शहरं
Join us  
Trending Stories
1
कुठल्याही क्षणी अटकेची शक्यता असताना माणिकराव कोकाटे पडले आजारी; लीलावती रुग्णालयात दाखल
2
“काँग्रेसचे पाक प्रेम उतू चाललेय, ऑपरेशन सिंदूरचा हिशोब विचारणारे देशद्रोही”: एकनाथ शिंदे
3
ढाका येथील भारतीय उच्चायुक्तालयाला धमकी, सरकारने बांगलादेशी अधिकाऱ्याला समन्स बजावले
4
भारतीय बाजारात उद्याच स्वस्तातली सात सीटर कार लाँच होणार; अर्टिगा, ट्रायबरला मिळणार टक्कर...
5
स्वस्त 'पर्सनल लोन'च्या शोधात आहात? 'या' ५ बँकांमध्ये मिळतोय सर्वात कमी व्याजदर; १२ लाखांचा EMI किती?
6
क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट, कोणत्याही क्षणी अटक होणार, आमदारकीही जाणार?
7
खुशखबर! थिएटरनंतर आता OTTवर दाखल होतोय 'धुरंधर', जाणून घ्या कुठे आणि कधी पाहता येणार?
8
PM मोदी जॉर्डन-ओमान दौऱ्यावर, तर जयशंकर इजराइलमध्ये; भारताचा जगाला स्पष्ट संदेश..!
9
मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी बुरखा हटवल्याने महिला डॉक्टर धक्क्यात; सरकारी नोकरी नाकारून सोडले राज्य
10
काव्या मारननं पारखलं सोनं! अनसोल्ड खेळाडूवर लावली बोली, त्यानं ४८ चेंडूत कुटल्या ७६ धावा
11
Post Office ची जबरदस्त स्कीम... घरबसल्या दर महिन्याला होईल २० हजार रुपयांची कमाई, कोणती आहे योजना, पाहा डिटेल्स
12
बुकिंग सुरू होताच 'या' कारवर तुटून पडले लोक, 24 तासांत 70000 यूनिट बूक; खिशात हवेत फक्त ₹21000
13
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दागिने घेताना १०० वेळा विचार करावा लागणार; चांदी २ लाखांच्या पार, सोन्याच्या दरातही मोठी तेजी
14
राजकीय सूडबुद्धीतून रचलेले प्रकरण, ईडी-सीबीआयचा गैरवापर; 'नॅशनल हेराल्ड'वरुन खरगेंची मोदी-शाहांवर टीका
15
...अन् त्यावेळी राष्ट्रपती बनण्याचा प्रस्ताव वाजपेयींनी नाकारला; 'अटल संस्मरण' पुस्तकात दावा
16
“मातोश्रीबाबत मनात आदर कायम, पण...”; शिंदे गटात प्रवेश करताच बड्या नेत्याने सगळेच सांगितले
17
Video - हार्ट अटॅकमुळे वेदनेने तडफडत होता पती; पत्नीने जोडले हात, पण कोणीच केली नाही मदत
18
शेतकऱ्यांसाठी मोठा अलर्ट! फार्मर आयडीशिवाय पीएम किसानचे पैसे येणार नाहीत; अशी तयार करा ID
19
‘मी काही चुकीचं बोललो नाही, माफी मागण्याचा प्रश्नच नाही..’, पृथ्वीराज चव्हाण ऑपरेशन सिंदूरबाबतच्या वक्तव्यावर ठाम  
Daily Top 2Weekly Top 5

पश्चिम विदर्भात ३५ तालुक्यांतील भूजलात १० फुटांपर्यंत घट; सरासरीपेक्षा कमी-अधिक पावसाचा परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2018 16:33 IST

यंदा सरासरीपेक्षा कमी-अधिक पावसाने विभागातील ३५ तालुक्यांमध्ये भूजलात १० फुटांपर्यंत घट व २१ तालुक्यांत वाढ नोंदविण्यात आली आहे.

