बुलडाणा : शासनाकडून राष्ट्रीय भूमि अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रम राबविला जाणार आहे. यातून विभागातील महसूल आणि भूमि अभिलेख विभागातील दिड कोटी महत्वपुर्ण जून्या दस्ताएैवजाचे संगणकीय स्कॅनिंग करण्यात येणार आहे. राज्यातील सर्व तहसिलदार, उपअधिक्षक भूमि अभिलेख, नगर भूमापन अधिकारी यांच्या कार्यालयातील महत्वाच्या भूमि अभिलेख्यांचे स्कॅनिंग करण्यासाठी तिन खाजगी संस्थाची निवडण्यात आले आहे. प्रत्येक संस्थेला विभागानुसार जिल्ह्यातील कामांची जवाबदारी देण्यात आली आहे. अमरावती विभागातील अमरावती, वाशिम, यवतमाळ, आकोला, बुलडाणा जिल्ह्यात आधुनिक भूमि अभिलेख कक्ष उभारण्याचा मानस आहे. ई-महाभूमि प्रकल्प व्यवस्थापन संस्था यांच्याकडून निवडण्यात आलेल्या तिन खाजगी संस्था सर्व जून्या महत्वपूर्ण कागदपत्रांचे स्कॅनिंग करुन डाटा सेव्ह केला जाणार आहे. यावर शासनाचे नियंत्रण राहणार आहे. यामुळे शासकीय कामात पारदर्शता येणार आहे.
दिड कोटी कागदपत्रांचे होईल ‘स्कॅनिंग’
By admin | Updated: June 12, 2014 22:43 IST