शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

राज्यभर चेतविली मशाल आता हलविणार दिल्ली

By admin | Updated: February 5, 2016 00:07 IST

वैशिष्ट््यपूर्ण आंदोलनांसाठी राज्यभर परिचित असलेले अचलपूरचे आमदार बच्चू कडू यांची रुग्णसेवा ही आणखी एक ओळख सामान्यांना आहे.

बच्चू कडू : आक्रमक आंदोलनांद्वारे अपंगांसाठी १७ शासनादेशअमरावती : वैशिष्ट््यपूर्ण आंदोलनांसाठी राज्यभर परिचित असलेले अचलपूरचे आमदार बच्चू कडू यांची रुग्णसेवा ही आणखी एक ओळख सामान्यांना आहे. अलिकडे त्यांच्या या परिचयात देशभक्ती आणि अपंगांच्या हक्कांसाठीची आंदोलने या दोन मुद्यांची भर पडली आहे. अपंगहक्कांसाठीच्या लढ्यात बच्चू कडू यांना मिळालेले यश दखलनीय आहे. आजपावेतो एकूण १७ शासननिर्णय त्यांच्या लढ्यामुळे पारीत होऊ शकलेत. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शुक्रवारी चांदूरबाजार तालुक्यातील टोंगलापूर-मासोद येथे अपंग पूनर्वसन केंद्राचे उद्घाटन करणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर कडू यांच्या या अपंगहक्कांसाठीच्या लढ्याचे महत्त्व आगळे ठरावे. अपंगांना रोज नाना समस्यांना सामोरे जावे लागते. शाळेतील शिक्षणापासून तर नोकरीपर्यंत अपंगांची अनेकदा अनेक ठिकाणी हेळसांड होते. त्यांच्यासाठी असाव्यात त्या सोयी उपलब्ध नाहीत. 'शासनाचा दृष्टीकोण कितीही मृदु असला तरी प्रशासन कठोर आहे', हाच अनुभव अपंगांचा! अपंगांच्या गरजांसाठी लढणारेही तसे विरळेच. अपंगच स्वत:चा लढा स्वत: उभारणार, हेच आजवर दिसत आलेले चित्र. कुणी हट्टाकट्टा प्रभावी नेता अपंगांसाठी आंदोलने करताना दिसला नाही. बेलोऱ्याचे बच्चू कडू मात्र याला अपवाद ठरले. अपंगांसाठी कुण्या सुदृढ व्यक्तिनेच लढायला हवे, हा विचार त्यांच्या डोक्यात चमकून गेला. ती व्यक्ती मीच का असू नये हा दुसरा विचार त्यांना अंतर्मूख करून गेला. पुढे हा विचार ज्वाला बनला. राज्यभर आंदोलनरूपी मशाली या ज्वालेने पेटविल्या. त्याचा परिणाम बघा- लागोपाठ १७ शासननिर्णय अपंगांसाठी शासनाला काढावे लागले. अपंगांना ३ टक्के निधी, ३ टक्के गाळे वाटप, शासकीय सेवेतील ३ टक्के जागा तातडीने भरणे, संजय गांधी निराधार योजनेत मिळणारे ६०० रुपये अनुदान १००० रुपयांपर्यंत वाढविणे, अपंगांना विनाअट घरकूल आदी निर्णयांचा त्यात समावेश आहे.अलिकडेच बच्चू कडू यांनी दिल्लीत धडक दिली. राजनाथसिंहांना भेटून त्यांनी काही मागण्या केल्यात. द्याल तर ठीक, नाही तर ५० हजार अपंगांची धडक दिल्लीत ठरलेलीच, असा इशाराच त्यांनी दिला. अपंगांसाठी खरे तर काही मागावेच लागू नये. आम्ही आंदोलने करून मागतोय ते उपकार केल्यागत का देता? अपंगांना त्यांचा सर्वंकष मूळ हक्क मिळवून द्यायचा असेल तर दिल्ली हलवावी लागेल, या विचाराने बच्चू कडू दिल्लीत धडकले. आंदोलनाबाबत जे ठाणले, ते केले- हा बच्चू कडू यांच्याबाबतचा आजवरचा अनुभव. शेतकऱ्यांसाठी मुंबईचे व्हीटी स्टेशन ताब्यात घेणारे कडू नजिकच्या भविष्यात दिल्ली जाम करून खळबळ उडवून गेले तर नवल वाटू नये!