शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

आरटीई प्रवेश प्रक्रियेसाठी २९ एप्रिलची 'डेडलाईन'

By admin | Updated: April 26, 2015 00:22 IST

आरटीईनुसार २५ टक्के राखीव जागांवर शाळेत प्रवेश देण्यासाठीची अंतिम प्रवेश प्रक्रियेची मुदत २३ एप्रिलला संपली. ...

अमरावती : आरटीईनुसार २५ टक्के राखीव जागांवर शाळेत प्रवेश देण्यासाठीची अंतिम प्रवेश प्रक्रियेची मुदत २३ एप्रिलला संपली. मात्र आता ही प्रक्रिया २९ एप्रिलपर्यंत राबविण्याचा निर्णय जिल्हा परिषद शिक्षण विभागाने घेतला आहे.आरटीई प्रवेशासाठी विद्यार्थ्यांच्या पालकांनी जि.प. शिक्षण विभागाकडे आॅनलाईन अर्ज केले होते. प्राप्त अर्जानुसार पात्र विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी आॅनलाईन लकी ड्रॉ काढण्यात आला होता. त्यानंतर ही सर्व प्रक्रिया पूर्ण करून शिक्षण विभागाने प्रवेशितांच्या अंतिम निर्णयासाठी शिक्षण विभागाच्या पुणे कार्यालयाकडे अहवाल पाठविला आहे. आतापर्यंत १२५० पालकांना आपल्या पाल्याच्या शाळा प्रवेशाचे एसएमएस धडकले आहे. सुमारे ४९० अर्ज प्रलंबित आहेत. आरटीईनुसार वंचित तसेच आर्थिक दुर्बल घटकातील पाल्यांसाठी इंग्रजी शाळांमध्ये २५ टक्के जागा राखीव ठेवल्या आहेत. याकरिता पहिल्यांदाच प्राथमिक शिक्षणाधिकारी श्रीराम पानझाडे, विस्तार अधिकारी किशोर पुरी यांच्या मार्गदर्शनात प्रक्रिया राबविण्यात आली. जिल्ह्यातील एकूण ३४६९ अर्ज शिक्षण विभागाला प्राप्त झाले होते. त्यापैकी १६०१ विद्यार्थ्यांचे अर्ज पात्र ठरलेत. ७ एप्रिलला शिक्षण विभागामार्फत लकी ड्रॉ काढण्यात आला. यातील ११११ विद्यार्थ्यांना शाळा देण्यात आला आहेत. पहिल्या टप्प्यातील शाळांमध्ये २३ एप्रिलपर्यत प्रवेश घेणे बंधनकारक केले होते. मात्र या मुदतीत पात्र ठरलेल्या बऱ्याच पालकांनी प्रवेश प्रक्रिया पूर्ण केली नाही. त्यामुळे पालकांनी २९ एप्रिलपर्यंत प्रवेश पूर्ण करून घेणे आवश्यक आहे.