शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
2
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
3
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
4
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
5
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
6
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
7
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
8
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
9
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
10
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
11
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
12
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
13
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
14
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
15
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
16
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
17
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
18
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
19
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
20
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो

‘त्या’ निर्णयामुळे कर्मचाऱ्यांना धडकी

By admin | Updated: May 16, 2017 00:09 IST

राज्य सरकारने नगरपरिषद अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या अन्य पालिका-नगरपंचायतींमध्ये स्थानांतरण करण्याचे धोरण आखले असून ....

बदलीचे धोरण निश्चित : महापालिका कर्मचाऱ्यांमध्ये खळबळलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : राज्य सरकारने नगरपरिषद अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या अन्य पालिका-नगरपंचायतींमध्ये स्थानांतरण करण्याचे धोरण आखले असून वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी ठठाण मांडून बसलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये यामुळे खळबळ उडाली आहे. दुसरीकडे महापालिका कर्मचाऱ्यांच्या पोटात देखील यामुळे गोळा उठला आहे. ११ मे रोजी नगरविकास विभागाने जाहीर केलेल्या बदल्यांसंदर्भातील धोरण निश्चितीमुळे पालिका, महानगरपालिका आस्थापनेवरील कर्मचाऱ्यांमध्ये ‘थोडी खुशी बहोत सारा गम’ असे वातावरण निर्माण झाले आहे.एका महापालिकेतून अन्य महापालिकेत बदली करण्याचा निर्णय धोरणात्मक आणि अतिशय क्लिष्ट असल्याने तो तुर्तास तरी प्रत्यक्षात येण्याची शक्यता नाही. तथापि पालिका कर्मचाऱ्यांच्या इतर पालिकांमधील स्थानांतरणाबाबतचा शासन निर्णय धडकल्याने ‘सरकार’ महापालिकेबाबतही असाच निर्णय घेऊ शकते, अशी सूचना आहे. महापालिकेत एकदा रुजू झालेला कर्मचारी ज्या पदावर नियुक्त होतो तो त्याच ठिकाणी सेवानिवृत्त होत असल्याची परंपरा आहे. महापालिका आस्थापनेवरील अधिकारी-कर्मचाऱ्यांची अंतर्गत विभागाशिवाय अन्यत्र कुठेही बदली होत नसल्याने महापालिकेत या कर्मचारी-अधिकाऱ्यांची ‘मोनोपल्ली’ तयार झाल्याचे चित्र आहे. मात्र, ११ मे रोजी नगरविकास विभागाने नगरपरिषद राज्यस्तरीय संवर्गातील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या सर्वसाधारण बदल्यांबाबत धोरण निश्चित केल्याने महापालिकेतही खळबळ उडाली आहे. नगर पालिकांप्रमाणे महापालिका कर्मचाऱ्यांच्या अन्य महापालिकांमध्ये बदल्या झाल्यास कसे होणार, असा प्रश्न कर्मचारी वर्गातून चर्चिला जात आहे.असा आहे शासन निर्णयराज्यस्तरिय संवर्गातील पदांवरील अधिकारी-कर्मचारी संपूर्ण राज्यात बदलीस प्राप्त असतील. या अधिकारी कर्मचाऱ्यांचा एका नगर परिषदेत ३ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर त्यांची बदली करण्यात यावी, संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यास कोणत्याही परिस्थितीत एका नगरपरिषद/नगरपंचायतीमध्ये ४ वर्षांपेक्षा अधिक तसेच एकाच जिल्ह्यात २ पदावधी अर्थात ६ वर्षांपेक्षा अधिक कालावधीकरीता ठेवता येणार नाही, असा शासन निर्णय नगर पालिकांसाठी जारी करण्यात आला आहे.