शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

जिल्ह्यात संसर्गजन्य आजारात डेंग्यूचाही दंश!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 05:01 IST

जुलै महिन्यात पावसाने कहर केला होता. त्यानंतर वातावरण बदलले पावसाने उघडीप दिली. दुपारी कडक उन पडल्यामुळे हवेत उष्णता निर्माण झाली. सध्या हे वातावरण पुन्हा बदलेले असून ऊन आणि ढगाळ वातावरणाचा खेळात वातावरणामध्ये उष्णता आणि कधीकधी गारठा जाणवत आहे. त्यामुळे संसर्गजन्य आजाराचे प्रमाण वाढत असल्याची स्थिती आहे .सध्या अनेकांना सर्दी, खोकला, ताप, अंगदुखी यासारखे संसर्गजन्य आजारांनी ग्रासले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : वातावरणात सतत होणाऱ्या बदलाचा परिणाम अनेकांच्या आरोग्यावर होत आहे. सध्या या बदलत्या वातावरणामुळे सर्दी, ताप, खोकला यासारख्या संसर्गजन्य आजाराचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे शासकीय व खासगी रुग्णालयात गर्दी वाढत असल्याचे दिसून येत आहेत. त्यात डासांची पैदास वाढल्याने डेंग्यू, मलेरिया व चिकनगुनियाच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याचे दिसले.सध्या वातावरणात सतत बदल होत आहे. गत काही दिवसांपासून दिवसा तीव्र उन्ह, ढगाळ वातावरण तर पहाटे थोड्या प्रमाणात थंडी जाणवत आहे. त्यामुळे व्हायरल इन्फेक्शन वाढील लागले आहे.जुलै महिन्यात पावसाने कहर केला होता. त्यानंतर वातावरण बदलले पावसाने उघडीप दिली. दुपारी कडक उन पडल्यामुळे हवेत उष्णता निर्माण झाली. सध्या हे वातावरण पुन्हा बदलेले असून ऊन आणि ढगाळ वातावरणाचा खेळात वातावरणामध्ये उष्णता आणि कधीकधी गारठा जाणवत आहे. त्यामुळे संसर्गजन्य आजाराचे प्रमाण वाढत असल्याची स्थिती आहे .सध्या अनेकांना सर्दी, खोकला, ताप, अंगदुखी यासारखे संसर्गजन्य आजारांनी ग्रासले आहे. वातावरणातील संसर्गामुळे रुग्णांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून रुग्णालय गर्दीने फुलली आहेत. किरकोळ दिसणार हे आजार बळावू नयेत म्हणून रुग्ण तातडीने उपचार घेत आहेत. बदलत्या वातावरणात डासांची पैदास वाढली असून डेंग्यू व अन्य आजाराला निमंत्रण मिळत आहे. आजघडीला जिल्ह्यात डेंग्यू,चिकणगुनिया,मलेरियाचे रूग्ण आढळून येत असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाचे सुत्रांनी सांगितले.

सल्ल्याशिवाय औषधे नको!सर्दी, ताप ,खोकला, अंगदुखी हे ग्रामीण भागात सर्रास होणारे आजार आहे .त्यामुळे या आजाराकडे कोणीही गांभीर्याने पाहत नाही. अनेक वेळा अशा आजारांसाठी मेडीकल्स करून गोळ्या आणून त्याचे सेवन केले जाते.मात्र परस्पर गोळ्या घेणे हे दुसऱ्या आजाराला किंवा असलेले आजार बळावण्याची कारणीभूत ठरू शकते.

अशी घेता येईल घरगुती दक्षता- पाणी साठवण टाक्या नियमित स्वच्छ कराव्यात.- घराच्या आसपास पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी- झुडपे व नाशक गवत काढून घ्यावे- घरात स्वच्छता ठेवावी कचऱ्याची वेळीच विल्हेवाट लावावी.- आजारी व्यक्तीच्या संपर्कात जाणे टाळावे. 

घरातील साठवलेल्या पाण्यात डासांची उत्पत्ती होते. त्यामुळे आठवड्यातून एकदा ड्राय डे पाळावा. डेंग्यू व अन्य आजाराचे रूग्ण आढळून येत असल्याने आजाराची कुठलेही लक्षण दिसून आल्यास डॉक्टरराचा सल्ला घेवून उपचार घ्यावेत.डॉ. रेवती साबळे, जिल्हा अतिरिक्त आरोग्य अधिकारी

 

टॅग्स :dengueडेंग्यू