शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान सुधरेना, जम्मू विमानतळावर हल्ल्याचा प्रयत्न, नियंत्रण रेषेपलीकडून भीषण गोळीबार
2
पाकिस्तानचा मोठा हल्ला उधळला, एफ-१६ जेटच्या उडवल्या ठिकऱ्या, आयएल-१७ एअर डिफेन्स गन सीमेवर तैनात
3
Video: सायरन वाजले!! पाकिस्तानची ८ मिसाईल्स भारताने पाडली, 'नापाक' हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर
4
IPL 2025 PBKS vs DC : पंजाब-दिल्ली यांच्यातील सामना अचानक थांबवण्याची वेळ: नेमकं काय घडलं?
5
Mumbai Metro: उद्यापासून आरे ते वरळी मेट्रो धावणार; मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका, वेळही वाचणार!
6
दोन वेगवेगळे Uniform; कर्नल सोफिया अन् विंग कमांडर व्योमिका यांच्या गणवेशातून मोठा संदेश
7
पाकिस्तान दहशतवादाचे केंद्र, नेहमी दहशतवाद्यांना संरक्षण दिले; भारताकडून पाकची पोलखोल
8
मैत्रिणींनी केला घात! ठाण्यात नशेचे इंजेक्शन देऊन तरुणीवर सामूहिक बलात्कार
9
लालू प्रसाद यादव पुन्हा अडचणीत; राष्ट्रपतींनी 'या' प्रकरणात खटला चालवण्याची दिली परवानगी
10
घायाळ पाकिस्तानला अल कायदाची साथ, भारतात 'जिहाद फी सबीलिल्लाह' करण्याची दिली धमकी   
11
IPL 2025 : ईडन गार्डन्सनंतर आता जयपूर स्टेडियमवर बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी
12
Video - अतिथी देवो भव! रिक्षा चालकाच्या कृतीने जिंकलं परदेशी महिलेचं मन, असं काय घडलं?
13
पाकिस्तानला भारताचा 'डिजिटल' दणका! सोशल मीडिया पाठोपाठ वेब सिरीज, OTT वरही बंदी
14
भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली विमानतळावरील 90 उड्डाणे रद्द, जाणून घ्या डिटेल्स..
15
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानची क्षेपणास्त्रे हवेतच नष्ट, जम्मूपासून जैसलमेरपर्यंत मोठ्या घडामोडी
16
टी-२० सामन्यापूर्वीच भारताचा धमाका, ड्रोन हल्ल्यात रावळपिंडीचं स्टेडियम उद्ध्वस्त  
17
India Pakistan Tension: पाकिस्तान वेडापिसा! भारतातील 'या' ठिकाणांवर मिसाईल सोडली, Indian Army ने झटक्यात पाडली
18
Karachi Bakery: हैदराबादच्या प्रसिद्ध कराची बेकरीविरुद्ध निदर्शने, सर्व दुकानांवर लावला तिरंगा झेंडा...
19
भारताच्या ड्रोन हल्ल्यात हाफिज सईदचा सहकारी ठार, तर मुलगा बेपत्ता
20
भारताचं 'सुदर्शन चक्र' लय भारी! पाकच्या क्षेपणास्त्रांचा 'खेळ खल्लास' करणाऱ्या S-400 ची पॉवरफुल्ल स्टोरी

श्रीनिवास रेड्डी यांच्या मर्जीतील कंत्राटी कर्मचाऱ्यांबाबत आज निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:13 IST

अमरावती : हरिसाल येथील वनक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्या प्रकरणानंतर मेळघाट व्याघ्र प्रकल्प आणि टायगर फाऊंडेशन जोरदार चर्चेत ...