अमरावती : यंदा सरासरीपेक्षा कमी-अधिक पावसाने विभागातील ३५ तालुक्यांमध्ये भूजलात १० फुटांपर्यंत घट व २१ तालुक्यांत वाढ नोंदविण्यात आली आहे. भूजल सर्वेक्षण विभागाने याकरिता आॅक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात ६८० निरीक्षण विहिरीतील पाणीपातळीच्या नोंदी घेतल्या. यावरून किती गावांमध्ये पाणीटंचाई राहणार, याचा अहवाल शासनाला या आठवड्यात सादर होईल.यंदाच्या पावसाळ्यात अमरावती विभागात जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या कालावधीत ७७८ मिमी पाऊस अपेक्षित असताना, प्रत्यक्षात ६६३ मिमी पावसाची नोंद झाली. ही टक्केवारी ८५ आहे. अकोला व वाशिम जिल्ह्याने सरासरी पार केली असली तरी अमरावती जिल्ह्यात ७७ टक्के, यवतमाळ ७८, व बुलडाणा जिल्ह्यात ६९ टक्के पाऊस पडला. त्यामुळे ३५ तालुक्यांतील भूजलात १० फुटांपर्यंत घट झाली आहे. या तालुक्यांमध्ये भूजलाचे पुनर्भरण झालेलेच नाही. मात्र, २१ तालुक्यांतील भूजलात १० फुटांपर्यंत वाढ झाल्याचे निरीक्षण विहिरीतील स्थिर पाणीपातळीच्या नोंदीवरून स्पष्ट झाले आहे. भूजल सर्वेक्षण विभागाच्या माहितीनुसार, विभागातील ५६ पैकी आठ तालुक्यांमध्ये एक मीटरपर्यंत, १९ तालुक्यांमध्ये दोन मीटरपर्यंत, सात तालुक्यांमध्ये तीन मीटरपर्यंत तसेच एका तालुक्यात तीन मीटरपेक्षा जास्त तूट आलेली आहे. जिल्हानिहाय अमरावती जिल्ह्यात १२, अकोला जिल्ह्यात सात, वाशिम जिल्ह्यात एक, बुलडाणा जिल्ह्यात १३, तर यवतमाळ जिल्ह्यात दोन तालुक्यांतील भूजलात तूट नोंदविली गेली. 

यवतमाळात सर्वाधिक १४ तालुक्यातील भूजलात वाढअमरावती विभागात २१ तालुक्यांतील भूजलात वाढ झाल्याने रबी हंगामाचा दिलासा शेतकºयांना मिळाला आहे. यामध्ये एक मीटरपर्यंत नऊ तालुके, दोन मीटरपर्यंत आठ, तीन मीटरपर्यंत तीन, तर एका तालुक्यात तीन मीटरपेक्षा जास्त भूजलात वाढ झालेली आहे. अमरावती जिल्ह्यात दोन तालुक्यांमध्ये, वाशिम जिल्ह्यात पाच, तर यवतमाळ जिल्ह्यात १४ तालुक्यांमध्ये भूजल पातळीत वाढ झाली असल्याचे निरीक्षण विहिरींच्या नोंदीवरून स्पष्ट झाले आहे.

बसाल्ट खडकाने भूगर्भात पाणीसाठवण क्षमता घटलीविभागाची भूगर्भीय स्थिती पाहता, किमान ८२ टक्के भूभाग हा ‘बसाल्ट’ या कठीण या खडकाने व्यापला आहे. यात पाणीसाठवण क्षमता कमी आहे; मात्र यात भेगा व सांधे निर्माण झाल्याने थोडीफार साठवण होते. भूपृष्ठीय रचना व भूगर्र्भीय स्थितीवर झालेल्या पर्जन्यमानाचे भूजलात रूपांतर होणे महत्त्वाचे आहे. मात्र, सिंचन, औद्योगिक वापर, शहरीकरण व वाढत्या लोकसंख्येसाठी पाण्याची मागणी यामुळे या साठ्यातून भूजलाचा वारेमाप उपसा होत आहे.

टॅग्स :Amravatiअमरावती