शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

महामार्गावर मृत्यूचे सापळे !

By admin | Updated: December 18, 2014 00:02 IST

राष्ट्रीय महामार्गावर धोकादायक मालाची वाहतूक करणाऱ्या वाहनांमध्ये कमालीची वाढ झाली आहे. वाहतुकीचे सर्व नियम पायदळी तुडवून ट्रकच्या बाहेर आलेल्या सळाखी, ...

गजानन मोहोड अमरावतीराष्ट्रीय महामार्गावर धोकादायक मालाची वाहतूक करणाऱ्या वाहनांमध्ये कमालीची वाढ झाली आहे. वाहतुकीचे सर्व नियम पायदळी तुडवून ट्रकच्या बाहेर आलेल्या सळाखी, लोखंडी कांबी, अँगल आणि पत्रे घेऊन जाणाऱ्या ट्रकच्या धोकादायक वाहतुकीमुळे प्रवाशांचा जीव टांगणीला लागला आहे. आजवर कित्येक प्रवाशांचे या वाहतुकीमुळे हकनाक जीव गेले आहेत. पोलीस, महामार्ग पोलीस व प्रादेशिक परिवहन विभागाच्या ‘एंट्री’च्या प्रकारात ही वाहतूक बिनधास्त सुरू असल्याने अपघातांचे प्रमाण वाढत असल्याचे दिसते. अमरावती-नागपूर दरम्यान मुंबई-कलकत्ता हा राष्ट्रीय महामार्ग क्र. ६६५ कि.मी.अंतरामध्ये आहे. या महामार्गावर दिवसाकाठी हजारो वाहनांची वाहतूक होते. बहुतांश वाहतूक नियमबाह्य पध्दतीने सुरू असते. क्षमतेपेक्षा अधिक मालाचे वहन, वाहनाबाहेर लोंबकळणारा माल, वाहनावर उंचच्या उंच लोंबकाळणाऱ्या वस्तुंची धोकादायक वाहतूक सुरू असते. यामुळे प्रसंगी लहानमोठे अपघात देखील होतात.प्रवाशांची सुरक्षा वाऱ्यावरराष्ट्रीय महामार्गासह, राज्य महामार्ग व सर्व रस्त्यावर प्रवाशांना जीवघेणा अनुभव येत आहे. विविध मार्गावर लोखंडी सळाख, मोठी अवजारांची वाहतूक वाढली आहे. या वाहतुकीमुळे सातत्याने राष्ट्रीय महामार्गावर वाहतुकीची कोंडी होत आहे. माल वाहतूक करणारी वाहने नेमकी कुणाची, कोणाची वाहतूक ती कोठून कोठे चालली याची पर्वा कुणालाच नाही. पोलिसांच्या, वाहतूक पोलिसांच्या डोळ्यासमोर दिवसाढवळ्या अशी जीावघेणी वाहतूक होत आहे. या वाहनांमध्ये लोखंडी सळ्या, लोखंडी पाईप, घर बांधकामाची पत्रे, या साहित्याची असुरक्षित वाहतूक केली जाते. त्यामुळे राष्ट्रीय महामार्गावर प्रवाशी सुरक्षित घरी येईल की नाही याचीच चिंता परिवाराला लागली राहते. व्यावसायिकासह चालकांनी घ्यावी दक्षतालोखंडी पत्रे, सळ्यासह ईतर वस्तू शहरातील कित्येक दुकानात भरून घेतल्या जातात. अशा वस्तू भरत असताना संबंधित व्यावसायिकांनीच दक्षता घेणे नियमानुसार महत्त्वाचे आहे. यासाठी चालकांना सूचना देण्याची गरज आहे. वाहनातून असे साहित्य नेताना चालकांनाही ती आवश्यक सूचना व दक्षता घेतल्यानंतर घडणारा दुर्दैवी प्रसंग आणि त्याला सामोरे जाताना करावी लागणारी कसरत या दोन्ही बाबीपासून सर्वांचाच बचाव होणार आहे.