शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

एकाच रुग्णालयात डेंग्यूचे नऊ 'पॉझिटिव्ह'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2017 21:51 IST

जिल्ह्यात जीवघेण्या डेंग्यू आजाराने पुन्हा डोके वर काढले आहे. राजापेठस्थित एका खासगी रुग्णालयात पाच दिवसांत डेंग्यू आजाराचे नऊ रूग्ण 'पॉझिटिव्ह' आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्देउपचार सुरू : आरोग्य प्रशासनाचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यात जीवघेण्या डेंग्यू आजाराने पुन्हा डोके वर काढले आहे. राजापेठस्थित एका खासगी रुग्णालयात पाच दिवसांत डेंग्यू आजाराचे नऊ रूग्ण 'पॉझिटिव्ह' आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. मात्र, या गंभीर बाबीकडे आरोग्य प्रशासनाचे अद्यापही दुर्लक्ष आहे.राजापेठ परिसरात एका रुग्णालयात १ ते ५ आॅक्टोबरदरम्यान डेग्यू आजाराचे ९ रूग्ण उपचारासाठी दाखल झाले आहे. या सर्व रुग्णांना डेंग्यू आजाराची लक्षणे निदर्शनास येताच त्यांची एनएस १ (अ‍ॅन्टीजन टेस्ट) तपासणी करण्यात आली. या रुग्णांना डेंग्यू असल्याबाबतचा पॉझिटिव्ह 'रिपोर्ट' खासगी पॅथॉलॉजीमधून प्राप्त झाल्याचे डॉ.मनोज निचत यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. गत महिन्यात जिल्ह्याभरात अनेक रूग्ण डेंग्यूचे पॉझिटिव्ह आढळले होते. मात्र आरोग्य प्रशासन योग्यरीत्या दखल घेत नसल्याने डेंग्यूच्या रूग्णांमध्ये वाढ झाली आहे. आतापर्यंत शहरात सहा तर ग्रामीण भागात दोन रूग्ण या वर्षात पॉझिटिव्ह आढळल्याची नोंद हिवताप अधिकारी कार्यालयाकडे होती.कोरडा दिवस पाळाआता या रूग्णांमध्ये वाढ झाली असून योग्यवेळी दखल घेण्याची गरज आहे. नागरिकांमध्ये डेंग्यू हा आजार कसा होतो. किंबहुना झाला तर काळजी कशी घ्यायची यासंदर्भात जनजागृती करणे गरजेचे आहे. डेग्यूचे पॉझिटिव्ह रूग्ण हे शहरातील गोपाल नगर, जलारामनगर, गोंडबाबा मंदिर परिसर, अंबाविहार, गणेश कॉलनी, शिवाजी नगर तसेच अंजनगाव बारी, दर्यापूर परिसरातील असल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या डेंग्यू 'पॉझिटिव्ह' बाबतची माहिती महानगरपालिका वैद्यकीय आरोग्य अधिकारी व जिल्हा शल्यचिकित्सकांना कळविण्यात आली आहे.प्रशासनाने शहरातील स्वच्छतेकडे दुर्लक्ष केले आहे. तसेच आरोग्य विभागाचेही दुर्लक्ष होत असल्याने अनेक डेंग्यूचे रुग्ण पॉझिटिव्ह आढळून येत आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.डेंग्यू आजाराची लक्षणेतीव्र ताप येणे, सतत डोके दुखणे, हातपाय दुखणे, थकवा येणे, त्याचप्रमाणे उलट्या होणे, रक्तातील पांढºया पेशी कमी होणे आदी लक्षणे डेंग्यू या आजारामध्ये रूग्णाला होतात.या ठिकाणी डासांची उत्पत्तीनारळाच्या करवंट्या, टायर व इतर ठिकाणी साचलेले पाणी वाहते करावे, डेंग्यूच्या डासांची स्वच्छ पाण्यात अंडी देत असल्याने घरातील पाणी जास्त दिवस एकाच ठिकाणी साठवून ठेवू नये, आठवड्यातील एक दिवस कोरडा दिवस पाळणे गरजेचे आहे.