शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

सर्वंकष विकासासाठी १८५ कोटींची ‘डिमांड’

By admin | Updated: March 1, 2017 00:01 IST

जिल्हा वार्षिक योजनेतून विविध विकास कामांना निधी उपलब्ध होतो.

पालकमंत्री प्रवीण पोटे : जिल्हा नियोजन समितीची बैठक, पाणी टंचाई निवारणासाठी २० कोटीअमरावती : जिल्हा वार्षिक योजनेतून विविध विकास कामांना निधी उपलब्ध होतो. त्याअनुषंगाने जिल्ह्याच्या सर्वंकष विकासासाठी जिल्हा नियोजन समितीने सुमारे १८५ कोटी रूपयांचा प्रस्ताव तयार केल्याची माहिती पालकमंत्री प्रविण पोटे यांनी दिली.जिल्हा नियोजन समितीची आढावा बैठक पालकमंत्री प्रवीण पोटे अध्यक्षतेखाली नियोजन भवन येथे मंगळवार २८ फेब्रुवारी रोजी पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीला आ. अनिल बोंडे, आ. रमेश बुंदीले, आ. प्रभुदास भिलावेकर, जि.प. अध्यक्ष सतिश उईके, जि.प. सभापती गिरीश कराळे, जि.प. सदस्य अभिजित ढेपे, मोहन सिंगवी, मनोहर सुने, रविंद्र मुंदे, महेंद्रसिंग गैलवार, जिल्हाधिकारी किरण गित्ते, सीईओ जे. एन आभाळे, प्रकल्प अधिकारी एन. षण्मुखराजन, नियोजन अधिकारी रविंद्र काळे, जिल्हा नियोजन समिती सदस्य यांच्यासह सर्व विभाग प्रमुख अधिकारी उपस्थित होते. सन २०१७-१८ या वर्षाच्या जिल्हा वार्षिक योजना, अनुसूचित जाती उपयोजना, आदिवासी उपायोजना व आदिवासी उपयोजना प्रारुप आराखड्या बाबतची माहिती बैठकीत सादर करण्यात आली.पंडीत दिनदयाल उपाध्याय योजना, प्रधानमंत्री आवास योजना, स्वच्छ भारत अभियान आदी पायाभूत सुविधा पुरविणाऱ्या योजनांची प्रभावी अंमलबाजवणी करण्याचे निर्देश त्यांनी दिले. सन २०१६-१७ या आर्थिक वर्षातील विविध योजनांच्या आराखडयावर चर्चा करण्यासाठी जि.प. सदस्यांसोबत ही बैठक घेण्यात आली. जिल्ह्यातील विकास कामे करण्यासाठी २०१७-१८ वर्षाकरिता राज्य अर्थसंकल्पात १८५ कोटी रुपयांची मागणी केली असल्याची माहिती पालकमंत्र्यांनी दिली.बैठकीत विविध विभागांकडून प्राप्त प्रस्ताव व शासनाने जिल्ह्याला ठरवून दिलेली कमाल आर्थिक मर्यादा यावर प्राधान्याने चर्चा झाली. ज्या बाबींसाठी प्राधान्याने निधी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे अशा ठिकाणी तो उपलब्ध करून देण्याचे सूचना पोटे यांनी केली. बैठकीत मागील वर्षी ५ जून रोजी झालेल्या जिल्हा नियोजन समिती सभेच्या कार्यवृत्तावरील अनुपालन अहवालावर चर्चा करण्यात आली. बैठकीत सन २०१६-१७ चा विविध योजनाच्या अनुषंगाने जानेवारी २०१७ अखेर झालेल्या खर्चाचीमाहिती देण्यात देण्यात आली. जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून कामे करत असतांना ती योग्य पध्दतीने झाली पाहीजे. कामे करत असतांना जास्त फायदेशिर बाबींना प्राधान्य दिले जावे, अशी सूचना पालकमंत्र्यांनी केली आहे.जिल्ह्याला प्राप्त मर्यादेच्या तुलनेत विविध विभागांकडून प्राप्त प्रस्ताव हे जास्त असल्याने सर्वच विभागांना मागणी इतका निधी उपलब्ध होवू शकत नाही असे असले तरी अत्यावश्यक ठिकाणी मागणी इतका निधी उपलब्ध करून देण्याचे बैठकीत प्रस्तावित करण्यात आले. जिल्ह्यास वाढीव निधी मिळण्याची शक्यता असून त्यानंतर आवश्यकतेप्रमाणे विभागांना निधी उपलब्ध करून दिला जाणार असल्याचे जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी यावेळी सांगितले.जिल्ह्यातील पाणी टंचाई निवारणासाठी चालु आर्थिक वर्षात २० कोटी रुपयाची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती पालकमंत्री यांनी बैठकीत दिली. जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून कामे करत असतांना ती योग्य पध्दतीने झाली पाहीजे. कामे करत असतांना जास्त फायदेशिर बाबींना प्राधान्य दिले जावे. विशेषत: शेतकऱ्यांना दिलासा देण्याऱ्या बाबींना प्रामुख्याने घेण्यात यावे, असे पालकमंत्र्यांनी सांगितले. पालकमंत्र्यांनी सदर बैठकीमध्ये सर्वच योजनांचा आढावा घेऊन त्या योजनेच्या अंमलबजावणीबाबत जिल्हा, महसूल प्रशासनाला दिशानिर्देश दिले. मेळघाटातील मुद्याकडे वेधले सदस्यांनी लक्षमेळघाट या आदिवासी बहूल क्षेत्रातील विविध मुद्याकडे पालकमंत्र्यांचे लक्ष डिजिटल व्हिलेज गांव असलेल्या हरिसाल सर्कलचे सदस्य महेंद्र गैलवार यांनी विविध मुद्दे मांडून ते निकाली काढण्याची मागणी सभेत केली. यामध्ये मेळघाटातील १२०० घरकुलांचा प्रश्न प्रलंबीत आहे. अनेक घरकुलांचे कामे रखडली आहे. काही पहिला व दुसरा हप्ता वितरित करण्यात आला तर तिसरा हप्ता दिला नसल्याने ही कामे पेंडीग आहेत ती सुरू करावीत, घरकुलाचे कामे झाले नसल्याने अनेक लाभार्थी हे कामे न झाल्याने पावसाळयातही बेघर होते त्यांना न्याय द्याव,आदिवादी विकास महामंडळांची धान्य खरेदी तातडीने सुरू करावी,यासह इतर मागण्याचा यात समावेश आहे.