शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

राज्यात 24 जलदगती, 18 अतिरिक्त न्यायालये स्थापण्याचा विधी व न्याय विभागाचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2017 18:39 IST

राज्यातील गंभीर स्वरुपाच्या गुन्ह्यांबाबतची प्रकरणे हाताळण्याकरिता राज्यात 24 जलदगती न्यायालये आणि प्रलंबित प्रकरणांची संख्या कमी करण्यासाठी 18 अतिरिक्त न्यायालये स्थापन करण्याचा निर्णय विधी व न्याय विभागाने घेतला

अमरावती, दि. 20 - राज्यातील गंभीर स्वरुपाच्या गुन्ह्यांबाबतची प्रकरणे हाताळण्याकरिता राज्यात 24 जलदगती न्यायालये आणि प्रलंबित प्रकरणांची संख्या कमी करण्यासाठी 18 अतिरिक्त न्यायालये स्थापन करण्याचा निर्णय विधी व न्याय विभागाने घेतला आहे. पाच वर्षांच्या कालावधीसाठी ही न्यायालये स्थापन करण्यात येणार आहेत. यात अमरावती येथे जलदगती न्यायालय, तर अचलपुरात अतिरिक्त न्यायालयाचा समावेश आहे. या न्यायालयांसाठी न्यायाधिशांसह अन्य न्यायालयीन अधिकारी कर्मचा-यांच्या पदांना मान्यता देण्यात आली आहे.चौदाव्या केंद्रीय वित्त आयोगाच्या शिफारशीमध्ये न्यायव्यवस्था सक्षम करण्याच्या दृष्टीने अतिरिक्त न्यायालये, जलदगती न्यायलये, कौटुंबिक न्यायालये, कार्यरत न्यायालयाचे नवीनीकरण, तांत्रिक मनुष्यबळ सहाय, स्कॅनिंग व डिजिटायझेशन लॉ स्कूल, लोकअदालत, एडीआर सेंटर आणि मेशिएटर्स व सक्षमीकरण हे 11 घटक दिले आहेत. त्यासाठी सन 2015 ते 2020 या कालावधीत 1014 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. पैकी 49.67 कोटी पाच वर्षे कालावधीच्या जलदगती न्यायालयासाठी नमूद केला आहे.14व्या वित्त्त आयोगाच्या अनुषंगाने खून, बलात्कार, दरोडा, अपहरण, अवैध मानवी वाहतूक हुंडाबळी या गंभीर स्वरुपाच्या बाबतीतील दाखल प्रकरणे, वरिष्ठ नागरिक, महिला, बालके, अपंग, एचआयव्ही बाधितांनी दाखल केलेली प्रकरणे, भूसंपादन, संपत्तीविषयक वाद याबाबतची दिवाणी प्रकरणे हाताळण्याकरिता 24 जलदगती न्यायालये व त्यासाठी 144 पदे निर्माण करण्यास विधी व न्याय विभागाने 18 ऑगस्टला मान्यता दिली आहे. या 24 न्यायालयांमध्ये अमरावतीचा समावेश आहे. अमरावती जिल्हा मुख्यालयस्थळी हे जलदगती न्यायालय कार्यान्वित होणार आहेत.चौदाव्या केंद्रीय वित्त आयोगाने प्रलंबित प्रकरणांची संख्या विचारात घेऊन ज्या ठिकाणी प्रलंबित प्रकरणांची संख्या जास्त आहे, त्याठिकाणी तात्पुरत्या स्वरुपात पाच वर्षांच्या कालावधीसाठी अतिरिक्त न्यायालये स्थापन करण्याची शिफारस केली आहे. त्यासाठी 41.44 कोटी रुपये निधी आरक्षित करण्यात आला. प्रक्रियेदरम्यान 18 अतिरिक्त न्यायालयासाठी 108 पदे निर्माण करण्यास उच्चस्तरिय सचिव समितीने मान्यता दिली. त्यानुसार राज्यात तात्पुरत्या स्वरुपात 18 अतिरिक्त न्यायालये ज्या दिनांकास ते सुरू होतील तेथून पुढे पाच वर्षांच्या कालावधीसाठी स्थापन करण्याचा निर्णयावर विधी व न्याय विभागाने शुक्रवारी शिक्कामोर्तब केले आहे. या 18 न्यायालयांमध्ये जिल्ह्यातील अचलपूर शहराचा समावेश आहे.