शहरं
Join us  
Trending Stories
1
"मोदींच्या नेतृत्वाखाली २०२९ निवडणूक लढवावी लागणे ही भाजपची मजबुरी"; भाजप खासदाराचे विधान
2
१,२,३...२४ तासांत तीन मिसाईल टेस्ट! भारताची ऑपरेशन सिंदूरनंतर मोठी कामगिरी, लडाखमध्ये एक...
3
विश्वासघातकी चीन! भारताचं करायचंय २.७५ लाख कोटींचं नुकसान; ड्रॅगनची एक चाल, सरकार काय करणार?
4
Video: आव्हाड-दानवे बोलत होते, रिपोर्टर रेकॉर्डिंग करत होता... आव्हाडांना राग आला... हात उचलला! बघा, काय घडलं!
5
Rohit Pawar: "आवाज खाली करा, बोलता येत नसेल तर..."; रोहित पवारांनी पोलीस अधिकाऱ्याला झापलं!
6
विधानभवनातील वाद अन् गोपीचंद पडळकरांचं गाणं चर्चेत; तुम्ही पाहिलं का?
7
तिसऱ्या लग्नाचा हव्यास, पत्नीनं बॉयफ्रेंडला बोलवून घेतलं अन् कांड झालं! लग्नमंडपाऐवजी गेली तुरुंगात; असं काय केलं?
8
'लॅन्ड फॉर जॉब' घोटाळ्यात लालू यादव यांना मोठा धक्का! पण 'या' प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा
9
सात तरुण, २३ मोबाईल, दुबईहून सुरू होता भयंकर खेळ, पाहून पोलिसही अवाक्
10
'...तेव्हा राज ठाकरे-उद्धव ठाकरेंना लोक आपटून आपटून मारतील'; भाजप खासदार निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
11
लेकीच्या जन्मानंतर दुसऱ्याच दिवशी गमावला दीड वर्षांचा मुलगा; कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर
12
प्रेग्नंट पत्नीसोबत असा रोमँटिक झाला राजकुमार राव; स्विमिंग पूलमध्येच केलं लिपलॉक; बघा PHOTO
13
"विधानभवनात आमदारांचे खून पडले तरी...", राज ठाकरे भडकले, महाराष्ट्रातील जनतेला संतप्त सवाल
14
विजेचा झटका दिला, गर्भपात करायला लावला; एका 'थार'साठी नवऱ्याने मनीषासोबत काय काय केलं? झाला मोठा खुलासा
15
पोस्ट ऑफिसच्या स्कीम्समध्ये महिलांना पुरुषांपेक्षा अधिक व्याज मिळतं का? चेक करा डिटेल्स
16
६ महिन्यात सोन्यात तब्बल २६% वाढ! आता अजून वाढणार? 'या' ५ मार्गांनी करू शकता गुंतवणूक
17
हृदयद्रावक! हिमाचल प्रदेशात निसर्ग कोपला, डोंगरावरून खाली आले दगड; आई-मुलाचा मृत्यू
18
आधी ९० तास काम करण्याचा दिलेला सल्ला; आता त्यांचाच पगार २५ कोटींनी वाढला, किती मिळणार पॅकेज
19
Cast Certificate: 'त्या' लोकांचे जातीचे प्रमाणपत्र रद्द होणार; विधान परिषदेत फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले...
20
पती निक जोनाससोबत प्रियांका चोप्राचं लिप-लॉक, समुद्रकिनाऱ्यावरच रोमँटिक झालं कपल; बघा लेटेस्ट VIDEO

राज्यभर चेतविली मशाल आता हलविणार दिल्ली

By admin | Updated: February 5, 2016 00:07 IST

वैशिष्ट््यपूर्ण आंदोलनांसाठी राज्यभर परिचित असलेले अचलपूरचे आमदार बच्चू कडू यांची रुग्णसेवा ही आणखी एक ओळख सामान्यांना आहे.

