शहरं
Join us  
Trending Stories
1
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
2
"लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराण्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा
3
अणुबॉम्ब केवळ बहाणा, इराणवर हल्ला करण्यामागचा डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा हेतू वेगळाच, समोर येतेय अशी माहिती
4
७ महिन्यांत १ लाखाचे झाले ३.५ लाख! 'या' डिफेन्स स्टॉकने गुंतवणूकदारांना केलं कोट्यधीश, आता तुमची पाळी?
5
खामेनी यांनी राजीनामा द्यावा अन्यथा..; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणच्या माजी प्रमुखाचा इशारा
6
रात्री तो येतो आणि सकाळी जातो...! घरमालकाने महिलेच्या पतीला फोन करून कळविले, पती येताच...
7
ITR भरताना 'या' २ चुकांमुळे अडकतात पैसे! नाही मिळणार रिफंड, प्राप्तीकर विभागाने अंतिम मुदत वाढवली
8
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
9
इराणला आधीच लागली होती हल्ल्याची कुणकुण? अणुकेंद्रांच्या सॅटेलाईट फोटोमधून अशी माहिती आली समोर
10
इराण-इस्रायल युद्धातही भारताची 'स्मार्ट' चाल! रशियाच्या सहकार्याने कच्च्या तेलाचं गणित बदललं
11
अमेरिकेचा इराणवर हल्ला; चीन, जपान, ओमान..; कोण काय म्हणाले? जाणून घ्या...
12
४ हजार सायकल स्वारांची दिंडी; राज्याच्या 80 शहरातून निघालेली दिंडी पंढरपुरात विसावली
13
बॉम्ब फोडूनही अमेरिका काही करू शकली नाही! ३७ तास हवेतच होते ६ बी२ बॉम्बर..., इराण म्हणतेय...
14
आतापर्यंत इस्रायली हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा जाणून थक्क व्हाल! खामेनेई सैनिकांकडूनही जोरदार प्रत्युत्तर
15
ट्रम्प यांच्या 'या' निर्णयाने जागतिक अर्थव्यवस्थेला धक्का? तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?
16
जगाचे 'लॉजिस्टिक्स' बदलणाऱ्या अवलियाचे निधन! मालवाहतुकीसाठी पहिल्यांदाच केला असा प्रयोग
17
पुढच्या ५ वर्षांत इराण अणुबॉम्ब बनवेल! अमेरिकेच्या हल्ल्यानंतर औवेसी म्हणाले, "तिथले कोट्यवधी भारतीय..."
18
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
19
अमेरिकेने अणुकेंद्रांवर केलेल्या हल्ल्याचा इराण कसा घेणार बदला, केवळ इस्राइललाच लक्ष्य करणार की...
20
खोट्या बातम्यांवर बसणार आळा; कर्नाटक सरकारने आणला 'फेक न्यूज' कायदा, ७ वर्षांपर्यंतची शिक्षा

यवतमाळ मार्गावर मृत्यूचे सापळे; सार्वजनिक बांधकाम विभागाचे हातावर हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:12 IST

अमरावती : बडनेरा ते यवतमाळ राज्य मार्ग कमालीचा खड्डेमय झालेला असून मोठमोठे भगदाड पडलेल्या या रस्त्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने ...

अमरावती : बडनेरा ते यवतमाळ राज्य मार्ग कमालीचा खड्डेमय झालेला असून मोठमोठे भगदाड पडलेल्या या रस्त्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने पूर्णपणे दुर्लक्ष आहे. या मार्गावर प्रवास म्हणजे मरयातना असून, दररोज अपघाताची मालिका सुरूच आहे.

बडनेरा उपविभाग अंतर्गत येणारा बडनेरा ते यवतमाळ राज्य महामार्ग अमरावती जिल्ह्याच्या सीमापर्यंत ३५ कि.मी. अंतरावर हजारो खड्डे पडलेले आहे. विशेष म्हणजे माहुली चोर ते शिवणीपर्यंतच्या मार्गावर मधोमध दोन फुटाचे खोल खड्डे पडलेले आहे. या मार्गावरून यवतमाळ ते अमरावती अशी वाहनांची वर्दळ असते. खेड्यापाड्यातून ग्रामस्थ कामासाठी अमरावतीत येतात. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून बांधकाम विभागाने या मार्गावरील पडलेले खड्डे बुजविण्याचे सौजन्य न दाखविल्याने यंदाच्या वर्षी मोठमोठे खड्डे पडलेले आहे.

---------------

खड्डे भरणार केव्हा?

नवीन रस्ता होणार असल्याचा बागुलबुवा सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे उपअभियंता करीत आहे. मात्र, मार्गासाठी अद्यापही निधी मिळालेला नाही, ही वस्तुस्थिती आहे. परंतु ज्या ठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्याने रस्ता पार उखडला आहे. किमान त्या ठिकाणी डांबराने खड्डे भरण्याचे सौजन्य का दाखविले जात नाही, असा सवाल उपस्थित होत आहे. तर दुसरीकडे नेर उपविभाच्या हद्दीतील शिवणी सीमेपासून यवतमाळपर्यंत रस्ता चकाचक आहे. तथापि, अमरावती जिल्ह्याच्या सीमेपासून तर जवळा फाटापर्यंत मार्गाची डागडुजी बडनेरा उपविभाग का करीत नाही, हेच कळेनासे झाले आहे.

--------------------------

डागडुजीचा निधी गेला कुठे?

दरवर्षी रस्त्यावरील खड्डे भरणे, रस्त्याच्या बाजूचे गवत कापणे, पाण्यासाठी नाल्या काढणे याकरिता निधी मिळते. मात्र, यवतमाळ मार्गावर हे अनुदान न मिळाल्याचे कारण पुढे करीत बांधकाम विभाग वाहनाधारकांच्या जीवाशी खेळत आहे. खड्ड्यात रस्ता की रस्तात खड्डे, अशी गंभीर अवस्था बडनेरा ते यवतमाळ मार्गाची शिवणीपर्यंत झाली आहे. या मार्गावरील वास्तव्यास असलेले ग्रामस्थ रस्त्याच्या दुरवस्थेने कमालीचे चिडून आहेत.

----------------

अभियंत्यांना मृत्यूची प्रतीक्षा

यवतमाळ मार्गावर खड्डे पडले असून, वाहनचालकांना रस्ता शोधताना कसरत करावी लागत आहे.

तब्बल दोन वर्षांपासून ना रस्ता दुरुस्ती, ना डांबरीकरण केले आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग मोठा अपघात होऊन लोकांच्या मरणाची वाट तर बघत नाही, असा सवाल माहुली चोर, धानोरा गुरव, सावंगा, नांदगाव खंडेश्वर, शिवणी रसुलापूरचे नागरिक करीत आहेत.