शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
3
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
4
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
5
सलग दुसऱ्या दिवशी बाजार घसरला! निफ्टी बँक तेजीत, पण इतर ठिकाणी विक्रीचा जोर, पाहा आजचे आकडे!
6
नोकरीला कंटाळलात? फक्त २०,००० रुपयांमध्ये सुरू करा 'हे' ४ छोटे व्यवसाय, दरमहा बंपर कमाईची संधी!
7
Raj Kushwaha : "सोनमने तिच्या पतीला खाल्लं आणि आता..." असं म्हणणाऱ्या राजच्या आजीचा झाला मृत्यू
8
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
9
सोशल मीडियावर व्हायरल झालेले खान सर निवडणूक लढवणार?,'आप'च्या संजय सिंह यांची भेट घेतली
10
२४ वर्षाच्या युवतीचा कारनामा, ८ बॉयफ्रेंडकडून लुटले २५ लाख; नवव्याला फसवणार होती, पण... 
11
Nitish Rana: भारतीय क्रिकेटर नितीश राणाने दिली 'गूड न्यूज'; झाला जुळ्या मुलांचा बाबा; पाहा Photo
12
“मराठी भाषा, संस्कृती संपवायला हिंदी सक्ती, भाजपा-RSSचा अजेंडा हाणून पाडू”: हर्षवर्धन सपकाळ
13
भारत चीनला करणार 'बाय-बाय'; आता 'या' देशातून येणार रेअर अर्थ मॅग्नेट; कार कंपन्यांचं टेन्शन संपणार?
14
Video - हॉटेलमध्ये बॉयफ्रेंडसोबत नवऱ्याने रंगेहाथ पकडताच 'ती' झाली स्पायडरमॅन, थेट छतावरुन...
15
एका हाताला लकवा, नीट ऐकताही येत नाही! तरीही ४४ वर्षांपासून अयातुल्ला खामेनेई कसं सांभाळतात इराणचं सरकार?
16
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
17
Fastag New Rules : एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
18
सलमान खानने केली आमिरची चेष्टा, नवीन गर्लफ्रेंडवरुन म्हणाला; "तो परफेक्शनिस्ट..."
19
“पांडुरंग सगळ्यांच्या मनोकामना ऐकतील”; अजितदादा CM होण्याबाबत सुनेत्रा पवारांचे सूचक विधान

जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2018 23:02 IST

सरासरीपेक्षा कमी पावसाने जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट आहे. ग्रामीण अर्थव्यवस्था कोलमडली असल्याने जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करावा. उपाययोजनांसह शेतकऱ्यांना सरसकट ५० हजार रूपये एकराप्रमाणे मदत देण्याची मागणी आ. यशोमती ठाकूर यांनी शासनाकडे सरकारला केली.

ठळक मुद्देयशोमती ठाकूर : शासनाकडे निवेदनाद्वारे मागणी, शेतकरी अडचणीत

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : सरासरीपेक्षा कमी पावसाने जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट आहे. ग्रामीण अर्थव्यवस्था कोलमडली असल्याने जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करावा. उपाययोजनांसह शेतकऱ्यांना सरसकट ५० हजार रूपये एकराप्रमाणे मदत देण्याची मागणी आ. यशोमती ठाकूर यांनी शासनाकडे सरकारला केली.जिल्ह्यातील भूगर्भातील जलसाठ्याची पातळी प्रचंड खालावली आहे. त्यामुळे हिवाळा सुरू होण्यापूर्वीच पाण्याची भीषण समस्या जिल्ह्यात भेडसावू लागली आहे. शेकडो गावांवर सध्या पाणीटंचाईचे सावट गडद झाले आहे. त्यामुळे वेळेत पिण्याच्या पाण्याचे नियोजन शासनाने करावे, अशी मागणी शासनाकडे केल्याचे आ. यशोमती ठाकूर म्हणाल्या. तिवसा व अन्य तालुक्यांमध्ये शासनाने चार वर्षांत कोणतीही नवीन सिंचनाची सुविधा उपलब्ध करून दिली नाही. त्यामुळे शेतकरी सिंचन सुविधेपासून वंचित आहेत. कायम कोरड्या दुष्काळाच्या छायेत असलेल्या तिवसा तालुक्यातील २२ गावांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून देणाºया गुरूकुंज उपसा सिंचन योजना जलदगतीने पूर्णत्वास येणे आवश्यक आहे. एकंदरीत पाण्याच्या नियोजनावरून हे सरकार उदासीन असल्याचे आ. ठाकूर यांनी सांगितले.नाफेड खरेदीतही दिरंगाईदुष्काळाच्या छायेत असलेल्या शेतकºयांनी कसेबसे सोयाबीन, मूंग आणि उडीदाचे पीक घेतले. परंतु, शासनाकडून शासकीय खरेदीत दिरंगाई झाल्याने शेतकºयांना कमी भावात आपला माल विकला आहे. त्यामुळे शासनाचे धोरण व्यापाºयांचा फायदा करणारे ठरत आहे. आॅनलाईन नोंदणीदेखील शेतकºयांनाच त्रासदायक ठरत आहे. पांदण रस्त्यांची घोषणा आता विरली असून शेतकºयांची ही मागणीदेखील पूर्ण होत नसल्याचे त्यांनी सांगितले.‘जलयुक्त’मधून निधीचे सिंचनशासनाने सुरू केलेल्या जलयुक्त शिवार योजनेमुळे जलसाठ्यात वाढ झाली की निधीचे सिंचन झाले, असा सवाल आ. ठाकूर यांनी केला आहे. ही योजना कंत्राटदारांच्या फायद्यासाठीच निर्माण करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. अमरावती जिल्ह्यातील जल समस्या शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे वाढत चालली असून त्यावर शासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी आ. ठाकूर यांनी केली आहे.