शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
3
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
4
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
5
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
6
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
7
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
8
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
9
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
10
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
11
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
12
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
13
हा सदोष मनुष्यवधच!
14
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
15
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
16
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
17
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
18
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
19
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?

ग्रामगीताचार्य रामकृष्णदादा बेलूरकर यांचे देहवसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2019 20:39 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे पाईक तथा ग्रामगीताचार्य रामकृष्णदादा बेलूरकर यांचे गुरुवारी दुपारी ३ च्या सुमारास वृद्धापकाळाने निधन झाले.

ठळक मुद्देराष्ट्रसंतांच्या तत्त्वज्ञानाच्या प्रचार व प्रसारात गेले उभे आयुष्य

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे पाईक तथा ग्रामगीताचार्य रामकृष्णदादा बेलूरकर यांचे गुरुवारी दुपारी ३ च्या सुमारास वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८८ वर्षांचे होते. वरूड येथे मुलाच्या निवासस्थानी त्यांची प्राणज्योत मालवली. मुळचे वरखेड येथील बेलूरकर यांना राष्ट्रसंतांचा सहवास लाभला होता. राष्ट्रसंतांच्या तत्त्वज्ञानाच्या प्रचार, प्रसारात त्यांनी उभे आयुष्य वेचले.राष्ट्रसंतांच्या हयातीत त्यांना ग्रामगीताचार्य म्हणून गौरविण्यात आले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारधारेचे आजन्म प्रचारक म्हणून ख्यातकीर्त असलेल्या रामकृष्णदादांनी अनेक गावांत वाचनालये, व्यायामशाळा व श्रीगुरुदेव सेवा मंडळांची स्थापना केली. रामकृष्णदादा हे उत्तम मल्ल, व्यायामपटू, नाट्य कलावंत व दिग्दर्शक, शाहीर, कवी व लेखक, आदर्श प्रबोधनकार, कीर्तनकार, आयुवेर्दाचार्य तसेच ज्येष्ठ समाजसुधारक म्हणून प्रसिद्ध होते. अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाचे संचालक असलेले रामकृष्णदादांनी मंजूळामाता, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व सीतारामदास स्वामी यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकणारी सुमारे ७५ पुस्तके लिहिलीत. अनेक पुस्तकांचे संपादन केले. सुश्राव्य वाणीतून रसिकांची मने जिंकणाऱ्या दादांनी रुग्णांवर आयुर्वेदिक उपचारसुद्धा केले. वर्धा जिल्ह्यातील तळेगाव शामजीपंत येथे दादांनी सन १९९३ मध्ये मानव विकास ज्ञान साधनाश्रमाची निर्मिती केली. दादांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, समर्थ लहानुजी महाराज, दामोदर महाराज, भूदानाचे प्रणेते विनोबा भावे, श्री. संत गाडगेबाबा, कृषी महर्षी पंजाबराव देशमुख यांच्यासह अनेक विभूतींचा सहवास लाभला. समाजप्रबोधनासह संस्कार, क्रीडा, वाचनालय, ग्रंथसंपादन अशा नानाविध पातळीवर ते तहहयात कार्यरत होते. रामकृष्णदादा बेलूरकर यांच्या पार्थिवावर शुक्रवार, ११ जानेवारी रोजी त्यांनीच उभारलेल्या तळेगाव शामजीपंत येथील मानव विकास ज्ञान साधनाश्रमात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. तत्पूर्वी गुरुवारी सायंकाळी त्यांचे पार्थिव वरखेडमध्ये आणण्यात आले. त्यांच्या पश्चात तीन मुले, एक मुलगी व बराच मोठा आप्तपरिवार आहे.विविध पुरस्कारांनी सन्मानितरामकृष्णदादा बेलुरकर यांना विदर्भ साहित्य संमेलन नरखेड येथे वा.कृ. चोरघडे स्मृती साहित्य पुरस्कार, माणिकलाल गांधी चॅरिटेबल ट्रस्ट नागपूरद्वारा दे.ग. सोटे ग्रामीण साहित्य पुरस्कार, गांधी जिल्हा ज्येष्ठ समाजसेवक सन्मान, राष्ट्रसंत साहित्य संमेलन २००० मध्ये ग्राममहर्षी पुरस्कार, महाराष्ट्र शासनाचा सन २००४ चा व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार, आदिवासी विकास मंत्रालयाचा सन २००५ मध्ये आदिवासी सेवक पुरस्कार, महाराष्ट्र शासनाचा सन २००८ मध्ये सांस्कृतिक किर्तन/समाज प्रबोधन पुरस्कार, सन २०११ मध्ये जीवनव्रती स्वामी विवेकानंद पुरस्कार, सन २००९ तुका म्हणे खंजेरी, संशोधनात्मक साहित्य पुरस्कार, मुंबई येथे सन २०१२ मध्ये विदर्भ भूषण पुरस्कार, तसेच सन २०१३ मध्ये प्रबोधनकार के.सी. ठाकरे समाज प्रबोधन पुरस्कार यासह डझनावरी पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले आहेत.

 

टॅग्स :Rashtrasant Tukadoji Maharajराष्ट्रसंत तुकडोजी महाराज