शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2018 23:02 IST

सरासरीपेक्षा कमी पावसाने जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट आहे. ग्रामीण अर्थव्यवस्था कोलमडली असल्याने जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करावा. उपाययोजनांसह शेतकऱ्यांना सरसकट ५० हजार रूपये एकराप्रमाणे मदत देण्याची मागणी आ. यशोमती ठाकूर यांनी शासनाकडे सरकारला केली.

ठळक मुद्देयशोमती ठाकूर : शासनाकडे निवेदनाद्वारे मागणी, शेतकरी अडचणीत

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : सरासरीपेक्षा कमी पावसाने जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट आहे. ग्रामीण अर्थव्यवस्था कोलमडली असल्याने जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करावा. उपाययोजनांसह शेतकऱ्यांना सरसकट ५० हजार रूपये एकराप्रमाणे मदत देण्याची मागणी आ. यशोमती ठाकूर यांनी शासनाकडे सरकारला केली.जिल्ह्यातील भूगर्भातील जलसाठ्याची पातळी प्रचंड खालावली आहे. त्यामुळे हिवाळा सुरू होण्यापूर्वीच पाण्याची भीषण समस्या जिल्ह्यात भेडसावू लागली आहे. शेकडो गावांवर सध्या पाणीटंचाईचे सावट गडद झाले आहे. त्यामुळे वेळेत पिण्याच्या पाण्याचे नियोजन शासनाने करावे, अशी मागणी शासनाकडे केल्याचे आ. यशोमती ठाकूर म्हणाल्या. तिवसा व अन्य तालुक्यांमध्ये शासनाने चार वर्षांत कोणतीही नवीन सिंचनाची सुविधा उपलब्ध करून दिली नाही. त्यामुळे शेतकरी सिंचन सुविधेपासून वंचित आहेत. कायम कोरड्या दुष्काळाच्या छायेत असलेल्या तिवसा तालुक्यातील २२ गावांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून देणाºया गुरूकुंज उपसा सिंचन योजना जलदगतीने पूर्णत्वास येणे आवश्यक आहे. एकंदरीत पाण्याच्या नियोजनावरून हे सरकार उदासीन असल्याचे आ. ठाकूर यांनी सांगितले.नाफेड खरेदीतही दिरंगाईदुष्काळाच्या छायेत असलेल्या शेतकºयांनी कसेबसे सोयाबीन, मूंग आणि उडीदाचे पीक घेतले. परंतु, शासनाकडून शासकीय खरेदीत दिरंगाई झाल्याने शेतकºयांना कमी भावात आपला माल विकला आहे. त्यामुळे शासनाचे धोरण व्यापाºयांचा फायदा करणारे ठरत आहे. आॅनलाईन नोंदणीदेखील शेतकºयांनाच त्रासदायक ठरत आहे. पांदण रस्त्यांची घोषणा आता विरली असून शेतकºयांची ही मागणीदेखील पूर्ण होत नसल्याचे त्यांनी सांगितले.‘जलयुक्त’मधून निधीचे सिंचनशासनाने सुरू केलेल्या जलयुक्त शिवार योजनेमुळे जलसाठ्यात वाढ झाली की निधीचे सिंचन झाले, असा सवाल आ. ठाकूर यांनी केला आहे. ही योजना कंत्राटदारांच्या फायद्यासाठीच निर्माण करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. अमरावती जिल्ह्यातील जल समस्या शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे वाढत चालली असून त्यावर शासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी आ. ठाकूर यांनी केली आहे.