शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
2
IPL 2025 Playoffs Scenarios: आता एका जागेसाठी ३ संघ! MI अन् DC त कडवी टक्कर; LSG चं काही खरं नाही
3
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
4
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
5
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
6
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
7
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
8
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
9
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
10
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
11
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
12
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
13
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
14
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
15
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
16
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
17
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
18
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
19
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
20
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...

राज्यभर चेतविली मशाल आता हलविणार दिल्ली

By admin | Updated: February 5, 2016 00:07 IST

वैशिष्ट््यपूर्ण आंदोलनांसाठी राज्यभर परिचित असलेले अचलपूरचे आमदार बच्चू कडू यांची रुग्णसेवा ही आणखी एक ओळख सामान्यांना आहे.

बच्चू कडू : आक्रमक आंदोलनांद्वारे अपंगांसाठी १७ शासनादेशअमरावती : वैशिष्ट््यपूर्ण आंदोलनांसाठी राज्यभर परिचित असलेले अचलपूरचे आमदार बच्चू कडू यांची रुग्णसेवा ही आणखी एक ओळख सामान्यांना आहे. अलिकडे त्यांच्या या परिचयात देशभक्ती आणि अपंगांच्या हक्कांसाठीची आंदोलने या दोन मुद्यांची भर पडली आहे. अपंगहक्कांसाठीच्या लढ्यात बच्चू कडू यांना मिळालेले यश दखलनीय आहे. आजपावेतो एकूण १७ शासननिर्णय त्यांच्या लढ्यामुळे पारीत होऊ शकलेत. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शुक्रवारी चांदूरबाजार तालुक्यातील टोंगलापूर-मासोद येथे अपंग पूनर्वसन केंद्राचे उद्घाटन करणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर कडू यांच्या या अपंगहक्कांसाठीच्या लढ्याचे महत्त्व आगळे ठरावे. अपंगांना रोज नाना समस्यांना सामोरे जावे लागते. शाळेतील शिक्षणापासून तर नोकरीपर्यंत अपंगांची अनेकदा अनेक ठिकाणी हेळसांड होते. त्यांच्यासाठी असाव्यात त्या सोयी उपलब्ध नाहीत. 'शासनाचा दृष्टीकोण कितीही मृदु असला तरी प्रशासन कठोर आहे', हाच अनुभव अपंगांचा! अपंगांच्या गरजांसाठी लढणारेही तसे विरळेच. अपंगच स्वत:चा लढा स्वत: उभारणार, हेच आजवर दिसत आलेले चित्र. कुणी हट्टाकट्टा प्रभावी नेता अपंगांसाठी आंदोलने करताना दिसला नाही. बेलोऱ्याचे बच्चू कडू मात्र याला अपवाद ठरले. अपंगांसाठी कुण्या सुदृढ व्यक्तिनेच लढायला हवे, हा विचार त्यांच्या डोक्यात चमकून गेला. ती व्यक्ती मीच का असू नये हा दुसरा विचार त्यांना अंतर्मूख करून गेला. पुढे हा विचार ज्वाला बनला. राज्यभर आंदोलनरूपी मशाली या ज्वालेने पेटविल्या. त्याचा परिणाम बघा- लागोपाठ १७ शासननिर्णय अपंगांसाठी शासनाला काढावे लागले. अपंगांना ३ टक्के निधी, ३ टक्के गाळे वाटप, शासकीय सेवेतील ३ टक्के जागा तातडीने भरणे, संजय गांधी निराधार योजनेत मिळणारे ६०० रुपये अनुदान १००० रुपयांपर्यंत वाढविणे, अपंगांना विनाअट घरकूल आदी निर्णयांचा त्यात समावेश आहे.अलिकडेच बच्चू कडू यांनी दिल्लीत धडक दिली. राजनाथसिंहांना भेटून त्यांनी काही मागण्या केल्यात. द्याल तर ठीक, नाही तर ५० हजार अपंगांची धडक दिल्लीत ठरलेलीच, असा इशाराच त्यांनी दिला. अपंगांसाठी खरे तर काही मागावेच लागू नये. आम्ही आंदोलने करून मागतोय ते उपकार केल्यागत का देता? अपंगांना त्यांचा सर्वंकष मूळ हक्क मिळवून द्यायचा असेल तर दिल्ली हलवावी लागेल, या विचाराने बच्चू कडू दिल्लीत धडकले. आंदोलनाबाबत जे ठाणले, ते केले- हा बच्चू कडू यांच्याबाबतचा आजवरचा अनुभव. शेतकऱ्यांसाठी मुंबईचे व्हीटी स्टेशन ताब्यात घेणारे कडू नजिकच्या भविष्यात दिल्ली जाम करून खळबळ उडवून गेले तर नवल वाटू नये!