शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
2
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
3
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव
4
शशी थरूर 'क्लीन बोल्ड'! एका तरूणाच्या इंग्रजी ट्विटने काढली 'विकेट', रिप्लाय देत म्हणाले...
5
७ वर्षांनी डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन भेट होणार; ३२ हजार सैन्य तैनात, ३०० किमी परिसरात 'नो फ्लाय झोन'
6
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
7
"युवराज्ञींना येणं भाग पडलं...", प्राजक्ता-शंभुराजच्या साखरपुड्याला आली भोसले राजघराण्यातील महत्त्वाची व्यक्ती, अभिनेत्रीची खास पोस्ट
8
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
9
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
10
“स्वातंत्र्य चळवळ अन् RSSचा संबंध काय? PM मोदी पुन्हा लाल किल्ल्यावरून खोटे बोलले”: सपकाळ
11
काँग्रेस-NCPशी आघाडी करून मविआत सामील का झालो?; उद्धव ठाकरेंनी सांगितले मोठे ‘राज’कारण
12
VIDEO: ऑलिम्पिक पदकविजेती मनु भाकरने व्हायोलिनवर वाजवलं भारताचं राष्ट्रगीत, होतंय कौतुक
13
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
14
एकमेव भारतीय क्रिकेटपटू ज्याने १५ ऑगस्ट रोजी ठोकलंय शतक, कोण आहे तो?
15
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
16
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
17
"राष्ट्रगीत सुरू असताना असं उभं राहतात का?", स्वातंत्र्यदिन साजरा करताना शिल्पा शेट्टीच्या बहिणीकडून मोठी चूक, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
18
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
19
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
20
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS

मागणी वाढली, रक्तदान घटले

By admin | Updated: June 1, 2015 00:40 IST

उन्हाळ्यात रक्तदात्यांची संख्या रोडावल्याने रक्त संकलनावर मोठा परिणाम झाला आहे.

वैैभव बाबरेकर ल्ल अमरावतीउन्हाळ्यात रक्तदात्यांची संख्या रोडावल्याने रक्त संकलनावर मोठा परिणाम झाला आहे. दर दिवसाला ३५ ते ६० रक्त पिशव्यांची आवश्यकता आहे. मात्र, रक्तदान कमी झाल्याने रुग्णांना रक्तासाठी भटकंती करावी लागत आहे. रक्तदानात अमरावती जिल्हा अग्रेसर आहे. येथे रूग्णांची रक्ताची गरज सहजरीत्या भागते. मात्र, सद्यस्थितीत उन्हाळा असल्याने रक्तदान शिबिरांच्या आयोजनात घट आली आहे. त्यामुळे रक्तसंकलनावर मोठा प्रभाव पडला आहे. गेल्या काही वर्षांची आकडेवारी लक्षात घेता जिल्हा सामान्य रुग्णालयातील रक्तपेढीचा रक्तसंकलनामध्ये मोलाचा वाटा आहे. त्यामुळेच बीपीएलधारक रुग्णांना मोफत व गरजूंना वेळीच रक्तपुरवठा करण्यात इर्विनची रक्तपेढी सक्षम आहे. उन्हाळ्यात शाळा-महाविद्यालये बंद असतात. अशावेळी विद्यार्थी रक्तदान करीत नाहीत. काही सामाजिक संस्थांचे पदाधिकारी रक्तदान शिबिरांचे आयोजन करून गरिबांना रक्ताचा पुरवठा करतात. मात्र, उन्हाळ्यात रक्त संकलनात घट होते. मागणीच्या तुलनेत रक्त संकलन कमी होत असल्याने रक्ताची टंचाई निर्माण झाली आहे. इर्विनच्या रक्तपेढीच्या माध्यमातून वर्षभरात विविध ठिकाणी शिबिरे घेण्यात येतात. त्यामुळे रक्तदानाची टक्केवारी काही प्रमाणात स्थिर आहे. वाढत असलेली लोकसंख्या, वाढते आजार व अपघातांची वाढती संख्या यामुळे रक्ताची मागणीसुध्दा वाढली आहे. मात्र, वर्षभरात उन्हाळ्यात रक्तदानाची टक्केवारी घटल्याचे दिसून येत आहे. यंदाच्या एप्रिल महिन्यात इर्विनच्या रक्तपेढीने रक्तदानाचा टक्का टिकवून ठेवला. चार वर्षांच्या तुलनेत यंदाच्या एप्रिल महिन्यात ९५० पिशव्यांचे रक्त संकलन करण्यात आले. इर्विनच्या रक्तपेढीतून डफरीन, सुपर स्पेशालिटी, टीबी रुग्णालयाला रक्ताचा पुरवठा केला जातो. खासगी रक्तपेढीलाही गरजेनुसार रक्त पुरविले जाते.दिवसाला ३५ ते ६० रक्तपिशव्यांची गरजउन्हाळ्यात महाविद्यालये-शाळा बंद असल्यामुळे विद्यार्थी रक्तदान करीत नाहीत. त्यातच उन्हामुळे बाहेर शिबिरे घेता येत नाहीत. रक्तदानामुळे उन्हाळ्यात शारीरिक अडचणी वाढतात. त्यामुळे रक्तदाते रक्तदान करण्यास धजावत नाहीत. रक्तदान कमी होत असल्यामुळे रुग्णांची गैरसोय होऊ शकते.-अविनाश उकंडे, जिल्हा रक्त संकलन अधिकारी, इर्विन रक्तपेढी. रक्तदान केल्याने अनेक फायदे होतात. शरीरातील रक्त दिल्यावर नवीन रक्त तयार होते. त्यातच रक्तदानामुळे नागरिकांचे जीव वाचतात. रक्तदान काळाची गरज असून नागरिकांनी रक्तदानात पुढाकार घेतला पाहिजे. -उमेश आगरकर, जनसंपर्क अधिकारी, इर्विन रक्तपेढी