शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
2
आता खामेनेईचा खात्मा करणारच..: हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचे खुले चॅलेंज
3
मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासह पुणे घाट, सातारा घाट परिसरात 24 तासांसाठी ऑरेंज अलर्ट
4
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
5
बसच्या तिकिटामुळे हत्या उघडकीस आली! पाच वर्षाचे रिलेशन, लग्नाची इच्छा, घडलं वेगळंच
6
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर: १० राशी मालामाल, इच्छापूर्ती काळ; अचानक पैसे मिळतील, चांगले घडेल!
7
Video: इलॉन मस्क यांना मोठा धक्का; प्रक्षेपणादरम्यान SpaceX च्या स्टारशिप रॉकेटमध्ये स्फोट
8
Air India Plane Crash: 'असं वाटलं पाकिस्ताननेच मिसाईल हल्ला केला, चार मित्र गमावले'; अपघातातून वाचलेल्या केशवने सांगितला थरार
9
ठाकरेंसोबत रात्रीतून खेळ झाला! काल मातोश्रीवर आलेले 'ते' दोन नेते आज शिंदेंच्या शिवसेनेत
10
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
11
लीड्स टेस्टपूर्वीच टीम इंडियाला मोठा झटका, 259 धावा करणाऱ्या 'या' क्रिकेटरला दुखापत! नेमकं काय घडलं? आता कशी असेल प्लेइंग 11?
12
Ashadhi Ekadashi 2025: संत नामदेवांनी पांडुरंगाच्या आरतीत उल्लेखलेली 'राही' नेमकी कोण?
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधी यांना वाढदिवसानिमित्त दिल्या खास शुभेच्छा, म्हणाले...
14
Shree Swami Samarth: एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
15
चालत्या रिक्षात अचानक झाला स्फोट; आगीत महिला प्रवासी जिवंत जळाली, ५ जण जखमी
16
अहमदाबाद विमान अपघात: Air India ४,०८० कोटी रुपयांचा 'इन्श्युरन्स क्लेम' करणार, इतिहासातील सर्वाधिक आकडा ठरणार?
17
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
18
Monolithisch India IPO Listing: ६२ टक्क्यांच्या प्रीमिअमसह लिस्टिंग, नंतर लागलं अपर सर्किट; पहिल्याच दिवशी गुंतणूकदार मालामाल
19
प्यार तूने क्या किया! बॉयफ्रेंडच्या घरात बसलेली बायको, संतापलेल्या नवऱ्याने घेतला नाकाचा चावा
20
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग

मोबाईल टॉवरधारकांना ‘डिमांड नोटीस’

By admin | Updated: February 26, 2017 00:14 IST

महापालिका क्षेत्रातील १८२ पेक्षा अधिक मोबाईल टॉवरधारकांना मालमत्ताकर विभागाकडून ‘डिमांड नोटीस’ पाठविण्यात आल्या आहेत.

करविभागाची कारवाई : ३१ मार्चची डेडलाईनअमरावती : महापालिका क्षेत्रातील १८२ पेक्षा अधिक मोबाईल टॉवरधारकांना मालमत्ताकर विभागाकडून ‘डिमांड नोटीस’ पाठविण्यात आल्या आहेत.त्यांना ३१ मार्चपर्यंत संपूर्ण थकबाकी भरणे अनिवार्य आहे. आयुक्त हेमंत पवार, कर मुल्यांकन अधिकारी महेश देशमुख आणि पाचही सहायक आयुक्तांनी या थकबाकीसाठी ‘इनिशिएटीव्ह’ घेतले आहे.सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या पार्श्वभूमिवर शहरातील सर्व मोबाईल टॉवरधारकांकडून मालमत्ताकर वसूल करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिल्यानंतर संबंधित झोनकडून त्यांना ‘डिमांड नोटीस’ पाठविण्यात आल्यात. महापालिका हद्दीतील १८२ मोबाइल टॉवर कराच्या अखत्यारीत आल्याने महापालिकेच्या तिजोरीत सुमारे १ ते सव्वा कोटी रुपयांची भर पडणार आहे. बेबंद झालेल्या मोबाईल टॉवर धारकांवर डिसेंबर १०२६ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने लगाम घातला होता. त्याअनुषंगाने नव्या निर्देशानुसार मोबाईल टॉवर हे ‘इमारत’ या संस्थेत मोडत असल्याने संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेने त्यांच्याकडून मालमत्ताकर वसूल करावा, असे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार मोबाईल टॉवरधारकांना थकित कर रकमेचा भरणा करावा, यासाठी डिमांड नोटीस पाठविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, सोमवार २७ फेब्रुवारीपासून या वसुलीला गती मिळणार आहे. १८२ पैकी १५३ मोबाईल टॉवर अनधिकृत असल्याची बाब डिसेंबर २०१५ मध्ये उघड झाली होती. मनपाची परवानगी न घेता आणि कर न देता हे टॉवर्स उभारले गेल्याने तीन टॉवर जमिनदोस्त करण्यात आले होते.याअनुषंगाने प्रशासनाने टॉवर्सची अधिकृतता तपासावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. असे होते आयुक्तांचे आदेशसर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार मोबाईल टॉवर हे मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम १९४९ चे कलम ५ नुसार ‘इमारत’ या सज्ञेत मोडते. तसा अंतिम आदेशच सर्वोच्च न्यायालयाने पारित केला आहे. त्या अनुषंगाने महापालिका हद्दीत असलेले सर्व मोबाईल टॉवर या मालमत्तेची थकित कराची मागणी तसेच वसुलीबाबत आवश्यक कारवाई करावी, असे आदेश आयुक्त हेमंत पवार यांनी सर्व सहायक आयुक्तांना डिसेंबर १६ मध्ये दिले होते.त्या याचिकेवर ‘सुको’चे आदेशसन २०१५ साली जीटीएल इन्फ्रास्ट्रक्चरने अमरावती महापालिकेविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावेळी ५७७/२०१५ या क्रमांकाने रिटपिटीशन दाखल करून घेण्यात आली होती. त्यानंतर ६११/२०१६ या रिटपिटीशनवर १६ डिसेंबर २०१६ रोजी सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला. त्या निकालाच्या आधारे मोबाईल टॉवरधारकांकडून मालमत्ता कर वसुलण्याचा महापालिकेचा मार्ग प्रशस्त झाला होता. त्याआधारे आयुक्तांनी आदेश पारित केलेत.