शहरं
Join us  
Trending Stories
1
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
2
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
3
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
4
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
5
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
6
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
7
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
8
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!
9
महिला अधिकारी तुरुंगात गुंडाशी फोनवर अश्लील बोलायची, पत्रेही सापडली; धक्कादायक माहिती उघड
10
विधानसभेच्या नो पार्किंगमध्ये उभी होती मंत्र्यांची कार, वाहतूक पोलिसांनी क्रेन आणली आणि...
11
बेपत्ता अर्चनाला शोधण्यासाठी पोलिसांना नवा प्लॅन; ८ दिवसांपासून ती गायब, ६ टीम अलर्ट
12
'तारीख-वार तुम्ही ठरवा, मी यायला तयार...'; बागेश्वर बाबाने स्वीकारलं अखिलेश यादवंचे 'चॅलेंज'
13
Krishna Janmashtami 2025: टीव्हीवर बालकृष्णाची भूमिका साकारणारी चिमुरडी आता दिसते खूप वेगळी, सध्या ती काय करते?
14
भारताच्या स्वातंत्र्याने खलिस्तान्यांना होतोय त्रास; ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यांवर गोंधळ घातला
15
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
16
पाकिस्तानमध्ये हाहाकार! ढगफुटी, पूर आणि भूस्खलनात ४१ लोकांचा मृत्यू, असंख्य बेपत्ता; पाचशे पर्यटक अडकले
17
प्रियकराची ओढ, पत्नीचं संसाराकडे दुर्लक्ष; त्यानंतर पतीने जे केले..., सासरचे जावयावरच उलटले
18
सुदर्शन चक्र, दहा वर्षात तयार होणार भारताचं स्वदेशी सुरक्षा कवच, सर्व शस्त्रास्त्रे ठरणार निष्प्रभ, अशी आहे योजना
19
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
20
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव

पश्चिम विदर्भात ३५ तालुक्यांतील भूजलात १० फुटांपर्यंत घट; सरासरीपेक्षा कमी-अधिक पावसाचा परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2018 16:33 IST

यंदा सरासरीपेक्षा कमी-अधिक पावसाने विभागातील ३५ तालुक्यांमध्ये भूजलात १० फुटांपर्यंत घट व २१ तालुक्यांत वाढ नोंदविण्यात आली आहे.

अमरावती : यंदा सरासरीपेक्षा कमी-अधिक पावसाने विभागातील ३५ तालुक्यांमध्ये भूजलात १० फुटांपर्यंत घट व २१ तालुक्यांत वाढ नोंदविण्यात आली आहे. भूजल सर्वेक्षण विभागाने याकरिता आॅक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात ६८० निरीक्षण विहिरीतील पाणीपातळीच्या नोंदी घेतल्या. यावरून किती गावांमध्ये पाणीटंचाई राहणार, याचा अहवाल शासनाला या आठवड्यात सादर होईल.यंदाच्या पावसाळ्यात अमरावती विभागात जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या कालावधीत ७७८ मिमी पाऊस अपेक्षित असताना, प्रत्यक्षात ६६३ मिमी पावसाची नोंद झाली. ही टक्केवारी ८५ आहे. अकोला व वाशिम जिल्ह्याने सरासरी पार केली असली तरी अमरावती जिल्ह्यात ७७ टक्के, यवतमाळ ७८, व बुलडाणा जिल्ह्यात ६९ टक्के पाऊस पडला. त्यामुळे ३५ तालुक्यांतील भूजलात १० फुटांपर्यंत घट झाली आहे. या तालुक्यांमध्ये भूजलाचे पुनर्भरण झालेलेच नाही. मात्र, २१ तालुक्यांतील भूजलात १० फुटांपर्यंत वाढ झाल्याचे निरीक्षण विहिरीतील स्थिर पाणीपातळीच्या नोंदीवरून स्पष्ट झाले आहे. भूजल सर्वेक्षण विभागाच्या माहितीनुसार, विभागातील ५६ पैकी आठ तालुक्यांमध्ये एक मीटरपर्यंत, १९ तालुक्यांमध्ये दोन मीटरपर्यंत, सात तालुक्यांमध्ये तीन मीटरपर्यंत तसेच एका तालुक्यात तीन मीटरपेक्षा जास्त तूट आलेली आहे. जिल्हानिहाय अमरावती जिल्ह्यात १२, अकोला जिल्ह्यात सात, वाशिम जिल्ह्यात एक, बुलडाणा जिल्ह्यात १३, तर यवतमाळ जिल्ह्यात दोन तालुक्यांतील भूजलात तूट नोंदविली गेली. 

यवतमाळात सर्वाधिक १४ तालुक्यातील भूजलात वाढअमरावती विभागात २१ तालुक्यांतील भूजलात वाढ झाल्याने रबी हंगामाचा दिलासा शेतकºयांना मिळाला आहे. यामध्ये एक मीटरपर्यंत नऊ तालुके, दोन मीटरपर्यंत आठ, तीन मीटरपर्यंत तीन, तर एका तालुक्यात तीन मीटरपेक्षा जास्त भूजलात वाढ झालेली आहे. अमरावती जिल्ह्यात दोन तालुक्यांमध्ये, वाशिम जिल्ह्यात पाच, तर यवतमाळ जिल्ह्यात १४ तालुक्यांमध्ये भूजल पातळीत वाढ झाली असल्याचे निरीक्षण विहिरींच्या नोंदीवरून स्पष्ट झाले आहे.

बसाल्ट खडकाने भूगर्भात पाणीसाठवण क्षमता घटलीविभागाची भूगर्भीय स्थिती पाहता, किमान ८२ टक्के भूभाग हा ‘बसाल्ट’ या कठीण या खडकाने व्यापला आहे. यात पाणीसाठवण क्षमता कमी आहे; मात्र यात भेगा व सांधे निर्माण झाल्याने थोडीफार साठवण होते. भूपृष्ठीय रचना व भूगर्र्भीय स्थितीवर झालेल्या पर्जन्यमानाचे भूजलात रूपांतर होणे महत्त्वाचे आहे. मात्र, सिंचन, औद्योगिक वापर, शहरीकरण व वाढत्या लोकसंख्येसाठी पाण्याची मागणी यामुळे या साठ्यातून भूजलाचा वारेमाप उपसा होत आहे.

टॅग्स :Amravatiअमरावती