शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वे ठप्प; मेट्रो सेवा सुरळीत, प्रवाशांना अल्प दिलासा
2
ऑटो कंपन्यांवरील अरिष्ट टळले...! चीनने दरवाजे उघडले; रेअर अर्थ मेटलसह दोन वस्तूंवरील निर्बंध हटविले
3
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधू बाजी मारणार की महायुती मात देणार? निकालाची उत्सुकता शिगेला
4
"साहेब माझी आई हरवली"; तक्रार नोंदवण्यासाठी मुलगा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला, तपास सुरू होताच सगळ्यांना धक्का बसला!
5
१९४६ च्या कलकत्ता दंगलीत हजारो हिंदूंचे प्राण वाचवणारे गोपाल पाठा कोण होते? कोण मानतं हिरो, तर कुणी म्हणतं व्हिलन  
6
पापा की परी... सावधान! स्कुटरच्या हँडलमधून साप निघाला साप, तरुणीने उडीच मारली...
7
इंडियन ऑइलने अमेरिकेला दाखवला 'ठेंगा', रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी सुरुच राहणार...
8
VIDEO : किन्नरच्या सौंदर्यावर नेटकरी 'फिदा'! व्हिडिओ पाहून युजर्स म्हणतायत...; तुम्हीही थक्क व्हाल!
9
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं, बीकेसीत पाणी साचण्याची शक्यता
10
Mangalagauri 2025: मंगळगौरीचे पावित्र्य आणि माधुर्य दर्शवणारे दीनानाथ दलाल यांचे चित्र; पहा बारकावे!
11
ऋतुराजनं बॉलिंगमध्ये आजमावला हात; सिक्सर मारल्यावर विकेट्स घेत हिशोब केला चुकता (VIDEO)
12
ती गुढ आग... ज्यात भारताचं सेमीकंडक्टर बनवण्याचं स्वप्न झालं होतं जळून खाक, ७ फेब्रुवारी १९८९ रोजी नेमकं काय झालं होतं?
13
सावधान! अनोळखी व्यक्तीला कॅशच्या बदल्यात पैसे ट्रान्सफर करताय? 'या' एका चुकीमुळे जावं लागेल थेट तुरुंगात
14
Himachal Pradesh: हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटी; अनेक घरे, गाड्या गेल्या वाहून, ४०० रस्ते बंद!
15
Miss Universe India: २२ वर्षांच्या मनिका विश्वकर्माने जिंकला 'मिस युनिव्हर्स इंडिया २०२५' चा खिताब, कोण आहे ही सुंदरी?
16
Indian Railway: आता रेल्वेतही विमानासारखा नियम; ‘जादा' सामान बाळगल्यास दंड!
17
ट्रम्प यांना भेटायला गेलेल्या झेलेन्स्कींनी मेलानियांसाठी पाठवले खास पत्र; काय आहे या पत्रात?
18
आज उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवाराची घोषणा करणार 'I.N.D.I.A.'? ही 3 नावं शर्यतीत!
19
पैसे दुप्पट करते ही सरकारी योजना; ५ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळेल १० लाखांचा गॅरंटीड रिटर्न, पाहा डिटेल्स
20
पतीच्या निधनामुळे खचलेल्या तिच्या आयुष्यात 'तो' आला अन् मोठा झटका देऊन गेला! तरुणीसोबत घडलं असं काही की...

पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यमापनाने निकाल घोषित करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:14 IST

अमरावती : जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा उद्रेक बघता, पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यमापन करून निकाल घोषित व्हावे, अशी मागणी ...

अमरावती : जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा उद्रेक बघता, पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यमापन करून निकाल घोषित व्हावे, अशी मागणी प्राथमिक शिक्षक समितीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. या मागणीचे निवेदन पाठविण्यात आले आहे.

मार्च २०२० पासून शाळा बंद आहेत. कोरोनाचा धुमाकूळ सुरूच आहे. कोरोनापासून उपाययोजना म्हणून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार शाळा, महाविद्यालये बंद आहे. मध्यंतरी कोरोना ओसरत असताना, शाळा, महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय घेतला. मात्र, कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता, स्थानिक परिस्थितीचा आढावा घेऊन शाळा व कनिष्ठ महाविद्यालय पुन्हा बंद करण्याची बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक विद्यार्थी आणि शिक्षक कोरोनाग्रस्त झाले आहेत. पुन्हा एकदा कोरोना विषाणूचा फैलाव वेगाने होत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि शैक्षणिक हित लक्षात घेऊन शैक्षणिक वर्ष २०२०-२१ च्या इयत्ता पहिली ते आठवीच्या मुलांचे अंतर्गत मूल्यमापन करून प्राप्त गुणांच्या आधारे विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करण्यात यावे आणि शैक्षणिक वर्ष २०२० -२१ चा निकाल घोषित करण्यात यावा तसेच पुढील शैक्षणिक वर्ष जून २०२१ पासून सुरू करण्यात यावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

शिक्षक, कर्मचारी हे कोरोना संक्रमणकाळातही अध्ययन, अध्यापनाचे कामकाज करीत आहेत. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, प्रत्यक्ष शाळा सुरू होईपर्यंत कर्मचाऱ्यांना ‘वर्क फ्रॉम होम’ तत्त्वावर ऑनलाईन अध्यापन आणि शालेय कामकाज करण्याची परवानगी मिळावी, अशा मागणीचे निवेदन प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष गोकुलदास राऊत, संभाजी रेवाळे, मनीष काळे, राजेश सावरकर, महिला आघाडी प्रमुख सरीता काठोळे, योगिता जिरापुरे, सुषमा वानखडे, भावना ठाकरे, प्रवीणा कोल्हे यांनी दिले आहे.

०००००००००००००००००००००००००