शहरं
Join us  
Trending Stories
1
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
2
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
3
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
4
'किमान माणसासारखी तरी वागणूक...' IT अभियंता तरुणीची पोस्ट व्हायरल, म्हणाले मॅनेजरसमोरच मी...
5
Mumbai: बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मेहुणीची घरीच प्रसूती; भाऊजींसह बहिणीलाही अटक
6
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल
7
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
8
रीलस्टारलाही नॅशनल अवॉर्ड पण टीव्ही स्टार्सला नाही! स्पष्टच बोलली अनुपमा, म्हणाली- "आता स्मृती इराणींनी कमबॅक केलंय तर..."
9
"इतक्या दूरची नोकरी..."; रिक्षा चालकाने महिलेला रस्त्याच्या मध्येच सोडलं अन् विचारला प्रश्न
10
तिसऱ्या बाईच्या प्रेमासाठी दुसऱ्या पत्नीला संपवलं; नवऱ्याचं प्लॅनिंग, तान्ह्या बाळासमोर घडलं क्रूर कृत्य
11
जबरदस्त! ११३७ कोटींच्या मोहिमेसाठी सारा तेंडुलकरची निवड, सचिनच्या लेकीला मिळाली मोठी जबाबदारी
12
Baba Ramdev: "हिंदू धर्मात जन्मलेले काही लोक..." जितेंद्र आव्हांडाच्या वक्तव्यावर बाबा रामदेव यांची प्रतिक्रिया
13
मुलाची इंजिनियरिंग कॉलेजमध्ये निवड, पण फी चे पैसे जमवणे शक्य झाले नाही, हतबल पित्याने संपवलं जीवन
14
अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातून मिळाली प्रेरणा; फुटपाथवरुन सुरू झाला प्रवास, आता बनले व्यवसाय क्षेत्रातील 'शहंशाह'
15
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
16
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
17
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
18
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
19
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
20
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य

हिंदू स्मशानभूमीतील विद्युत शवदाहिनीची तोडफोड, सुटे भाग फेकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:11 IST

अमरावती : आमदार तथा माजी राज्यमंत्री प्रवीण पोटे यांनी दान दिलेल्या ३० लाख रुपये किमतीतून स्थानिक हिंदू स्मशानभूमीने खरेदी ...

अमरावती : आमदार तथा माजी राज्यमंत्री प्रवीण पोटे यांनी दान दिलेल्या ३० लाख रुपये किमतीतून स्थानिक हिंदू स्मशानभूमीने खरेदी केलेल्या विद्युत शवदाहिनीला स्थानिकांनी शुक्रवारी कडाडून विरोध केला. शवदाहिनीची तोडफोड करण्यात आली. या शवदाहिनीचे सुटे भाग नजीकच्या नाल्यात फेकण्यात आले. यात भाजप, मनसेचा सक्रीय सहभाग होता, हे विशेष.

हिंदू स्मशानभूमीत कोरोना रुग्णांच्या अंत्यविधीसाठी दोन गॅस शवदाहिनी आहेत. पुन्हा नव्याने विद्युत शवदाहिनी लावण्यात येत आहे. परिसरातील नागरिकांकडून ती अन्य स्मशानभूमीत लावण्यात यावी, या मागणीसाठी दोन दिवसांपूर्वी मूक आंदोलन करण्यात आले. तरीही शुक्रवारी स्मशानभूमी संस्थेने विद्युत शवदाहिनी प्रकल्प मागविला. सकाळी १० वाजता क्रेनद्वारे त्याचे धूड आले. शवदाहिनी लावण्याची तयारी सुरू असताना स्थानिक महिला, पुरुष आक्रमक झाले. क्रेनचालकाला पिटाळूव लावत त्यांनी आणि विद्युत दाहिनीची तोडफोड केली. दरम्यान मनसेच्या कार्यकर्त्यांनी विद्युत दाहिनीवर निषेधाचे पेंटिंग करून हे यंत्र काही वेळाने उलटविले. दाहिनीचे सूट भाग महिलांनी बाहेर काढले आणि नासधूस केली. काही सुटे भाग नजीकच्या नाल्यात फेकण्यात आले.

आंदोलनात भाजपचे प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी, नगरसेवक प्रणीत सोनी, मनसेचे संघटक पप्पू पाटील, शहराध्यक्ष संतोष बद्रे, नगरसेविका स्वाती कुळकर्णी, विशाल कुळकर्णी, अजय सारसकर, नितेश शर्मा, हर्षल ठाकरे, संगीता मडावी, प्रीती साहू, सोनल भुतडा, सचिन गावनेर, सुनीता तिवारी, रूपाली वारे, कीर्ती कोठार, प्रिया क्षीरसागर, पूजा कोंडे आदींचा सहभाग होता.

००००००००००००००००००००००

कोट

विद्युत शवदाहिनी हा प्रकल्प पर्यावरणपूरक आहे. अगोदर दोन गॅस दाहिनी असून, विद्युत दाहिनीचा तूर्त वापर होणार नव्हता. ती केवळ स्थापित करण्यात येणार होती. गॅस दाहिनीत बिघाड आल्यास ती पर्यायी व्यवस्था असेल.

- आर. बी. अटल, अध्यक्ष, हिंदू स्मशानभूमी संस्था

--------------

राजापेठ ठाण्यात ४० जणांविरुद्ध गुन्हे नोंदविले

हिंदू स्मशानभूमीत विद्युत शवदाहिनीला विरोध करण्यासाठी एकत्र येणे आणि प्रकल्पाची तोडफोड करणे, मालमत्ताचे नुकसान अशा विविध मुद्द्यांवर राजापेठ पोलिसांनी तब्बल ४० जणांविरुद्ध गुन्हे दाखल केल्याची माहिती पोलीस निरीक्षक मनीष ठाकरे यांनी ‘लोकमत’ला दिली. आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू असल्याने भादंविच्या कलम १८८, ३४१, १४३, १३५ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहे.