदर्शनास येताच त्यांची एनएस १ (अ‍ॅन्टीजन टेस्ट) तपासणी करण्यात आली. या रुग्णांना डेंग्यू असल्याबाबतचा पॉझिटिव्ह 'रिपोर्ट' खासगी पॅथॉलॉजीमधून प्राप्त झाल्याचे डॉ.मनोज निचत यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. गत महिन्यात जिल्ह्याभरात अनेक रूग्ण डेंग्यूचे पॉझिटिव्ह आढळले होते. मात्र आरोग्य प्रशासन योग्यरीत्या दखल घेत नसल्याने डेंग्यूच्या रूग्णांमध्ये वाढ झाली आहे. आतापर्यंत शहरात सहा तर ग्रामीण भागात दोन रूग्ण या वर्षात पॉझिटिव्ह आढळल्याची नोंद हिवताप अधिकारी कार्यालयाकडे होती.कोरडा दिवस पाळाआता या रूग्णांमध्ये वाढ झाली असून योग्यवेळी दखल घेण्याची गरज आहे. नागरिकांमध्ये डेंग्यू हा आजार कसा होतो. किंबहुना झाला तर काळजी कशी घ्यायची यासंदर्भात जनजागृती करणे गरजेचे आहे. डेग्यूचे पॉझिटिव्ह रूग्ण हे शहरातील गोपाल नगर, जलारामनगर, गोंडबाबा मंदिर परिसर, अंबाविहार, गणेश कॉलनी, शिवाजी नगर तसेच अंजनगाव बारी, दर्यापूर परिसरातील असल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या डेंग्यू 'पॉझिटिव्ह' बाबतची माहिती महानगरपालिका वैद्यकीय आरोग्य अधिकारी व जिल्हा शल्यचिकित्सकांना कळविण्यात आली आहे.प्रशासनाने शहरातील स्वच्छतेकडे दुर्लक्ष केले आहे. तसेच आरोग्य विभागाचेही दुर्लक्ष होत असल्याने अनेक डेंग्यूचे रुग्ण पॉझिटिव्ह आढळून येत आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.डेंग्यू आजाराची लक्षणेतीव्र ताप येणे, सतत डोके दुखणे, हातपाय दुखणे, थकवा येणे, त्याचप्रमाणे उलट्या होणे, रक्तातील पांढºया पेशी कमी होणे आदी लक्षणे डेंग्यू या आजारामध्ये रूग्णाला होतात.या ठिकाणी डासांची उत्पत्तीनारळाच्या करवंट्या, टायर व इतर ठिकाणी साचलेले पाणी वाहते करावे, डेंग्यूच्या डासांची स्वच्छ पाण्यात अंडी देत असल्याने घरातील पाणी जास्त दिवस एकाच ठिकाणी साठवून ठेवू नये, आठवड्यातील एक दिवस कोरडा दिवस पाळणे गरजेचे आहे.