शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिलीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
3
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
4
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
5
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
6
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
7
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
8
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
9
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
10
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
11
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
12
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
13
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
14
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
15
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
16
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
17
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
18
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
19
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
20
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
Daily Top 2Weekly Top 5

मागणी वाढली, रक्तदान घटले

By admin | Updated: June 1, 2015 00:40 IST

उन्हाळ्यात रक्तदात्यांची संख्या रोडावल्याने रक्त संकलनावर मोठा परिणाम झाला आहे.

वैैभव बाबरेकर ल्ल अमरावतीउन्हाळ्यात रक्तदात्यांची संख्या रोडावल्याने रक्त संकलनावर मोठा परिणाम झाला आहे. दर दिवसाला ३५ ते ६० रक्त पिशव्यांची आवश्यकता आहे. मात्र, रक्तदान कमी झाल्याने रुग्णांना रक्तासाठी भटकंती करावी लागत आहे. रक्तदानात अमरावती जिल्हा अग्रेसर आहे. येथे रूग्णांची रक्ताची गरज सहजरीत्या भागते. मात्र, सद्यस्थितीत उन्हाळा असल्याने रक्तदान शिबिरांच्या आयोजनात घट आली आहे. त्यामुळे रक्तसंकलनावर मोठा प्रभाव पडला आहे. गेल्या काही वर्षांची आकडेवारी लक्षात घेता जिल्हा सामान्य रुग्णालयातील रक्तपेढीचा रक्तसंकलनामध्ये मोलाचा वाटा आहे. त्यामुळेच बीपीएलधारक रुग्णांना मोफत व गरजूंना वेळीच रक्तपुरवठा करण्यात इर्विनची रक्तपेढी सक्षम आहे. उन्हाळ्यात शाळा-महाविद्यालये बंद असतात. अशावेळी विद्यार्थी रक्तदान करीत नाहीत. काही सामाजिक संस्थांचे पदाधिकारी रक्तदान शिबिरांचे आयोजन करून गरिबांना रक्ताचा पुरवठा करतात. मात्र, उन्हाळ्यात रक्त संकलनात घट होते. मागणीच्या तुलनेत रक्त संकलन कमी होत असल्याने रक्ताची टंचाई निर्माण झाली आहे. इर्विनच्या रक्तपेढीच्या माध्यमातून वर्षभरात विविध ठिकाणी शिबिरे घेण्यात येतात. त्यामुळे रक्तदानाची टक्केवारी काही प्रमाणात स्थिर आहे. वाढत असलेली लोकसंख्या, वाढते आजार व अपघातांची वाढती संख्या यामुळे रक्ताची मागणीसुध्दा वाढली आहे. मात्र, वर्षभरात उन्हाळ्यात रक्तदानाची टक्केवारी घटल्याचे दिसून येत आहे. यंदाच्या एप्रिल महिन्यात इर्विनच्या रक्तपेढीने रक्तदानाचा टक्का टिकवून ठेवला. चार वर्षांच्या तुलनेत यंदाच्या एप्रिल महिन्यात ९५० पिशव्यांचे रक्त संकलन करण्यात आले. इर्विनच्या रक्तपेढीतून डफरीन, सुपर स्पेशालिटी, टीबी रुग्णालयाला रक्ताचा पुरवठा केला जातो. खासगी रक्तपेढीलाही गरजेनुसार रक्त पुरविले जाते.दिवसाला ३५ ते ६० रक्तपिशव्यांची गरजउन्हाळ्यात महाविद्यालये-शाळा बंद असल्यामुळे विद्यार्थी रक्तदान करीत नाहीत. त्यातच उन्हामुळे बाहेर शिबिरे घेता येत नाहीत. रक्तदानामुळे उन्हाळ्यात शारीरिक अडचणी वाढतात. त्यामुळे रक्तदाते रक्तदान करण्यास धजावत नाहीत. रक्तदान कमी होत असल्यामुळे रुग्णांची गैरसोय होऊ शकते.-अविनाश उकंडे, जिल्हा रक्त संकलन अधिकारी, इर्विन रक्तपेढी. रक्तदान केल्याने अनेक फायदे होतात. शरीरातील रक्त दिल्यावर नवीन रक्त तयार होते. त्यातच रक्तदानामुळे नागरिकांचे जीव वाचतात. रक्तदान काळाची गरज असून नागरिकांनी रक्तदानात पुढाकार घेतला पाहिजे. -उमेश आगरकर, जनसंपर्क अधिकारी, इर्विन रक्तपेढी