शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
2
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
3
Operation Sindoor Live Updates: स्फोटाचा आवाजांमुळे अमृतसरमध्ये रात्रभर ब्लॅक आऊट; पोलिस म्हणतात काहीच सापडले नाही
4
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
6
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
7
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
8
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
9
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
10
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
11
पाकिस्तान प्रतिहल्ला करेल?-शक्यता नाकारता येत नाही!
12
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
13
१८ विमानतळांवरील कामकाज तात्पुरते बंद; एकट्या इंडिगोने सुमारे १६० उड्डाणे रद्द केली
14
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
15
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
16
चंद्रावर उमटणार भारतीय अंतराळवीराचे पदचिन्ह
17
राज्यात गारपिटीची, तर मुंबईत मुसळधारेची शक्यता; मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याला इशारा
18
रोहितने ‘तो’ निर्णय तेव्हाच घेतलेला? गंभीर आलेला, पण रोहित शर्मा अनुपस्थित होता... 
19
रोहित शर्माने घेतली कसोटीतून तडकाफडकी निवृत्ती; इंग्लंड दौऱ्यात मिळणार होता डच्चू...
20
गोष्ट मिठी नदीच्या न उपसलेल्या गाळाची..., गाळाने भरले भ्रष्ट अभियंत्याचे खिसे; चौकशीतून स्पष्ट 

पश्चिम विदर्भात ३५ तालुक्यांतील भूजलात १० फुटांपर्यंत घट; सरासरीपेक्षा कमी-अधिक पावसाचा परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2018 16:33 IST

यंदा सरासरीपेक्षा कमी-अधिक पावसाने विभागातील ३५ तालुक्यांमध्ये भूजलात १० फुटांपर्यंत घट व २१ तालुक्यांत वाढ नोंदविण्यात आली आहे.

अमरावती : यंदा सरासरीपेक्षा कमी-अधिक पावसाने विभागातील ३५ तालुक्यांमध्ये भूजलात १० फुटांपर्यंत घट व २१ तालुक्यांत वाढ नोंदविण्यात आली आहे. भूजल सर्वेक्षण विभागाने याकरिता आॅक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात ६८० निरीक्षण विहिरीतील पाणीपातळीच्या नोंदी घेतल्या. यावरून किती गावांमध्ये पाणीटंचाई राहणार, याचा अहवाल शासनाला या आठवड्यात सादर होईल.यंदाच्या पावसाळ्यात अमरावती विभागात जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या कालावधीत ७७८ मिमी पाऊस अपेक्षित असताना, प्रत्यक्षात ६६३ मिमी पावसाची नोंद झाली. ही टक्केवारी ८५ आहे. अकोला व वाशिम जिल्ह्याने सरासरी पार केली असली तरी अमरावती जिल्ह्यात ७७ टक्के, यवतमाळ ७८, व बुलडाणा जिल्ह्यात ६९ टक्के पाऊस पडला. त्यामुळे ३५ तालुक्यांतील भूजलात १० फुटांपर्यंत घट झाली आहे. या तालुक्यांमध्ये भूजलाचे पुनर्भरण झालेलेच नाही. मात्र, २१ तालुक्यांतील भूजलात १० फुटांपर्यंत वाढ झाल्याचे निरीक्षण विहिरीतील स्थिर पाणीपातळीच्या नोंदीवरून स्पष्ट झाले आहे. भूजल सर्वेक्षण विभागाच्या माहितीनुसार, विभागातील ५६ पैकी आठ तालुक्यांमध्ये एक मीटरपर्यंत, १९ तालुक्यांमध्ये दोन मीटरपर्यंत, सात तालुक्यांमध्ये तीन मीटरपर्यंत तसेच एका तालुक्यात तीन मीटरपेक्षा जास्त तूट आलेली आहे. जिल्हानिहाय अमरावती जिल्ह्यात १२, अकोला जिल्ह्यात सात, वाशिम जिल्ह्यात एक, बुलडाणा जिल्ह्यात १३, तर यवतमाळ जिल्ह्यात दोन तालुक्यांतील भूजलात तूट नोंदविली गेली. 

यवतमाळात सर्वाधिक १४ तालुक्यातील भूजलात वाढअमरावती विभागात २१ तालुक्यांतील भूजलात वाढ झाल्याने रबी हंगामाचा दिलासा शेतकºयांना मिळाला आहे. यामध्ये एक मीटरपर्यंत नऊ तालुके, दोन मीटरपर्यंत आठ, तीन मीटरपर्यंत तीन, तर एका तालुक्यात तीन मीटरपेक्षा जास्त भूजलात वाढ झालेली आहे. अमरावती जिल्ह्यात दोन तालुक्यांमध्ये, वाशिम जिल्ह्यात पाच, तर यवतमाळ जिल्ह्यात १४ तालुक्यांमध्ये भूजल पातळीत वाढ झाली असल्याचे निरीक्षण विहिरींच्या नोंदीवरून स्पष्ट झाले आहे.

बसाल्ट खडकाने भूगर्भात पाणीसाठवण क्षमता घटलीविभागाची भूगर्भीय स्थिती पाहता, किमान ८२ टक्के भूभाग हा ‘बसाल्ट’ या कठीण या खडकाने व्यापला आहे. यात पाणीसाठवण क्षमता कमी आहे; मात्र यात भेगा व सांधे निर्माण झाल्याने थोडीफार साठवण होते. भूपृष्ठीय रचना व भूगर्र्भीय स्थितीवर झालेल्या पर्जन्यमानाचे भूजलात रूपांतर होणे महत्त्वाचे आहे. मात्र, सिंचन, औद्योगिक वापर, शहरीकरण व वाढत्या लोकसंख्येसाठी पाण्याची मागणी यामुळे या साठ्यातून भूजलाचा वारेमाप उपसा होत आहे.

टॅग्स :Amravatiअमरावती