शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
2
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
3
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
4
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
5
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
6
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
7
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
8
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
9
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
10
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
11
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
12
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
13
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
14
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
15
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
16
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
17
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
18
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
19
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार
20
“धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत; ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली”- मोहन भागवत

-हा तर कर्जमाफीचा ‘फार्स’

By admin | Updated: July 1, 2017 00:12 IST

राज्य सरकारने जाहीर केलेली ‘छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना’ ही कर्जमाफीची योजना शेतकऱ्यांची फसवणूक करणारी आहे.

बबलू देशमुख आक्रमक : शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : राज्य सरकारने जाहीर केलेली ‘छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना’ ही कर्जमाफीची योजना शेतकऱ्यांची फसवणूक करणारी आहे. या कर्जमाफीचा फायदा जिल्ह्यातील ३० ते ३५ हजार शेतकऱ्यांना होणार असला तरी १८ हजार शेतकरी कर्जमाफीला मुकणार आहेत. त्यामुळे शासनाने सरसकट कर्जमाफी देण्याची मागणी जिल्हा ग्रामीण काँग्रेसचे अध्यक्ष बबलू देशमुख यांनी केली आहे.जिल्हा बँकेच्या ६१ हजार ३०७ शेतकऱ्यांपैकी केवळ ३० ते ३५ हजार शेतकऱ्यांना अटी-शर्तींेच्या अधीन राहून कर्जमाफीचा लाभ मिळेल तर ३० हजार शेतकरी वंचित राहणार आहेत. सन २०१५-१६ मध्ये पुनर्गठन केलेल्या १८ हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीतून पूर्णत: वगळण्यात आले आहे. त्यामुळे ही कर्जमाफी शेतकऱ्यांची दिशाभूल करणारी आहे. कर्जमाफी द्यायचीच असेल तर सरसकट द्यावी, अन्यथा जिल्हा काँग्रेसच्यावतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा बबलू देशमुख यांनी दिला आहे. सरकारने कर्जमाफी देताना केवळ सन २०१२ नंतर कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांचा समावेश केला आहे. तसेच कर्जपुनर्गठित करणाऱ्या शेतकऱ्यांची केवळ थकीत किस्त माफ होणार असल्याने त्यांच्या डोक्यावरील कर्जाचा डोंगर कायमच राहणार आहे. सन २०१५-१६ मध्ये कर्जाचे पुनर्गठन करणारे शेतकरी योजनेपासून वंचित राहतील. त्यामुळे भाजप शासनाने शेतकऱ्यांचा सातबारा सरसकट कोरा करावा, अशी मागणीसुद्धा बबलू देशमुख यांनी केली आहे. काँग्रेसने दिलेली कर्जमाफी सर्वात मोठीकाँग्रेस सरकारच्या नेतृत्वात केंद्र व राज्य सरकारने सन २००८ मध्ये देशाच्या इतिहासात सर्वात मोठी कर्जमाफी दिली होती. खऱ्या अर्थाने ती सरसकट कर्जमाफी होती. परंतु आताच्या भाजप सरकारने कर्जमाफीत शेकडो निकष लादल्याने जिल्ह्यातील हजारो शेतकरी या कर्जमाफीपासून वंचित राहणार आहेत. भाजप सरकार सर्वात मोठी कर्जमाफी दिल्याचा डांगोरा पिटत असले तरी हा केवळ शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार आहे. ३० हजार शेतकऱ्यांची कर्जमाफी फेटाळलीजिल्हा बँकेकडून शासनाने थकीत कर्जदारांची माहिती मागितली होती. बँकेने ६१ हजार ३०७ शेतकऱ्यांकडे ३०० कोटींच्या थकबाकीचे आकडे दिले होते. परंतु सरकारने ३० ते ३५ हजार शेतकऱ्यांनाच यामध्ये पात्र ठरविले आहे. त्यामुळे ३०० कोटींपैकी अंदाजे १३० कोटींंची कर्जमाफी मिळू शकते. इतर शेतकऱ्यांना मात्र वंचित रहावे लागणार आहे.शिवाजी महाराजांचा अपमान करू नकाराज्य शासनाने कर्जमाफी योजनेला "छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना" असे नाव देऊन शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. त्यामुळे हा एकप्रकारे शिवाजी महाराजांचा अपमान आहे. परिणामी या योजनेचे नाव बदलून शेतकऱ्यांची फसवणूक योजना करावे, अशी संतप्त प्रतिक्रिया जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष बबलू देशमुख दिली.