अमरावती : हरिसाल येथील वनक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्या प्रकरणानंतर मेळघाट व्याघ्र प्रकल्प आणि टायगर फाऊंडेशन जोरदार चर्चेत आले आहे. याप्रकरणी निलंबित अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक श्रीनिवास रेड्डी यांच्या मर्जीतील १३ कंत्राटी कर्मचाऱ्यांबाबत मंगळवार, २० एप्रिल रोजी निर्णय होण्याची शक्यता आहे. त्याअनुषंगाने मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे प्रभारी क्षेत्र संचालक तथा मुख्य वनसंरक्षक प्रवीण चव्हाण हे आढावा घेणार आहेत.

मेळघाट व्याघ्र प्रकल्पात विविध कामे करण्यासाठी टायगर फाऊंडेशनची स्थापना करण्यात आली. राज्यस्तरावर टायगर फाऊंडेशन समितीचे अध्यक्ष मुख्यमंत्री हे आहेत. या फाऊंडेशनमध्ये कंत्राटी पदांना दरवर्षी मान्यता देऊन मुदतवाढ दिली जाते. मात्र, मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत टायगर फाऊंडेशनमध्ये श्रीनिवास रेड्डी यांच्याच मर्जीतील १३ कंत्राटी भरण्यात आले आहेत. यात बहुतांश नागपूर जिल्ह्यातील सर्वाधिक भरणा आहे. दोन अभियंते, एक लिपिक, ईको टुरिझम, लाईव्ह हुड अंतर्गत रोजगार, गाईड प्रशिक्षक, ऑडिओ-व्हिडिओ तयार करणे, ग्राफिक डिझायनर अशी एकूण १३ पदे कंत्राटी आहेत. ही सर्व पदे दोन वर्षांपूर्वी रेड्डी यांनी मर्जीतील घेतल्याची ओरड आहे. हे कंत्राटी कर्मचारी नियमित वनकर्मचाऱ्यांना धाकात ठेवून प्रशासकीय कामे करतात, असा आक्षेप आहे. निविदा प्रक्रिया, प्रशासकीय कामांना मान्यता देणे, देयके अदा करणे, धनादेश वठविणे आदी कामेही रेड्डी यांच्या सांगण्यावरून हे कंत्राटी कर्मचारी नियमबाह्य पद्धतीने करीत असल्याची माहिती आहे. १३ कंत्राटी कर्मचाऱ्यांपैकी तिघांचा कार्यकाळ संपला असून, याविषयी मंगळवारी अंतिम निर्णय हाेण्याचे संकेत आहेत. यावर्षीचे आर्थिक वर्ष मार्चमध्ये संपले असून, मे अथवा जूनमध्ये या कंत्राटी पदांना मुदतवाढ दिली जाते. त्यानुसार सीसीएफ चव्हाण यांनी आढावा बैठक बोलावली आहे.

-----------

काही कंत्राटींना शाल-श्रीफळ मिळणार?

मेळघाट व्याघ्र प्रकल्पात विनोद शिवकुमार, एम.एस. रेड्डी यांच्या एककल्ली कारभाराला साथ देणाऱ्या १३ पैकी काही कंत्राटी कर्मचारी कमी केले जातील, अशी माहिती आहे. यात काही कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या कामकाजाबाबत सीसीएफ चव्हाण यांनी माहिती घेतली आहे. पण, रेड्डी यांचे विश्वासू कंत्राटी कर्मचाऱ्यांना शाल-श्रीफळ मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वागणुकीबाबत वनविभागात तक्रारीचा ढीग आहे.

------------

टायगर क्राईम सेल, टायगर फाऊंडेशनमध्ये कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या कामांचा मंगळवारी मुख्य वनसंरक्षक चव्हाण हे आढावा घेतील. त्यानुसार माहिती गोळा करण्याची तयारी चालविली आहे. तीन कंत्राटी कर्मचाऱ्यांचा कार्यकाळ संपुष्टात आला आहे. पुन्हा कंत्राटी पदांना मुदतवाढ द्यावी अथवा नाही, हा अंतिम निर्णय सीसीएफ घेतील.

- मनोजकुमार खैरनार, विभागीय वनाधिकारी, टायगर क्राईम सेल.