शहरं
Join us  
Trending Stories
1
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
2
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
3
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
4
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
5
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
6
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
7
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
8
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
9
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
10
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
11
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
12
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
13
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
14
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
15
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
16
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
17
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
18
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
19
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
20
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला

जमिनीचे आरोग्य बिघडले सेंद्रिय कर्बाचे प्रमाणात कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2021 05:00 IST

जमीन हा पुनर्निर्माण न होणारा स्त्रोत असल्याने संवर्धन करणे महत्त्वाचे आहे. पोत खराब होत असल्याने उत्पादन खर्च वाढून अपेक्षित परिणाम साध्य होत नाही. त्यामुळे जमिनीची आरोग्य तपासणी महत्त्वाची आहे. त्यामुळे जमिनीतील अन्नद्रव्यांचे प्रमाण समजते, शिफारशींनुसार पिकास समतोल प्रमाणात खतांची मात्रा देता येते. याद्वारे भौतिक रासायनिक व जैविक गुणधर्म टिकविण्यास मदत होते. 

गजानन मोहोडलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : रासायनिक खतांचा अनिर्बंध वापरासह  सतत पाण्याखाली राहिल्याममुळे जिल्ह्यातील जमिनीचे आरोग्य बिघडले आहे. ती खतांना प्रतिसाद देत नाही. दिवसेंदिवस सेंद्रीय कर्बाचे प्रमाणात कमी आढळून येत आहे. तसे निरीक्षण  ५८,५६८ नमुन्यांच्या चाचनीनंतर मृद् सर्वेक्षण चाचणी प्रयोगशाळेद्वारा नोंदविण्यात आलेले आहे.जमीन हा पुनर्निर्माण न होणारा स्त्रोत असल्याने संवर्धन करणे महत्त्वाचे आहे. पोत खराब होत असल्याने उत्पादन खर्च वाढून अपेक्षित परिणाम साध्य होत नाही. त्यामुळे जमिनीची आरोग्य तपासणी महत्त्वाची आहे. त्यामुळे जमिनीतील अन्नद्रव्यांचे प्रमाण समजते, शिफारशींनुसार पिकास समतोल प्रमाणात खतांची मात्रा देता येते. याद्वारे भौतिक रासायनिक व जैविक गुणधर्म टिकविण्यास मदत होते. शेतातील मातीचा नमुना तपासल्यानंतर जमिनीचा आम्ल विम्ल निर्देशांक (पीएन व सामू), क्षारता, सेंद्रिय कर्ब, उपलब्ध स्फुरद, पालाश, नत्र, तांबे, लोह, जस्त, मंगल, बोरॉन व गंधक आदी घटकांचे पिकांना आवश्यक असणारे प्रमाण कळते. यासाठी माती नमुना घेण्याचीदेखील विशिष्ट पद्धत आहे. नमुना पिके काढण्यापूर्वी किंवा काढल्यानंतर घ्यावा लागतो. गुरे बसण्याची किंवा झाडाखालील जागा नको, खते व कचरा टाकल्याची जागा, बांधाजवळचे क्षेत्राजवळील नमुना घेऊ नये. शिफारशीनुसार शेतकऱ्यांनी रासायनिक खताचा वापर करावा, असे जिल्हा कृषी विभागाने सांगितले. 

क्षारयुक्त जमिनीसाठी उपाययोजनाक्षार संवेदनशील क्षेत्रात तूर, वाटाणा, तीळ, मुळा, चवळी, घेवडा, भेंडी, कोबी, रताळी, संत्री, मोसंबी, लिंबू व आंबा पिके घ्यावीत. मध्यम प्रकारात भात, ज्वारी, गहू, ज्वारी, मका, बाजरी, मोहरी, करडई, सूर्यफूल, एरंडी, सोयाबीन, भुईमूग, टोमॅटो, कांदा, बटाटा, गांजर, लसूण व काकडी तसेच पाण्याच्या वापरामुळे क्षाराचे प्रमाण वाढल्यास जिप्समच्या मात्रेचा वापर करावा.

सुपिकता वाढविण्यासाठी ही उपाययोजना जमिनीत आम्ल जास्त वाढल्यास  हेक्टरी ०.५ ते २.५ टन चुनखडीची पावडर वापरावी. विम्लयुक्त प्रमाण जास्त आढळल्यास चर खोचून पाण्याचा निचरा करावा व जिप्समपूड सेंद्रीय खत व प्रेसमड द्यावे. सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता भासल्यास सेंद्रिय खतांचा वापर वाढवावा, लोहाची कमतरता असल्यास फेरस सल्फेट, हेक्टरी २५ ते ३० किलो वापरावे, तांब्याची कमतरता असल्यास कॉपर सल्फेट हेक्टरी १० ते १२५ किलो वापरावे, मंगल कमी असल्यास मॅगनीज सल्फेट हेक्टरी १० ते २५ किलो वापरावे.

जमिनीची उत्पादकता १६ घटकांवर अवलंबूनमुख्य अन्नघटक : हायड्रोजन, ऑक्सिजन, कार्बन, नत्र, स्फुरद व पालाश दुय्यम अन्नघटक : कॅल्शिअम, मॅग्नेशियम व गंधकसूक्ष्म अन्नघटक : लोह, मंगल, तांबे, जस्त, मॉलिब्डेनम, बोरॉन व क्लोरिन

मातीपरीक्षण आधारित खतांचा वापर करावा. खतांच्या असंतुलित वापरामुळे जमिनीचा पोत खराब होत आहे, सेंद्रिय कर्बाचे प्रमाणही कमी झाल्याचे दिसून येते. यासाठी सेंद्रिय खतांचा वापर करावा.- प्रफुल्ल सातव जिल्हा मृद् सर्वेक्षण, मृद् चाचणी अधिकारी

 

टॅग्स :agricultureशेती