शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

-हा तर कर्जमाफीचा ‘फार्स’

By admin | Updated: July 1, 2017 00:12 IST

राज्य सरकारने जाहीर केलेली ‘छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना’ ही कर्जमाफीची योजना शेतकऱ्यांची फसवणूक करणारी आहे.

बबलू देशमुख आक्रमक : शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : राज्य सरकारने जाहीर केलेली ‘छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना’ ही कर्जमाफीची योजना शेतकऱ्यांची फसवणूक करणारी आहे. या कर्जमाफीचा फायदा जिल्ह्यातील ३० ते ३५ हजार शेतकऱ्यांना होणार असला तरी १८ हजार शेतकरी कर्जमाफीला मुकणार आहेत. त्यामुळे शासनाने सरसकट कर्जमाफी देण्याची मागणी जिल्हा ग्रामीण काँग्रेसचे अध्यक्ष बबलू देशमुख यांनी केली आहे.जिल्हा बँकेच्या ६१ हजार ३०७ शेतकऱ्यांपैकी केवळ ३० ते ३५ हजार शेतकऱ्यांना अटी-शर्तींेच्या अधीन राहून कर्जमाफीचा लाभ मिळेल तर ३० हजार शेतकरी वंचित राहणार आहेत. सन २०१५-१६ मध्ये पुनर्गठन केलेल्या १८ हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीतून पूर्णत: वगळण्यात आले आहे. त्यामुळे ही कर्जमाफी शेतकऱ्यांची दिशाभूल करणारी आहे. कर्जमाफी द्यायचीच असेल तर सरसकट द्यावी, अन्यथा जिल्हा काँग्रेसच्यावतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा बबलू देशमुख यांनी दिला आहे. सरकारने कर्जमाफी देताना केवळ सन २०१२ नंतर कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांचा समावेश केला आहे. तसेच कर्जपुनर्गठित करणाऱ्या शेतकऱ्यांची केवळ थकीत किस्त माफ होणार असल्याने त्यांच्या डोक्यावरील कर्जाचा डोंगर कायमच राहणार आहे. सन २०१५-१६ मध्ये कर्जाचे पुनर्गठन करणारे शेतकरी योजनेपासून वंचित राहतील. त्यामुळे भाजप शासनाने शेतकऱ्यांचा सातबारा सरसकट कोरा करावा, अशी मागणीसुद्धा बबलू देशमुख यांनी केली आहे. काँग्रेसने दिलेली कर्जमाफी सर्वात मोठीकाँग्रेस सरकारच्या नेतृत्वात केंद्र व राज्य सरकारने सन २००८ मध्ये देशाच्या इतिहासात सर्वात मोठी कर्जमाफी दिली होती. खऱ्या अर्थाने ती सरसकट कर्जमाफी होती. परंतु आताच्या भाजप सरकारने कर्जमाफीत शेकडो निकष लादल्याने जिल्ह्यातील हजारो शेतकरी या कर्जमाफीपासून वंचित राहणार आहेत. भाजप सरकार सर्वात मोठी कर्जमाफी दिल्याचा डांगोरा पिटत असले तरी हा केवळ शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार आहे. ३० हजार शेतकऱ्यांची कर्जमाफी फेटाळलीजिल्हा बँकेकडून शासनाने थकीत कर्जदारांची माहिती मागितली होती. बँकेने ६१ हजार ३०७ शेतकऱ्यांकडे ३०० कोटींच्या थकबाकीचे आकडे दिले होते. परंतु सरकारने ३० ते ३५ हजार शेतकऱ्यांनाच यामध्ये पात्र ठरविले आहे. त्यामुळे ३०० कोटींपैकी अंदाजे १३० कोटींंची कर्जमाफी मिळू शकते. इतर शेतकऱ्यांना मात्र वंचित रहावे लागणार आहे.शिवाजी महाराजांचा अपमान करू नकाराज्य शासनाने कर्जमाफी योजनेला "छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना" असे नाव देऊन शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. त्यामुळे हा एकप्रकारे शिवाजी महाराजांचा अपमान आहे. परिणामी या योजनेचे नाव बदलून शेतकऱ्यांची फसवणूक योजना करावे, अशी संतप्त प्रतिक्रिया जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष बबलू देशमुख दिली.