शहरं
Join us  
Trending Stories
1
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
2
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
3
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
4
दिल्ली ब्लास्ट प्रकरण : आता पठानकोटमधून आणखी एका डॉक्टरला अटक, अल-फलाह विद्यापीठात केली होती नोकरी
5
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
6
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
7
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
8
जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात?
9
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
10
चुकूनही करू नका 'हे' काम, क्षणार्धात तुमचा मोबाईल फोन होऊ शकतो हॅक! गुगलने काय इशारा दिला?
11
नोकरी सोडून आयपीएस अधिकारी उतरले बिहार निवडणुकीच्या मैदानात; मराठमोळ्या लांडेंना किती मिळाली मते?
12
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
13
दिल्ली स्फोटापूर्वी उमर घाबरला होता, नवीन सीसीटीव्हीमध्ये खुलासा, दोन्ही फोन कुठे लपवले?
14
Ravindra Jadeja : जड्डूनं केली विक्रमांची 'बरसात'! WTC मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
16
Travel : नवीन वर्ष परदेशात सेलिब्रेट करायचा विचार करताय? 'या' देशांमध्ये होऊ शकते खिशाला परवडणारी ट्रीप!
17
'भाजपाला फायदा करून देण्याची सुपारी घेतलीय का?'; काँग्रेसच्या स्वबळाच्या निर्णयावर शरद पवार गट नाराज
18
कुटुंबासोबतचे संबंधच तोडले, लालू प्रसाद यादवांच्या मुलीने आरोप केलेले रझीम कोण, राजदमध्ये काय घडलं?
19
अल फलाह युनिव्हर्सिटीवर क्राईम ब्रांचचा बडगा, UGC च्या तक्रारीवरून २ FIR दाखल
20
"अल्लाह करे भारत..."; नौगाम ब्लास्टवर फारूक अब्दुल्ला यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
Daily Top 2Weekly Top 5

डेंग्यूने सात मृत्यू, संबंधितांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2018 22:41 IST

शहरासह जिल्ह्यात डेंग्यूने सात नागरिकांना हकनाक जीव गमवावा लागला. यासाठी दोषी असणाऱ्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवून या प्रकरणाची गृह विभागाकडून चौकशी व कारवाई करावी, तसेच मृतांच्या कुटुंबाला भेट देऊन शासनाच्यावतीने आर्थिक मदत देण्याची मागणी नवनीत राणा यांनी केली.

ठळक मुद्देनवनीत राणांची मागणी : मुख्यमंत्र्याची भेट घेऊन देणार निवेदन

अमरावती : शहरासह जिल्ह्यात डेंग्यूने सात नागरिकांना हकनाक जीव गमवावा लागला. यासाठी दोषी असणाऱ्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवून या प्रकरणाची गृह विभागाकडून चौकशी व कारवाई करावी, तसेच मृतांच्या कुटुंबाला भेट देऊन शासनाच्यावतीने आर्थिक मदत देण्याची मागणी नवनीत राणा यांनी केली.जिल्ह्यात दोन महिन्यांपासून डेंग्यूने थैमान घातले आहे. आतापर्यंत सात जणांचा बळी गेला. अद्यापही सहाशेचेवर रुग्ण डेंग्यू आजारावर उपचार घेत असल्याची नोंद आहे. याप्रकरणी राज्याच्या गृहविभागाच्यावतीने स्वतंत्र चौकशी करावी. सबंधित अधिकाºयावर कारवाई करावी. या मृतांच्या घरी स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट देऊन शासनाच्यावतीने त्यांना आर्थिक मदत द्यावी. तसेच याला कारणीभूत असलेल्या महापालिका अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाच गुन्हा दाखल करावा, अशी मागणी युवा स्वाभिमान पक्षाच्या मार्गदर्शक नवनीत राणा यांनी केली. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर करणार असल्याचे त्या म्हणाल्या. जिल्ह्यात अपुºया पावसामुळे खरीप पिके उद्ध्वस्त झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहे. यासाठी एकरी ३० हजारांचा मदतनिधी तत्काळ उपलब्ध करावा, यासह अन्य मागण्या मुख्यमंत्र्यांसमोर त्या मांडणार आहेत.