शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
4
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
5
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
6
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
7
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
8
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
9
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
10
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
11
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
12
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
13
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
14
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
15
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
16
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
17
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
18
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
19
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
20
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...

बेलोरा विमानतळाचे विस्तारीकरण रखडले

By admin | Updated: November 14, 2015 00:37 IST

बेलोरा विमानतळाचा विकास व विस्तारीकरण होणे गरजेचे आहे. मात्र विस्तारीकरणात बेलोरा ते जळू दरम्यान यवतमाळ- अकोला या महामार्गाला जोडणारा ..

वीरेंद्र जगताप यांचा सवाल : भूसंपादन रखडले, रस्ता निर्मितीचा प्रश्न कायमअमरावती : बेलोरा विमानतळाचा विकास व विस्तारीकरण होणे गरजेचे आहे. मात्र विस्तारीकरणात बेलोरा ते जळू दरम्यान यवतमाळ- अकोला या महामार्गाला जोडणारा चौपदरीकरण रस्ता होणे आवश्यक आहे. त्याशिवाय विमानतळाचे विस्तारीकरण विकास अशक्य असल्याचे मत आ. वीरेंद्र जगताप यांनी ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले.बेलोरा विमानतळाच्या धावपट्टीची लांबी वाढल्याशिवाय वाणिज्य स्वरुपाचे विमान सुरू करता येणार नाही. विमानतळाचा विकास व्हावा, यासाठी प्रकल्पग्रस्तांच्या जमिनी ताब्यात घेतल्या. परंतु विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी तांत्रिकदृष्ट्या काही बाबी शासन लक्षात घेत नसल्याने ते लांबणीवर पडले आहे. आशेने विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी प्रकल्पग्रस्तांनी जमिनी दिल्या. मात्र राज्य शासन विमानतळाचा विकास करण्याच्या मुळाशी जात नसल्याचे शल्य आ. जगताप यांनी व्यक्त केले. तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी या विमानतळाच्या विस्तारीकरणास अडथळा ठरणारा जळू ते बेलोरा हा बाह्यवळण रस्ता निर्मितीसाठी १४ कोटी रुपये मंजूर केले होते. चार कि.मी. लांबीच्या या बाह्यवळण रस्त्यासाठी भूसंपादन करणे आवश्यक आहे. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाने १४ कोटी रुपये खर्चाचा अहवाल तयार करून तो शासनाकडे पाठविला होता. परंतु बेलोरा ते जळू या बाह्य वळण रस्ता निर्मितीसाठी १४ कोटी रुपयांचे इस्टिमेंट हे जास्त असल्याचे कारण पुढे करून हा रस्ता शासनस्तरावर निर्माण केला जाईल, असा निर्णय शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाचे सचिव पी.एस. मीना यांनी घेतला. परंतु हा निर्णय शासन स्तरावर प्रलंबित राहिला. जळू ते बेलोरा हा बाह्यवळण रस्ता निर्माण करण्यात आला नाही. हा रस्ता निर्माण केल्याशिवाय विस्तारीकरण शक्य नाही, असा दावा आ. जगताप यांनी केला. विमानतळाचा विकास आणि विस्तारीकरण करताना तांत्रीक दृष्ट्या काही बाबी लक्षात घेवूनच वाटचाल करणे आवश्यक आहे. कोणत्या विकास कामाला प्राधान्य द्यावे, विमानतळाचे विस्तारीकरण करायचे असेल तर बाह्यवळण चौपदरीकरण रस्ता निर्माण केल्याशिवाय ते शक्य नाही, असेही आ. जगताप म्हणाले.