शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
2
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
3
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
4
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
5
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
6
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
7
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
8
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
9
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
10
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
11
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
12
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
13
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
14
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
15
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
16
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
17
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
18
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
19
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
20
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

तीन हजार हेक्टर क्षेत्रावरील मृगबहर गळाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:12 IST

अवकाळी पाऊस : गहू, चणा, भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान मोर्शी : सलग तीन दिवस कोसळलेल्या अवकाळी पावसामुळे ...

अवकाळी पाऊस : गहू, चणा, भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान

मोर्शी : सलग तीन दिवस कोसळलेल्या अवकाळी पावसामुळे मोर्शी तालुक्यातील ३८६१ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले. त्यात सर्वाधिक ३१८० हेक्टर क्षेत्रावरील संत्र्याच्या मृग बहराला फटका बसला. पाठोपाठ ५३० हेक्टर क्षेत्रातील गहू पिकाचे नुकसान झाले. २२ हेक्टरवरील भाजीपाला मातीमोल झाला. १८ ते २० मार्च दरम्यान कोसळलेल्या या अवकाळी पावसाने तालुक्यातील ४३ गावांना दणका दिला.

मोर्शी तालुक्यात गेल्या वर्षी खरीप हंगामात अवकाळी पावसामुळे व गारपिटीमुळे अतोनात हानी झाली होती. त्यामध्ये हजारो हेक्टरवरील संत्रासह खरीप पिके नष्ट झाल्यानंतरही मोठ्या उमेदीने शेतकरी सावरले होते. मधल्या काळात कीड-रोगांमुळे पुन्हा हजारो हेक्टरवरील पिके नष्ट झाली. मात्र, शेतकरी या संकटांमधून सावरत रबीकडे वळला होता. मात्र, आता अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे मोर्शी तालुक्यातील शेकडो हेक्टरवरील पिकांची हानी झाल्याचा प्राथमिक अहवाल आहे. रबी हंगामातील संत्रा, गहू व हरभरा ही पिके काढणीच्या अवस्थेत असताना जोरदार वादळासह गारपीट व पाऊस झाला. महसूल व कृषी विभागामार्फत तात्काळ पंचनामे करण्यात यावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

हवामान बदलाचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. वातावरण अचानक ढगाळ होऊन जोरदार हवेसह आलेल्या अवकाळी पावसामुळे व गारपिटीमुळे फळबागांनाही फटका बसला आहे. तालुक्यात चार दिवसांपासून अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. आता पुन्हा ४ दिवस हवामान खात्याने गारपीट व अवकाळी पावसाचा इशारा दिलेला असल्यामुळे शेतकरी चिंतेत आहे. तीन दिवसांपासून रोज पडलेल्या अवकाळी पावसामुळे रबीचे उत्पादन ५० टक्क्यांनी घटणार आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी या गंभीर समस्येची दखल घेऊन शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पंचनामे करून त्याचा अहवाल शासनाकडे पाठविण्यात यावा, अशी मागणी शेतकरी बांधवांनी केली आहे.

चौकट

सर्वाधिक नुकसान मृग बहाराचेच

जिल्ह्याच्या १४ पैकी १० तालुक्यांना अवकाळी पावसाचा फटका बसला. यात सर्वाधिक नुकसान संत्रा मृग बहराचे झाल्याचा अहवाल आहे. १० तालुक्यातील एकूण ११ हजार ६८८ हेक्टर क्षेत्रावरील मृग बहर गळाला. यात सर्वाधिक ५१२७ हेक्टर क्षेत्र चांदूर बाजार तालुक्यातील आहे. पाठोपाठ मोर्शी तालुक्यातील ३१८० हेक्टर, अचलपूर तालुक्यातील २९६९ हेक्टर क्षेत्राला फटका बसला.

हातातोंडाशी आलेला घास हिरावला

तीन ते चार दिवसांपासून सुरू असलेल्या गारपीट व वादळी पावसाने मोर्शी तालुक्यातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. हातातोंडाशी आलेला रबी पिकांचा घास हिरावला गेल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. २२ व २३ मार्च रोजीदेखील मोर्शी तालुक्यातील अनेक गावांत ढगाळ वातावरण होते. तालुक्यातील १०४ हेक्टरवरील चण्याचेदेखील वादळी अवकाळी पावसाने नुकसान केले.

पान २ चे लिड