शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

‘अचलपूर’ मिळविण्यासाठी भाजप गोटातून मागणी

By admin | Updated: June 14, 2014 23:03 IST

विविध पातळीवर नेतृत्त्वकौशल्य सिद्ध झालेल्या सुरेखा ठाकरे यांना उमेदवारी न मिळाल्यास त्या शिवसेनेत प्रवेश करतील, अशी जोरदार चर्चा जिल्हाभरात आहे. संजय खोडके आणि सुलभा खोडके राष्ट्रवादीत नसल्यामुळे

अमरावती : विविध पातळीवर नेतृत्त्वकौशल्य सिद्ध झालेल्या सुरेखा ठाकरे यांना उमेदवारी न मिळाल्यास त्या शिवसेनेत प्रवेश करतील, अशी जोरदार चर्चा जिल्हाभरात आहे. संजय खोडके आणि सुलभा खोडके राष्ट्रवादीत नसल्यामुळे आता सुरेखा ठाकरे यांना पवार कुटुंब दुखावणार नाही, असा जाणकारांचा कयास आहे. युतीमध्ये हा मतदारसंघ शिवसेनेचा आहे; तथापि, शिवसेनेला या मतदारसंघात प्रस्थ निर्माण करता आले नाही. खासदारकी नसताना अनंत गुढे या मतदारसंघातून आमदारकीची निवडणूक पराभूत झाले होते. शिवसेनेच्या इतर नेत्यांनाही या मतदारसंघात पाय रोवता आले नाहीत. शिवसेनेचे दमदार नेतृत्त्वच त्यामुळे या मतदारसंघात निर्माण झाले नाही. ना चेहरा, ना क्षमता अशी शिवसेनेची स्थिती आहे. तरीही मतदारसंघ सेनेच्याच वाट्याला आहे. भाजपक्षाची या मतदारसंघात बांधणी चांगली आहे. रुपेश ढेपे आणि प्रकाश भारसाकळे हे दोन चेहरे भाजपकडे आहेत; तथापि, मतदारसंघ भाजपाच्या वपाट्याला नसल्यामुळे भाजपजनांची गोची आहे. यावेळी शिवसेनेऐवजी भाजपक्षाला मतदारसंघ द्यावा, अशी मागणी भाजप गोटातून सुरू आहे. बच्चू कडू यांनी लोकसभेच्यावेळी रिपाइंला जाहीर समर्थन दिले होते. दलित मतांचा काही प्रमाणात बच्चू कडू यांना त्यामुळे लाभ होईल. रिपाइंकडून प्रताप अभ्यंकर यांच्या नावाची चर्चा आहे. नातेवाईकांमुळे संकटअचलपूर मतदारसंघात असलेल्या चांदूरबाजार नगरपालिका आणि शिरजगाव बंड ग्रामपंचायतीतील सत्ता बच्चू कडू यांच्यासाठी अडचणीचे मुद्दे ठरले आहेत. चांदूरबाजारच्या नगराध्यक्षपदी बच्चू यांनी त्यांच्या बहीण सरोजिनी हरणे यांना विराजमान केले. श्रमपूर्वक आणलेला निधी पालिकेने चांदूरबाजार शहरात खर्च केला खरा; परंतु कामांचा दर्जा निकृष्ट आहे. लोकांमध्ये त्यामुळे असंतोष आहे. पालिकेवर आर्थिक अनियमिततेचे आरोप वारंवार होतात. भगिणी प्रेमापोटी अनुनभवी बहिणीच्या हाती सोपविलेल्या सत्तेचे दुष्परिणाम आता बच्चू कडू यांना टाळता येणार नाहीत. शिरजगाव बंड येथील सरपंच सविता बर्वे यांच्याबाबतही नेमके हेच घडले आहे. सत्तेचा त्या दुरुपयोग केल्याची ओरड आहे.नगराध्यक्षपदाचा कार्यकाळ सहा महिन्यांनी वाढला आहे. बच्चू कडू यांनी त्यांच्या बहिणीऐवजी पक्षातील कार्यक्षम आणि लोकप्रिय महिलेच्या हाती सूत्रे सोपविल्यास सकारात्मक संकेत नागरिकांमध्ये जाईल. शिरजगावातही हा प्रयोग त्यांना करता येईल. बच्चू कडू आता बदलले, अशी जी चर्चा वारंवार होते, त्यामागे नात्यातील, मर्जीतील लोकांना सत्ताकेंद्रे सोपविणे हेदेखील महत्त्वाचे कारण आहेच.