शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

बसस्थानकासमोर मृत्यूचे पिंजरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2016 01:30 IST

मध्यवर्ती बसस्थानकासमोर धोकादायक आणि जीवघेण्या पद्धतीने फिरणारे आॅटोरिक्षा जणू मृत्यूचे फिरते पिंजरेच

अमरावती : मध्यवर्ती बसस्थानकासमोर धोकादायक आणि जीवघेण्या पद्धतीने फिरणारे आॅटोरिक्षा जणू मृत्यूचे फिरते पिंजरेच ठरले आहेत. आॅटोरिक्षांच्या बेबंदशाहीमुळे खासगी कार, एसटी बसेस, दुचाकी आदी वाहनेही अपघात घडवून आणणाऱ्या स्थितीत चालविली जातात वा पार्क केली जातात. विशेष असे की, वाहतूक पोलिसांच्या संरक्षणात वाहतूक नियमांची लक्तरे वेशीवर टांगली जातात. शहरातील वाहतूक सुधारण्याचा संकल्प सोडणारे पोलीस आयुक्त दत्तात्रेय मंडलिक यांनी दिलेले आदेश सुरुवातीला काही प्रमाणात पाळले गेले; तथापि आता त्यांच्या अधिनस्त अधिकारी, कर्मचाऱ्यांनीच आयुक्तांच्या आदेशाला खो दिला. बेशिस्त, जीवघेण्या वाहतुकीला बळ दिल्याने मंडलिक वाहतूक सुधारणेत अपयशी ठरल्याचे स्पष्ट चित्र मध्यवर्ती बसस्थानकासमोर दिसून येत आहे. दररोज ये-जा करणाऱ्या बसगाड्या व प्रवासी वाहतूक करणाऱ्या आॅटो चालकांच्या गर्दीमुळे बसस्थानक परिसरात व मुख्य रस्त्यावर वाहतुकीची कोंडी निर्माण होते. दर पाच मिनिटांना बसस्थानकात एक एसटी प्रवेश करते. बसगाड्यांची आवागमनाची व्यस्तता इतकी अधिक असताना वाहतूक सुरक्षित आणि शिस्तबद्ध करण्याची पोलिसांची जबाबदारी अधिकच वाढते. मात्र त्याच मुद्याचा अभाव या परिसरात आढळतो. बसस्थानकात प्रवेश करण्याकरिता एसटी चालकाला वाहतूक अडथळ्याचा सामना करावा लागत आहे. पोलीस प्रशासनाने आॅटोचालकांना एक रांगेत आॅटो उभे करून प्रवासी घेण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र, तरीसुध्दा बहुतांश आॅटो अस्तव्यस्त स्थितीत बसस्थानकासमोरील रस्त्यावर उभे असतात. हा रस्ता जणू खुले मैदान असावे, अशा पद्धतीने तेथे आॅटोरिक्षा गोलगोल फिरविल्या जातात. बसस्थानकातून प्रवासी बाहेर येताच आॅटो चालक प्रवाशांवर तुटूनच पडतात. नियम, शिस्त, नागरिकांचे हक्क, शहराचे स्वास्थ्य जणू अमरावतीत अस्तित्वात नाहीच, असेच तेथे सारे चित्र असते. सामान्यजणांना सहज दिसणारे, पित्त खवळावणारे हे जीवघेणे चित्र तेथे तैनात असणाऱ्या वाहतूक पोलिसांना मात्र दिसत नाही. वाहतूक पोलीस तेथे तैनात असण्याचे कारण काय? राजरोसपणे वाहतूक नियम पायदळी तुडविले जात असताना ते रोखणे पोलिसांचे कर्तव्य नाही काय? वाहतूक पोलीस वेतन घेतात ते कशासाठी? तैनात कर्मचाऱ्यांना वाहतूक नियंत्रण करायचेच नसेल तर पोलीस आयुक्त त्यांची नेमणूक त्या ठिकाणी करतात तरी कशासाठी? हजारो लोकांदेखत कर्तव्य नाकारण्याचे धैर्य कुण्या वर्दीधारी कर्मचाऱ्याचे होते तरी कसे? आयुक्तांचा वचक संपला की या प्रकाराला त्यांचे बळ आहे? (प्रतिनिधी)अवैध प्रवासी वाहतुकीलाही जोर४खासगी वाहतूक करणाऱ्या ट्रॅव्हल्स बसस्थानकाजवळ उभ्या राहून प्रवासी घेतात. ट्रॅव्हल्समधील कर्मचारी बसस्थानकाच्या आवारात फिरून प्रवासी गोळा करतात, असा सर्रास प्रकार बसस्थानक परिसरात सुरू आहे. त्यातच मध्यप्रदेशातील ट्रॅव्हल्समधूनसुध्दा अवैध प्रवासी वाहतूक होत असल्याचे अनेकदा आढळून आले आहे. मात्र, आजपर्यंत या खासगी वाहतुकीवर अंकुश बसविण्यात पोलिसांना यश आले नाही. बसस्थानकात अवैध पार्किंग४बसस्थानक परिसरातील विविध ठिकाणी अवैध पार्किंग होत असल्याचे अनेकदा आढळून येते. प्रवाशांना बसस्थानकात सोडण्यासाठी येणारे नातेवाईक अथवा मित्र मंडळी त्यांच्या गाड्या बसस्थानकाच्या आवारातच ठेवतात. सारेच कसे आलबेल आहे.