शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

यवतमाळ मार्गावर मृत्यूचे सापळे; सार्वजनिक बांधकाम विभागाचे हातावर हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:12 IST

अमरावती : बडनेरा ते यवतमाळ राज्य मार्ग कमालीचा खड्डेमय झालेला असून मोठमोठे भगदाड पडलेल्या या रस्त्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने ...

अमरावती : बडनेरा ते यवतमाळ राज्य मार्ग कमालीचा खड्डेमय झालेला असून मोठमोठे भगदाड पडलेल्या या रस्त्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने पूर्णपणे दुर्लक्ष आहे. या मार्गावर प्रवास म्हणजे मरयातना असून, दररोज अपघाताची मालिका सुरूच आहे.

बडनेरा उपविभाग अंतर्गत येणारा बडनेरा ते यवतमाळ राज्य महामार्ग अमरावती जिल्ह्याच्या सीमापर्यंत ३५ कि.मी. अंतरावर हजारो खड्डे पडलेले आहे. विशेष म्हणजे माहुली चोर ते शिवणीपर्यंतच्या मार्गावर मधोमध दोन फुटाचे खोल खड्डे पडलेले आहे. या मार्गावरून यवतमाळ ते अमरावती अशी वाहनांची वर्दळ असते. खेड्यापाड्यातून ग्रामस्थ कामासाठी अमरावतीत येतात. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून बांधकाम विभागाने या मार्गावरील पडलेले खड्डे बुजविण्याचे सौजन्य न दाखविल्याने यंदाच्या वर्षी मोठमोठे खड्डे पडलेले आहे.

---------------

खड्डे भरणार केव्हा?

नवीन रस्ता होणार असल्याचा बागुलबुवा सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे उपअभियंता करीत आहे. मात्र, मार्गासाठी अद्यापही निधी मिळालेला नाही, ही वस्तुस्थिती आहे. परंतु ज्या ठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्याने रस्ता पार उखडला आहे. किमान त्या ठिकाणी डांबराने खड्डे भरण्याचे सौजन्य का दाखविले जात नाही, असा सवाल उपस्थित होत आहे. तर दुसरीकडे नेर उपविभाच्या हद्दीतील शिवणी सीमेपासून यवतमाळपर्यंत रस्ता चकाचक आहे. तथापि, अमरावती जिल्ह्याच्या सीमेपासून तर जवळा फाटापर्यंत मार्गाची डागडुजी बडनेरा उपविभाग का करीत नाही, हेच कळेनासे झाले आहे.

--------------------------

डागडुजीचा निधी गेला कुठे?

दरवर्षी रस्त्यावरील खड्डे भरणे, रस्त्याच्या बाजूचे गवत कापणे, पाण्यासाठी नाल्या काढणे याकरिता निधी मिळते. मात्र, यवतमाळ मार्गावर हे अनुदान न मिळाल्याचे कारण पुढे करीत बांधकाम विभाग वाहनाधारकांच्या जीवाशी खेळत आहे. खड्ड्यात रस्ता की रस्तात खड्डे, अशी गंभीर अवस्था बडनेरा ते यवतमाळ मार्गाची शिवणीपर्यंत झाली आहे. या मार्गावरील वास्तव्यास असलेले ग्रामस्थ रस्त्याच्या दुरवस्थेने कमालीचे चिडून आहेत.

----------------

अभियंत्यांना मृत्यूची प्रतीक्षा

यवतमाळ मार्गावर खड्डे पडले असून, वाहनचालकांना रस्ता शोधताना कसरत करावी लागत आहे.

तब्बल दोन वर्षांपासून ना रस्ता दुरुस्ती, ना डांबरीकरण केले आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग मोठा अपघात होऊन लोकांच्या मरणाची वाट तर बघत नाही, असा सवाल माहुली चोर, धानोरा गुरव, सावंगा, नांदगाव खंडेश्वर, शिवणी रसुलापूरचे नागरिक करीत आहेत.