शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

प्रदीर्घ काळानंतर होऊ शकतो ‘स्वाईन फ्लू’ बाधिताचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2017 00:04 IST

तीन महिन्यांनंतर ‘स्वाईन फ्लू’बाधित रूग्णाचा रूग्णालयातच मृत्यू झाल्याची नोंद अमरावती महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत करण्यात आली आहे.

प्रतिबंधात्मक उपायच फायदेशीर : यंत्रणेसमोर उपचाराचे आव्हानलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : तीन महिन्यांनंतर ‘स्वाईन फ्लू’बाधित रूग्णाचा रूग्णालयातच मृत्यू झाल्याची नोंद अमरावती महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत करण्यात आली आहे. यावरून ‘स्वाईन फ्लू’ची उपचार प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरही थोडीशी हयगय झाल्यास हा आजार प्राणघातक ठरू शकतो. याबाबत पुरेशी जनजागृती करण्याची गरज आहे. वडाळी परिसरातील गगलानी नगरातील एका स्वाईन फ्लू बाधिताचा तब्बल तीन महिन्यांनी झालेला मृत्यू, याचे जिवंत उदाहरण ठरू शकतो. स्थानिक वडाळी परिसरातील गगलानीनगरातील एका एएसआयचा स्वाईन फ्लूमुळे बळी गेला. सदर व्यक्ती ६ फेब्रुवारी २०१७ रोजी जबलपूर येथे आठवडाभरासाठी गेले होते. तेथून ते १६ फेब्रुवारीला त्यांच्या गगलानीनगरातील घरी परतले. त्यानंतर दुसऱ्याच दिवशीपासून त्यांना ताप, सर्दी, खोकला व घसा दुखण्याचा त्रास सुरू झाला. यानंतर यारूग्णाने १७ ते १९ फेब्रुवारीपर्यंत ‘पॅरासिटॅमॉल’ गोळ्या घेतल्या. मात्र, तरीही प्रकृतीत सुधारणा न झाल्याने उपरोेक्त रूग्णाने २० फेब्रुवारी रोजी डॉ.चाफले यांना प्रकृती दाखविली. त्यांनीदेखील तपासणी करून एएसआयवर औषधोपचार केलेत. मात्र, यानंतरही त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही. यानंतर एएसआय यांनी ८ मार्च रोेजी डॉ.समीर चौधरी यांच्याकडून उपचार घेतले. मात्र, यानंतरही त्या रूग्णाची प्रकृती खालावल्याने रूग्णाला १३ मार्च रोजी अकोला येथील सर्वोपचार रूग्णालयात पुढील उपचाराकरिता दाखल केले. येथील डॉक्टरांना एएसआयला ‘स्वाईन फ्लू’ची बाधा झाल्याची शंका येताच त्यांचे स्वॅब तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविले. ते पॉझिटिव्ह आल्यानंतर त्या दिशेने उपचारही सुरू केलेत. दरम्यान त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याने त्यांना सुटी झाली. मात्र, पुन्हा महिनाभराच्या अंतराने त्यांच्या प्रकृतीत बिघाड झाला. त्यांना पुन्हा अकोल्याच्या सर्वोपचार रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, यावेळी म्हणजे १३ एप्रिल २०१७ रोेजी त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. उपरोक्त रूग्णाला पूर्वीपासून डायबिटीज व हृदयरोगाचा त्रासही होता, हे येथे उल्लेखनिय. यावरून स्वाईन फ्लू उपचारानंतर पूर्णपणे बरा झाल्याचे दिसत असले तरी त्याचे दूरगामी परिणाम कालांतराने उफाळून येऊ शकतात, रूग्णांना या दिशेने मार्गदर्शन करण्याची गरज आहे. आरोग्य यंत्रणेने रूग्णांवर केवळ उपचार न करता प्रदीर्घ कालावधीसाठी आवश्यक उपाययोजनांचे मार्गदर्शन करण्याची गरज निर्माण झाली आहे. खासगी रुग्णालयात ‘स्वाईन फ्लू’बाधित रुग्णआरोग्य प्रशासनाने शहरात सद्यस्थितीत स्वाईन फ्लूचा एकही रुग्ण नसल्याचा दावा केला असला तरी शहरातील एका खासगी रुग्णालयात स्वाईन फ्लूबाधित एक रुग्ण उपचार घेत असल्याची माहिती "लोकमत"ला प्राप्त झाली आहे. त्यामुळे आरोग्य प्रशासनाचा दावा फोल ठरला आहे.एएसआयच्या मृत्यूची इत्थंभूत माहिती नाहीएसएसआयच्या पॉझिटिव्ह स्वॅबविषयी अमरावतीमधील आरोग्य यंत्रणेकडे फार तुरळक माहिती उपलब्ध आहे. इर्विन व महापालिकेकडून त्याच्या मृत्युसंदर्भात बारीक-सारिक माहिती गोळा करण्यात आली नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे अमरावतीमधील आरोग्य यंत्रणा किती संवेदनशील आहे, हे लक्षात येते. बीपी, मधुमेह व ह्यदयरोगाच्या रुग्णांना जर स्वाईन फ्लूची लागण झाली असेल, तर अशा रुग्णांची रोग प्रतिकारशक्ती कमी होऊन त्याचा मृत्यू होऊ शकतो. अशावेळी तो रुग्ण स्वाईन फ्लूनेच दगावला, असे म्हणता येणार नाही. - पंकज दिवाण,वैद्यकीय अधिकारी