शहरं
Join us  
Trending Stories
1
Crime: वैजापुरात महिला कीर्तनकाराची आश्रमातच दगडाने ठेचून हत्या, छ. संभाजीनगरात खळबळ!
2
एखाद्याला खूश करण्यासाठी मुलांचे भविष्य खराब करू नका, हिंदी सक्तीवरून सुप्रिया सुळे भडकल्या!
3
Shefali Jariwala Death: शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
4
Bigg Boss मधील आतापर्यंत तिसऱ्या स्पर्धकाचा अचानक मृत्यू; प्रत्येक घटनेमागे कारण एकच...
5
मुले पुढे जातात, मुलींना लग्न करणेही होते कठीण; लिव्ह-इन रिलेशनशिपबद्दल न्यायालयाकडून गंभीर चिंता
6
"मी हात जोडले, पाय धरले, पण त्या नराधमाने…’’, कोलकाता बलात्कार प्रकरणातील पीडितेचा धक्कादायक जबाब   
7
कोण आहे शेफालीचा पती? ५ वर्षांतच मोडलेला पहिला संसार, मग पराग त्यागीच्या प्रेमात पडली अन्...
8
"मला फक्त ५ मिनिटे आधी कळालं..."; अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी वेंसच्या पत्नी उषा यांचा खुलासा
9
मुंबई: अस्मी चव्हाणने ३० व्या मजल्यावरून उडी मारून का केली आत्महत्या? पोलिसांच्या तपासातून समोर आली माहिती
10
बांगलादेशींना नोकरी देणाऱ्यांवर होणार कारवाई; राज्य सरकारच्या आदेशात काय?
11
"तरुण दिसण्यासाठी ती गेली ५ वर्ष.."; शेफाली जरीवालाच्या मृत्यूनंतर डॉक्टरांनी केला मोठा खुलासा
12
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
13
खराब हवामानामुळे पिकाचे होणारे नुकसान टाळता येणार, नव्या टेक्नोलॉजीचा शेतकऱ्यांना फायदाच!
14
झटपट पैसे कमावण्यासाठी पती-पत्नीने सुरू केला असा धंदा, अश्लील चॅट, व्हिडीओ आणि...
15
Shefali Jariwala Death: "बिग बॉस शापित आहे", शेफाली जरीवालाच्या निधनानंतर अभिनेत्रीची पोस्ट
16
Philippines Earthquake: फिलीपिन्समध्ये ६.० तीव्रतेचा भूकंप, नागरिकांमध्ये घबराट!
17
आता मोबाइल ॲपद्वारे कुठूनही करता येणार मतदान; कोणत्या मतदारांना मिळणार अधिकार?
18
११वी प्रवेशाचा घोळ थांबेना, विद्यार्थ्यांची चिंता मिटेना; तांत्रिक अडचणींचे ग्रहण सुटणार कधी?
19
Shefali Jariwala: शेफाली जरीवालाच्या शेवटच्या एक्स पोस्टमध्ये 'या' व्यक्तीच्या नावाचा उल्लेख!
20
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?

‘अचलपूर’ मिळविण्यासाठी भाजप गोटातून मागणी

By admin | Updated: June 14, 2014 23:03 IST

विविध पातळीवर नेतृत्त्वकौशल्य सिद्ध झालेल्या सुरेखा ठाकरे यांना उमेदवारी न मिळाल्यास त्या शिवसेनेत प्रवेश करतील, अशी जोरदार चर्चा जिल्हाभरात आहे. संजय खोडके आणि सुलभा खोडके राष्ट्रवादीत नसल्यामुळे

अमरावती : विविध पातळीवर नेतृत्त्वकौशल्य सिद्ध झालेल्या सुरेखा ठाकरे यांना उमेदवारी न मिळाल्यास त्या शिवसेनेत प्रवेश करतील, अशी जोरदार चर्चा जिल्हाभरात आहे. संजय खोडके आणि सुलभा खोडके राष्ट्रवादीत नसल्यामुळे आता सुरेखा ठाकरे यांना पवार कुटुंब दुखावणार नाही, असा जाणकारांचा कयास आहे. युतीमध्ये हा मतदारसंघ शिवसेनेचा आहे; तथापि, शिवसेनेला या मतदारसंघात प्रस्थ निर्माण करता आले नाही. खासदारकी नसताना अनंत गुढे या मतदारसंघातून आमदारकीची निवडणूक पराभूत झाले होते. शिवसेनेच्या इतर नेत्यांनाही या मतदारसंघात पाय रोवता आले नाहीत. शिवसेनेचे दमदार नेतृत्त्वच त्यामुळे या मतदारसंघात निर्माण झाले नाही. ना चेहरा, ना क्षमता अशी शिवसेनेची स्थिती आहे. तरीही मतदारसंघ सेनेच्याच वाट्याला आहे. भाजपक्षाची या मतदारसंघात बांधणी चांगली आहे. रुपेश ढेपे आणि प्रकाश भारसाकळे हे दोन चेहरे भाजपकडे आहेत; तथापि, मतदारसंघ भाजपाच्या वपाट्याला नसल्यामुळे भाजपजनांची गोची आहे. यावेळी शिवसेनेऐवजी भाजपक्षाला मतदारसंघ द्यावा, अशी मागणी भाजप गोटातून सुरू आहे. बच्चू कडू यांनी लोकसभेच्यावेळी रिपाइंला जाहीर समर्थन दिले होते. दलित मतांचा काही प्रमाणात बच्चू कडू यांना त्यामुळे लाभ होईल. रिपाइंकडून प्रताप अभ्यंकर यांच्या नावाची चर्चा आहे. नातेवाईकांमुळे संकटअचलपूर मतदारसंघात असलेल्या चांदूरबाजार नगरपालिका आणि शिरजगाव बंड ग्रामपंचायतीतील सत्ता बच्चू कडू यांच्यासाठी अडचणीचे मुद्दे ठरले आहेत. चांदूरबाजारच्या नगराध्यक्षपदी बच्चू यांनी त्यांच्या बहीण सरोजिनी हरणे यांना विराजमान केले. श्रमपूर्वक आणलेला निधी पालिकेने चांदूरबाजार शहरात खर्च केला खरा; परंतु कामांचा दर्जा निकृष्ट आहे. लोकांमध्ये त्यामुळे असंतोष आहे. पालिकेवर आर्थिक अनियमिततेचे आरोप वारंवार होतात. भगिणी प्रेमापोटी अनुनभवी बहिणीच्या हाती सोपविलेल्या सत्तेचे दुष्परिणाम आता बच्चू कडू यांना टाळता येणार नाहीत. शिरजगाव बंड येथील सरपंच सविता बर्वे यांच्याबाबतही नेमके हेच घडले आहे. सत्तेचा त्या दुरुपयोग केल्याची ओरड आहे.नगराध्यक्षपदाचा कार्यकाळ सहा महिन्यांनी वाढला आहे. बच्चू कडू यांनी त्यांच्या बहिणीऐवजी पक्षातील कार्यक्षम आणि लोकप्रिय महिलेच्या हाती सूत्रे सोपविल्यास सकारात्मक संकेत नागरिकांमध्ये जाईल. शिरजगावातही हा प्रयोग त्यांना करता येईल. बच्चू कडू आता बदलले, अशी जी चर्चा वारंवार होते, त्यामागे नात्यातील, मर्जीतील लोकांना सत्ताकेंद्रे सोपविणे हेदेखील महत्त्वाचे कारण आहेच.