शहरं
Join us  
Trending Stories
1
एखाद्याला खूश करण्यासाठी मुलांचे भविष्य खराब करू नका, हिंदी सक्तीवरून सुप्रिया सुळे भडकल्या!
2
शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
3
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, आज 'या' राशीतील लोकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक
4
झटपट पैसे कमावण्यासाठी पती-पत्नीने सुरू केला असा धंदा, अश्लील चॅट, व्हिडीओ आणि...
5
आता मोबाइल ॲपद्वारे कुठूनही करता येणार मतदान; कोणत्या मतदारांना मिळणार अधिकार?
6
Shefali Jariwala: शेफाली जरीवालाच्या शेवटच्या एक्स पोस्टमध्ये 'या' व्यक्तीच्या नावाचा उल्लेख!
7
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
8
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
9
तरुण जोडप्यांना मुलांची आस, पण तरीही का घसरतोय देशाचा प्रजनन दर?
10
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
11
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
12
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
13
विशेष लेख: इंदिरा गांधी यांच्या जागी दुसरे कुणी असते तरीही...
14
जुलैमध्ये १३ दिवस बँका राहणार बंद; राज्यनिहाय वेगळ्या सुट्ट्या, महाराष्ट्रात किती दिवस राहणार बंद?
15
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
16
अग्रलेख: अंतराळात भारतीय शुभकिरण! भारताचे स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण
17
लेख: तुमच्या घरातला एसी आता ‘फार’ थंड नाही होणार!
18
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
19
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
20
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले

सिंंचन प्रकल्पांच्या पातळीत घट

By admin | Updated: January 11, 2015 22:44 IST

अत्यल्प पर्जन्यमानामुळे तालुक्याला तीव्र पाणीटंचाईला सामोरे जाण्याची शक्यता असल्याचा सिंचन विभागाने वर्तविली आहे. तालुक्यातील ९ प्रकल्पांमध्ये केवळ ७० टक्केच जलसाठा आहे.

संजय खासबागे - वरुडअत्यल्प पर्जन्यमानामुळे तालुक्याला तीव्र पाणीटंचाईला सामोरे जाण्याची शक्यता असल्याचा सिंचन विभागाने वर्तविली आहे. तालुक्यातील ९ प्रकल्पांमध्ये केवळ ७० टक्केच जलसाठा आहे. जलाशयांमध्ये पावसाळयात १०० टक्के जलसाठा संचयित झाला होता. परंतु आॅगस्टनंतर पुन्हा पावसाने दडी मारल्याने नद्या कोरड्या पडल्या आहेत. त्यामुळे तालुक्यात तीव्र पाणीटंचाईचे सुतोवाच सिंचन विभागाने केले आहे. पाटबंधारे विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, शेकदरी प्रकल्पाची पूर्ण जलसंचयन क्षमता ५१४.६५ मीटर असून ओलीत क्षमता १ हजार ३४० हेक्टर, पुसली प्रकल्पामध्ये पूर्ण जल संचयन क्षमता १००.६० मीटर असून ओलीत क्षमता ३०९ हेक्टर, वाई प्रकल्पामध्ये पूर्ण जलसंचय क्षमता ४६१.७७ मिटर असून ओलीत क्षमता ३७० हेक्टरची आहे. सातनूर प्रकल्पामध्ये पूर्ण जल संचय क्षमता ५००.७५ मीटर तर ओलीत क्षमता २९९ हेक्टर, पंढरी प्रकल्पामध्ये पूर्ण जलसंचय क्षमता ४४८.३० मीटर तर ओलीत क्षमता १५३ हेक्टर, जामगाव प्रकल्पामध्ये पूर्ण जलसंचय क्षमता ४८०.५० मीटर असून ओलीत क्षमता १२१ हेक्टर, नागठाणा प्रकल्पामध्ये पूर्ण जलसंचय क्षमता ४८१.६० मीटर असून ओलीत क्षमता २१२ हेक्टर, जमालपूर प्रकल्पामध्ये पूर्ण जलसंचय क्षमता १०४.१० मीटर असून ओलीत क्षमता १२२ हेक्टर, बेलसावंगी प्रकल्पामध्ये पूर्ण जलसंचय क्षमता १०४.१० मीटर असून ओलीत क्षमता १२१ हेक्टर, लोणी धवलगिरी प्रकल्पाची ओलीत क्षमता ६३६ हेक्टरची आहे आहे. वघाळ बंधारा असून याची ओलीत क्षमता ४९६ हेक्टरची आहे. सिंंचन व्यवस्थापन शाखा वरुडच्या कक्षेत येत असलेल्या सिंंचन प्रकल्पांची ओलीत क्षमता ५ हजार १५५ हेक्टर असून सिंंचन क्षेत्र २ हजार ३५० हेक्टर ओलीत क्षेत्र आहे. यावर्षी आॅगस्टमध्ये सर्व प्रकल्पांमध्ये १०० टक्के जलसाठा होता. नंतरच्या काळात पावसाने दडी मारल्याने आणि तापमानातसुध्दा वाढ झाल्याने जलसाठा कमी होऊन जानेवारीमध्ये केवळ ७० टक्केच जलसाठा शिल्लक आहे. एरवी जानेवारीपर्यंत वाहणाऱ्या नद्यासुध्दा कोरड्या पडल्या आहेत. रबी हंगामाकरिता सिंचन प्रकल्पातून पाणी वापर संस्थांना पाणी द्यावे लागते. या व्यतिरिक्त काही गावांनाही पिण्याकरिता पाणीपुरवठा होत आहे. पाकनाला प्रकल्पाला दरवाजा नसल्याने जलसंचय होऊ शकला नाही. नागठाणा-२,मध्ये पाणी साठविणे सुरु आहे. तालुक्यातील १४ पाणी वापर संस्था असून वरुड तालुक्यातील संत्रा उत्पादकांकरिता सिंचन व्यवस्था नसल्याने हवालदिल झाले आहेत. पाणी पातळी खोलवर गेली आहे. तालुक्यातील २३ हजार ५०० हेक्टरमध्ये संत्राबागा आहेत. यापैकी १६ हजार हेक्टरमध्ये फळधारणा करणारी संत्राझाडे आहेत. गहू, हरभरा तसेच संत्रा, कपाशी, मिरची आदी बागायती पिके घेण्यात येतात. परंतु अत्यल्प पर्जन्यमानामुळे पाणीटंचाई निर्माण होण्याची दाट शक्यता सिंचन विभागाचे अभियंता सोनारे यांनी व्यक्त केली आहे.