शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
2
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
3
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
4
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
6
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
7
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
8
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
9
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
10
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
11
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
12
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
13
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
14
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
15
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
16
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
17
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
18
डे-वन टेक-ऑफ घेण्यासाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज; २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांना हाेणार सुरुवात
19
आज मुंबई आयआयटीत  रंगणार ‘टेकफेस्ट’चा जागर; तंत्रज्ञानाचा महाकुंभ अनुभवण्याची तरुणाईला संधी
20
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

तीन हजार हेक्टर क्षेत्रावरील मृगबहर गळाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:12 IST

अवकाळी पाऊस : गहू, चणा, भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान मोर्शी : सलग तीन दिवस कोसळलेल्या अवकाळी पावसामुळे ...

अवकाळी पाऊस : गहू, चणा, भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान

मोर्शी : सलग तीन दिवस कोसळलेल्या अवकाळी पावसामुळे मोर्शी तालुक्यातील ३८६१ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले. त्यात सर्वाधिक ३१८० हेक्टर क्षेत्रावरील संत्र्याच्या मृग बहराला फटका बसला. पाठोपाठ ५३० हेक्टर क्षेत्रातील गहू पिकाचे नुकसान झाले. २२ हेक्टरवरील भाजीपाला मातीमोल झाला. १८ ते २० मार्च दरम्यान कोसळलेल्या या अवकाळी पावसाने तालुक्यातील ४३ गावांना दणका दिला.

मोर्शी तालुक्यात गेल्या वर्षी खरीप हंगामात अवकाळी पावसामुळे व गारपिटीमुळे अतोनात हानी झाली होती. त्यामध्ये हजारो हेक्टरवरील संत्रासह खरीप पिके नष्ट झाल्यानंतरही मोठ्या उमेदीने शेतकरी सावरले होते. मधल्या काळात कीड-रोगांमुळे पुन्हा हजारो हेक्टरवरील पिके नष्ट झाली. मात्र, शेतकरी या संकटांमधून सावरत रबीकडे वळला होता. मात्र, आता अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे मोर्शी तालुक्यातील शेकडो हेक्टरवरील पिकांची हानी झाल्याचा प्राथमिक अहवाल आहे. रबी हंगामातील संत्रा, गहू व हरभरा ही पिके काढणीच्या अवस्थेत असताना जोरदार वादळासह गारपीट व पाऊस झाला. महसूल व कृषी विभागामार्फत तात्काळ पंचनामे करण्यात यावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

हवामान बदलाचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. वातावरण अचानक ढगाळ होऊन जोरदार हवेसह आलेल्या अवकाळी पावसामुळे व गारपिटीमुळे फळबागांनाही फटका बसला आहे. तालुक्यात चार दिवसांपासून अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. आता पुन्हा ४ दिवस हवामान खात्याने गारपीट व अवकाळी पावसाचा इशारा दिलेला असल्यामुळे शेतकरी चिंतेत आहे. तीन दिवसांपासून रोज पडलेल्या अवकाळी पावसामुळे रबीचे उत्पादन ५० टक्क्यांनी घटणार आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी या गंभीर समस्येची दखल घेऊन शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पंचनामे करून त्याचा अहवाल शासनाकडे पाठविण्यात यावा, अशी मागणी शेतकरी बांधवांनी केली आहे.

चौकट

सर्वाधिक नुकसान मृग बहाराचेच

जिल्ह्याच्या १४ पैकी १० तालुक्यांना अवकाळी पावसाचा फटका बसला. यात सर्वाधिक नुकसान संत्रा मृग बहराचे झाल्याचा अहवाल आहे. १० तालुक्यातील एकूण ११ हजार ६८८ हेक्टर क्षेत्रावरील मृग बहर गळाला. यात सर्वाधिक ५१२७ हेक्टर क्षेत्र चांदूर बाजार तालुक्यातील आहे. पाठोपाठ मोर्शी तालुक्यातील ३१८० हेक्टर, अचलपूर तालुक्यातील २९६९ हेक्टर क्षेत्राला फटका बसला.

हातातोंडाशी आलेला घास हिरावला

तीन ते चार दिवसांपासून सुरू असलेल्या गारपीट व वादळी पावसाने मोर्शी तालुक्यातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. हातातोंडाशी आलेला रबी पिकांचा घास हिरावला गेल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. २२ व २३ मार्च रोजीदेखील मोर्शी तालुक्यातील अनेक गावांत ढगाळ वातावरण होते. तालुक्यातील १०४ हेक्टरवरील चण्याचेदेखील वादळी अवकाळी पावसाने नुकसान केले.

पान २ चे लिड