शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
2
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
3
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
4
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
5
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
6
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
7
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
8
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
9
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
10
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
11
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
12
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
13
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
14
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
15
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
16
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
17
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
18
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
19
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
20
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका

मृग फुटलाच नाही, आंबियालाही गळती

By admin | Updated: August 19, 2014 23:25 IST

संत्रा बागांमध्ये अन्नद्रव्य व्यवस्थापनाचे प्रमाण कमी झाल्याने आणि पावसाने दडी मारल्याने जिल्ह्यातील संत्र्याच्या आंबिया बहाराला गळती लागली आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांची भिस्त मृगबहारावर होती.

सचिन सुंदरकर - अमरावतीसंत्रा बागांमध्ये अन्नद्रव्य व्यवस्थापनाचे प्रमाण कमी झाल्याने आणि पावसाने दडी मारल्याने जिल्ह्यातील संत्र्याच्या आंबिया बहाराला गळती लागली आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांची भिस्त मृगबहारावर होती. परंंतु मृगबहाराचीही फूट नसल्याने जिल्ह्यातील संत्राउत्पादक शेतकरी हादरला आहे.अमरावती जिल्ह्यात सुमारे ८० हजार हेक्टरमध्ये संत्र्याचे उत्पादन घेतले जाते. त्यापैकी ४५ टक्के क्षेत्र मोर्शी व वरुड तालुक्यातील आहे. नैेसर्गिक वातावरण आणि पावसाअभावी ७० हजार हेक्टरमधील संत्रा बागावर मृगबहाराची फूट नाही. यंदा पाऊस दरवर्षीच्या तुलनेत कमी झाल्याने आणि वातावरणात कमालीचा बदल होत गेल्याने आंबिया बहाराची संत्री सुध्दा गळू लागली. जिल्ह्यात ७८ हजार ४८० हेक्टरक्षेत्रात संत्र्याचे उत्पादन घेण्यात येते. यापैकी संत्रा उत्पादन हे ५४ हजार ९९५ हेक्टरमध्ये घेण्यात येते. उर्वरित २४ हजार २८५ हेक्टरमधील संत्रा झाडे ही १ ते ६ वर्ष वयाची आहे. जिल्ह्यातील अन्य तालुक्यात देखिल सिंचनासाठी पाण्याची कमतरता असल्यामुळे ६० ते ७० टक्के संत्रा उत्पादक नैेसर्गिकरित्या येणाऱ्या मृगबहारालाच प्राधान्य देतात. संत्र्याला आंबिया बहार हा साधारणत: जानेवारी महिन्यात फुटतो. परंंतु जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांजवळ संत्रा बागांना पाणी देण्याची सोय आहे. ते शेतकरी आंबिया बहार फोडतात. तर उर्वरित शेतकरी पाण्याची सोय नसल्याने मृगबहाच्या आशेवर असतो. मृगबहार फोडण्यासाठी झाडांना ताण दिला जातो. याला तळण देणे असे म्हणतात. परिणामी झाडे छोट्या फांद्यामध्ये अन्नद्रव्ये साठवितात. जून महिन्यात मृगाचा पाऊस पडल्यानंतर आर्द्रता निर्माण होते. त्यावेळी साठवलेली अन्नद्रव्ये मृगबहारासाठी प्रतिकूल स्थिती असल्याने संत्रा उत्पादक शेतकरी आता चांगलेच अडचणीत आले आहे. ज्या शेतकऱ्यांकडे संत्रा झाडे आहेत ते शेतकरी इतर पीके घेऊ शकत नाही. त्यांची भिस्तच संत्र्यावर अवलंबून असते. एप्रिल मे महिन्यात तडन दिलेल्या झाडांची वाढ थांबते. झाड जगण्यासाठी अन्नद्रव्ये साठवितात. मृगाचा पाऊस आल्यानंतर झाडाला नवती किंंवा मृगबहार फुटतो. परंतु यंदा पाऊस नसल्याने विपरित स्थिती आहे.