शहरं
Join us  
Trending Stories
1
APMC निवडणूक घ्या, प्रशासक नियुक्ती रद्द; उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले
2
नवी मुंबईत ‘गाेल्डन मेट्रो’चे पुढचे पाऊल; डीपीआरचे पुनरावलोकन, ३० मिनिटांत गाठा विमानतळे
3
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
4
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
5
कुजबुज! आता पवार कुटुंब एकत्र दिसणार का?; ‘झालं गेलं गंगेला मिळू द्या, महाराष्ट्र हितासाठी...'
6
मंत्रिमंडळाऐवजी पायाभूत समितीला अंतिम अधिकार; फडणवीस सरकारनं हा निर्णय का घेतला?
7
मुंबईत दुहेरी हत्याकांड! २३ वर्षीय तरुणाने वडील, आजोबांची केली हत्या; काकांवरही केला चाकू हल्ला
8
विरोधात लिहिले की पत्रकारांचा छळ सुरू होतो; हायकाेर्टानं नोंदवलं महत्त्वपूर्ण निरीक्षण
9
बोलघेवड्याचा बोलाचा भात...! रशिया-युक्रेन युद्धाला डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानानं नवं वळण?
10
मायबाप सरकार, फक्त कागदावर नको, बांधांवर या! निकष बाजूला सारून मदतीचा हात पुढे केला पाहिजे
11
विमानाच्या चाकातील 'त्याच्या' प्रवासाचा जीवघेणा थरार! हृदयाचा थरकाप उडवणारी एक कहाणी
12
मैदानावर क्रिकेट खेळा, खुन्नस कसली काढता?; राजकीय ‘आकां’ना आपण जाब विचारला पाहिजे
13
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
14
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
15
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
16
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
17
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
18
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
19
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
20
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन

कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या

By admin | Updated: April 6, 2015 00:24 IST

तालुक्यातील खानापूर येथे कर्जापायी एका ४५ वर्षीय शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केली. ही घटना रविवारी सकाळी उघडकीस आली.

मृत्यूपूर्वी लिहिली चिठ्ठी : खानापूर येथील घटना वरूड : तालुक्यातील खानापूर येथे कर्जापायी एका ४५ वर्षीय शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केली. ही घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. त्यांच्यावर बँका, सेवा सहकारी संस्था आणि खासगी फायनान्स कंपन्यांचे कर्ज असल्याची चर्चा आहे. शिवहरी वामनराव ढोक (४५) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. शिवहरी ढोक यांच्यावर सहकारी सोसायटी, सहकारी बँक आणि एका फायनान्स कंपनीचे कर्ज होते. सततची नापिकी आणि निसर्गाची अवकृपा यामुळे कपाशीचे पीक बुडाले. चहुबाजुंनी संकट आल्याने त्यांचे मानसिक खच्चीकरण झाले होते. अशा परिस्थितीत संसाराचे रहाटगाडगे कसे चालवावे, हा प्रश्न त्यांना भेडसावत होता. अशात सहकारी संस्था, बँकांकडूून घेतलेले कर्ज कसे फेडावे, या विवंचनेत ते होते. फायनान्स कंपनीचे अधिकारी कर्ज वसुलीसाठी तगादा लावत असल्याने नैराश्य आल्याने त्यांनी आत्महत्या केली. फायनान्स कंपनीचे वसुली अधिकारी कर्जवसुुलीसाठी सतत धमक्या देत असल्याने ते त्रस्त होते, असे त्यांच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे. त्यांच्या पश्चात तीन मुली, पत्नी आणि बराच मोठा आप्त परिवार आहे. शिवहरी ढोक यांनी मृत्यूपूर्वी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीमध्ये बँक, सहकारी संस्था तसेच सावकार आणि खासगी फायनान्स कंपनीच्या तगाद्यामुळे होणाऱ्या त्रासाचा उल्लेख आहे. त्यामुळे बँकांच्या तगाद्याला कंटाळून आणखी किती शेतकऱ्यांचा बळी जाणार, असा प्रश्न उपस्थित केला जात होता. युवा शेतकऱ्याच्या निधनाने शोककळा पसरली आहे.