बच्चू कडू : आक्रमक आंदोलनांद्वारे अपंगांसाठी १७ शासनादेशअमरावती : वैशिष्ट््यपूर्ण आंदोलनांसाठी राज्यभर परिचित असलेले अचलपूरचे आमदार बच्चू कडू यांची रुग्णसेवा ही आणखी एक ओळख सामान्यांना आहे. अलिकडे त्यांच्या या परिचयात देशभक्ती आणि अपंगांच्या हक्कांसाठीची आंदोलने या दोन मुद्यांची भर पडली आहे. अपंगहक्कांसाठीच्या लढ्यात बच्चू कडू यांना मिळालेले यश दखलनीय आहे. आजपावेतो एकूण १७ शासननिर्णय त्यांच्या लढ्यामुळे पारीत होऊ शकलेत. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शुक्रवारी चांदूरबाजार तालुक्यातील टोंगलापूर-मासोद येथे अपंग पूनर्वसन केंद्राचे उद्घाटन करणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर कडू यांच्या या अपंगहक्कांसाठीच्या लढ्याचे महत्त्व आगळे ठरावे. अपंगांना रोज नाना समस्यांना सामोरे जावे लागते. शाळेतील शिक्षणापासून तर नोकरीपर्यंत अपंगांची अनेकदा अनेक ठिकाणी हेळसांड होते. त्यांच्यासाठी असाव्यात त्या सोयी उपलब्ध नाहीत. 'शासनाचा दृष्टीकोण कितीही मृदु असला तरी प्रशासन कठोर आहे', हाच अनुभव अपंगांचा! अपंगांच्या गरजांसाठी लढणारेही तसे विरळेच. अपंगच स्वत:चा लढा स्वत: उभारणार, हेच आजवर दिसत आलेले चित्र. कुणी हट्टाकट्टा प्रभावी नेता अपंगांसाठी आंदोलने करताना दिसला नाही. बेलोऱ्याचे बच्चू कडू मात्र याला अपवाद ठरले. अपंगांसाठी कुण्या सुदृढ व्यक्तिनेच लढायला हवे, हा विचार त्यांच्या डोक्यात चमकून गेला. ती व्यक्ती मीच का असू नये हा दुसरा विचार त्यांना अंतर्मूख करून गेला. पुढे हा विचार ज्वाला बनला. राज्यभर आंदोलनरूपी मशाली या ज्वालेने पेटविल्या. त्याचा परिणाम बघा- लागोपाठ १७ शासननिर्णय अपंगांसाठी शासनाला काढावे लागले. अपंगांना ३ टक्के निधी, ३ टक्के गाळे वाटप, शासकीय सेवेतील ३ टक्के जागा तातडीने भरणे, संजय गांधी निराधार योजनेत मिळणारे ६०० रुपये अनुदान १००० रुपयांपर्यंत वाढविणे, अपंगांना विनाअट घरकूल आदी निर्णयांचा त्यात समावेश आहे.अलिकडेच बच्चू कडू यांनी दिल्लीत धडक दिली. राजनाथसिंहांना भेटून त्यांनी काही मागण्या केल्यात. द्याल तर ठीक, नाही तर ५० हजार अपंगांची धडक दिल्लीत ठरलेलीच, असा इशाराच त्यांनी दिला. अपंगांसाठी खरे तर काही मागावेच लागू नये. आम्ही आंदोलने करून मागतोय ते उपकार केल्यागत का देता? अपंगांना त्यांचा सर्वंकष मूळ हक्क मिळवून द्यायचा असेल तर दिल्ली हलवावी लागेल, या विचाराने बच्चू कडू दिल्लीत धडकले. आंदोलनाबाबत जे ठाणले, ते केले- हा बच्चू कडू यांच्याबाबतचा आजवरचा अनुभव. शेतकऱ्यांसाठी मुंबईचे व्हीटी स्टेशन ताब्यात घेणारे कडू नजिकच्या भविष्यात दिल्ली जाम करून खळबळ उडवून गेले तर नवल वाटू नये!