शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
7
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
8
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
9
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
10
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
11
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
12
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
13
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
15
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
16
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
17
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
18
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
19
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
20
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
Daily Top 2Weekly Top 5

९० टक्के महिलांमध्ये हिमोग्लोबीनची कमतरता

By admin | Updated: February 26, 2017 00:02 IST

सकस आहाराची कमतरता, धकधकीचे जीवन, आरोग्य समस्यांडे होत असलेले दुर्लक्ष यामुळे ९० टक्के महिलांमध्ये हिमोग्लोबीनचे प्रमाण असल्याचे ...

ग्रामीण भागात वाढला टक्का : औषधी घेण्याकडे महिलांची उदासीनताअमरावती : सकस आहाराची कमतरता, धकधकीचे जीवन, आरोग्य समस्यांडे होत असलेले दुर्लक्ष यामुळे ९० टक्के महिलांमध्ये हिमोग्लोबीनचे प्रमाण असल्याचे आरोग्य विभागाच्या तपासणीत आढळून आले आहे. ग्रामीण भागात या प्रमाणाचा टक्का अधिक आहे. शासकीय रुग्णालयात मोफत औषधांची सोय असूनही, महिला औषधी घेण्यास पुढे येत नाहीत. यामुळे समस्यांमध्ये भर पडत आहे. यामध्ये थायरॉईडचे प्रमाण मात्र कमी आहे. केवळ तीन टक्के महिलाच या आजाराने त्रस्त आहेत. कुटुंबाचा गाडा हाकताना महिलांचे स्वत:च्या प्रकृतीकडे दुर्लक्ष होते. जेवणेवेळेवर न करणे ही अनेक महिलांना सवय आहे. जेवण करताना देखील शिळे अन्न टाकून द्यायची त्यांची इच्छा होत नाही, महिलांच्या आरोग्यावर परिणाम होतो. हिमोग्लोबीनचे प्रमाण झपाट्याने कमी होत जाते.गर्भवतींमध्ये प्रमाण अधिकअमरावती : महिलांमध्ये किमान १२ टक्क्याचे प्रमाण आवश्यक आहे. परंतु, सध्या हे प्रमाण ७ ते ८ टक्क्यांवरच आले आहे. त्यामुळे प्रसूतीच्यावेळी रक्तदाब वाढून रुग्णाच्या जीवाला धोका उत्पन्न होतो. त्यामुळे प्रसूतीकाळात महिलांनी खाण-पानावर विशेष लक्ष देणे गरजेचे आहे.बाळाला थायरॉईडचा धोकाजिल्ह्यातील ३ टक्के महिला थायरॉईडने ग्रस्त आहेत. वयाच्या तिशीनंतर होणारा हा आजार आता १० ते १२ वर्षांतदेखील होऊ लागला आहे. शरीरातील आयोडीनचे प्रमाण कमी झाल्यास तो उद्भवतो. अशा रुग्णांचे वजन वाढणे, मानसिक आजार होणे, केस पिकणे, लहान मुली लवकर वयात येणे आदी लक्षणे दिसतात. गर्भधारणेच्या वेळी आईला थायरॉईडचा आजार असल्यास तो बाळालाही होऊ शकतो, असे डॉक्टरांनी सांगितले. घरच्यांची काळजी घेण्याच्या व्यापात महिला स्त:कडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे हिमोग्लोबीन कमी होणे आदी समस्या उद्भवतात. हिमोग्लोबीन वाढण्यासाठी औषधी घेण्यासोबतच सकस आहार घेणेसुद्धा महत्त्वाचे आहे.- अंजली देशमुख, स्त्रीरोग तज्ज्ञ