शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
2
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
3
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
4
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
5
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
6
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
7
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
8
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’
9
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
10
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
11
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
12
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
13
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
14
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
15
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
16
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
17
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
18
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
19
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
20
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य

सिंचन प्रकल्पाच्या पातळीत घट

By admin | Updated: January 5, 2016 00:10 IST

विदर्भाचा कॅलिफोर्निया म्हणून नावारुपास आलेला वरुड तालुका अत्यल्प पर्जन्यमानामुळे तीव्र पाणी टंचाईला सामोरे जाण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे...

नद्या कोरड्या : सिंचन प्रकल्पात ८० टक्के जलसाठावरूड : विदर्भाचा कॅलिफोर्निया म्हणून नावारुपास आलेला वरुड तालुका अत्यल्प पर्जन्यमानामुळे तीव्र पाणी टंचाईला सामोरे जाण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे सिंचन विभाग सांगत आहे. तालुक्यात ९ प्रकल्प असून यावर्षी पावसाळ्यात १०० टक्के ेजलसाठा संचयित झाला होता. आॅगष्टनंतर पावसाने दडी मारल्याने जानेवारीपर्यंत वाहत्या नदीचा प्रवाहसुध्दा खंडित झाला. पाणी वापर संस्थांनी वेळेआधीच पिकांना पाणी सोडण्याकरिता मागणी केली आहे. नोव्हेंबरमध्ये सिंचन प्रकल्पात केवळ ८० टक्के जलसाठा असल्याने येत्या काळात तीव्र पाणीटंचाईचे सुतोवाच सिंचन विभागाने केले आहे. शेकदरी प्रकल्प व पाटबंधारे विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, शेकदरी प्रकल्प पूर्ण जल संचय क्षमता ५१४.६५ मिटर असून ओलीत क्षमता १ हजार ३४० हेक्टर, पुसली प्रकल्पामध्ये पूर्ण जल संचय क्षमता १००.६० मिटर असून ओलीत क्षमता ३०९ हेक्टर, वाई प्रकल्पामध्ये पूर्ण जल संचय क्षमता ४६१.७७ मिटर असून ओलीत क्षमता ३७० हेक्टरची आहे. सातनूर प्रकल्पामध्ये पूर्ण जल संचय क्षमता ५००.७५ मिटर तर ओलीत क्षमता २९९ हेक्टर, पंढरी प्रकल्पामध्ये पूर्ण जल संचय क्षमता ४४८.३० मिटर तर ओलीत क्षमता १५३ हेक्टर, जामगांव प्रकल्पामध्ये पूर्ण जल संचय क्षमता ४८०.५० मिटर असून ओलीत क्षमता १२१ हेक्टर, नागठाणा प्रकल्पामध्ये पूर्ण जल संचय क्षमता ४८१.६० मिटर असून ओलीत क्षमता २१२ हेक्टर, जमालपूर प्रकल्पात पूर्ण जलसंचय क्षमता १०४.१० मिटर असून ओलीत क्षमता १२२ हेक्टर, बेलसावंगी प्रकल्पात पूर्ण जलसंचय क्षमता १०४.१० मिटर असून ओलीत क्षमता १२१ हेक्टर, लोणी धवलगिरी प्रकल्पाची ओलीत क्षमता ६३६ हेक्टरची आहे. वघाळ बंधाराची ओलीत क्षमता ४९६ हेक्टर आहे. सिंंचन व्यवस्थापन शाखा वरुडच्या कक्षेत येतो. सिंंचन प्रकल्पाची ओलीत क्षमता ५ हजार १५५ हेक्टरची असून सिंचन क्षेत्र २ हजार ३५० हेक्टर ओलीत क्षेत्र आहे. यावर्षी प्रकल्पात १०० टक्के ेजलसाठा होता. जानेवारीमध्ये केवळ ८० टक्के आहे. रब्बी हंगामाकरीता सिंचन प्रकल्पातून पाणी वापर संस्थांना पाणी द्यावे लागते. नद्यांना पाणी सोडावे लागते. याव्यतिरिक्त काही गावांना पिण्याकरिता पाणी पुरवठा केला जातो. याव्यतिरिक्त पाकनाला प्रकल्पसुध्दा दरवाजा बसलेला नसल्याने तांत्रिक दोषाअभावी जलसंचय होऊ शकला नाही तर, नागठाणा-२,मध्ये पाणी साठविणे सुरु आहे. तालुक्यातील १४ पाणी वापर संस्था असून वरुड तालुक्यातील संत्रा उत्पादक शेतकरी सिंचनाकरिता आवश्यक व्यवस्था नसल्याने हवालदिल झाले. पाण्याची पातळी खोलवर गेली आहे. तालुक्यात २३ हजार ५०० हेक्टर शेतजमीन संत्रा लागवडीखाली आहे. यापैकी १७ हजार हेक्टर जमिनीत फळधारणा करणारी संत्रा झाडे आहे. रबी हंगामातील गहू, चना तसेच संत्रा आणि कपाशी, मिरची आदी पिके घेण्यात येते. अत्यल्व पर्जन्यमानामुळे शेती व पाणी पुरवठयात तुटवडा येण्याची दाट शक्यता सिंचन विभागाचे अभियंता सोनारे यांनी व्यक्त केली आहे.