शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
4
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
5
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
6
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
7
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
8
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
9
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
10
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
11
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
12
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
13
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
16
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
17
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
18
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
19
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
20
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?

‘त्या’ निर्णयामुळे कर्मचाऱ्यांना धडकी

By admin | Updated: May 16, 2017 00:09 IST

राज्य सरकारने नगरपरिषद अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या अन्य पालिका-नगरपंचायतींमध्ये स्थानांतरण करण्याचे धोरण आखले असून ....

बदलीचे धोरण निश्चित : महापालिका कर्मचाऱ्यांमध्ये खळबळलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : राज्य सरकारने नगरपरिषद अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या अन्य पालिका-नगरपंचायतींमध्ये स्थानांतरण करण्याचे धोरण आखले असून वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी ठठाण मांडून बसलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये यामुळे खळबळ उडाली आहे. दुसरीकडे महापालिका कर्मचाऱ्यांच्या पोटात देखील यामुळे गोळा उठला आहे. ११ मे रोजी नगरविकास विभागाने जाहीर केलेल्या बदल्यांसंदर्भातील धोरण निश्चितीमुळे पालिका, महानगरपालिका आस्थापनेवरील कर्मचाऱ्यांमध्ये ‘थोडी खुशी बहोत सारा गम’ असे वातावरण निर्माण झाले आहे.एका महापालिकेतून अन्य महापालिकेत बदली करण्याचा निर्णय धोरणात्मक आणि अतिशय क्लिष्ट असल्याने तो तुर्तास तरी प्रत्यक्षात येण्याची शक्यता नाही. तथापि पालिका कर्मचाऱ्यांच्या इतर पालिकांमधील स्थानांतरणाबाबतचा शासन निर्णय धडकल्याने ‘सरकार’ महापालिकेबाबतही असाच निर्णय घेऊ शकते, अशी सूचना आहे. महापालिकेत एकदा रुजू झालेला कर्मचारी ज्या पदावर नियुक्त होतो तो त्याच ठिकाणी सेवानिवृत्त होत असल्याची परंपरा आहे. महापालिका आस्थापनेवरील अधिकारी-कर्मचाऱ्यांची अंतर्गत विभागाशिवाय अन्यत्र कुठेही बदली होत नसल्याने महापालिकेत या कर्मचारी-अधिकाऱ्यांची ‘मोनोपल्ली’ तयार झाल्याचे चित्र आहे. मात्र, ११ मे रोजी नगरविकास विभागाने नगरपरिषद राज्यस्तरीय संवर्गातील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या सर्वसाधारण बदल्यांबाबत धोरण निश्चित केल्याने महापालिकेतही खळबळ उडाली आहे. नगर पालिकांप्रमाणे महापालिका कर्मचाऱ्यांच्या अन्य महापालिकांमध्ये बदल्या झाल्यास कसे होणार, असा प्रश्न कर्मचारी वर्गातून चर्चिला जात आहे.असा आहे शासन निर्णयराज्यस्तरिय संवर्गातील पदांवरील अधिकारी-कर्मचारी संपूर्ण राज्यात बदलीस प्राप्त असतील. या अधिकारी कर्मचाऱ्यांचा एका नगर परिषदेत ३ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर त्यांची बदली करण्यात यावी, संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यास कोणत्याही परिस्थितीत एका नगरपरिषद/नगरपंचायतीमध्ये ४ वर्षांपेक्षा अधिक तसेच एकाच जिल्ह्यात २ पदावधी अर्थात ६ वर्षांपेक्षा अधिक कालावधीकरीता ठेवता येणार नाही, असा शासन निर्णय नगर पालिकांसाठी जारी करण्यात आला आहे.