शहरं
Join us  
Trending Stories
1
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
2
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
3
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
4
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
5
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
6
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
7
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
8
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
9
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
10
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
11
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
12
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
13
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
14
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
15
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
16
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
17
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

आरटीई प्रवेश प्रक्रियेसाठी २९ एप्रिलची 'डेडलाईन'

By admin | Updated: April 26, 2015 00:22 IST

आरटीईनुसार २५ टक्के राखीव जागांवर शाळेत प्रवेश देण्यासाठीची अंतिम प्रवेश प्रक्रियेची मुदत २३ एप्रिलला संपली. ...

अमरावती : आरटीईनुसार २५ टक्के राखीव जागांवर शाळेत प्रवेश देण्यासाठीची अंतिम प्रवेश प्रक्रियेची मुदत २३ एप्रिलला संपली. मात्र आता ही प्रक्रिया २९ एप्रिलपर्यंत राबविण्याचा निर्णय जिल्हा परिषद शिक्षण विभागाने घेतला आहे.आरटीई प्रवेशासाठी विद्यार्थ्यांच्या पालकांनी जि.प. शिक्षण विभागाकडे आॅनलाईन अर्ज केले होते. प्राप्त अर्जानुसार पात्र विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी आॅनलाईन लकी ड्रॉ काढण्यात आला होता. त्यानंतर ही सर्व प्रक्रिया पूर्ण करून शिक्षण विभागाने प्रवेशितांच्या अंतिम निर्णयासाठी शिक्षण विभागाच्या पुणे कार्यालयाकडे अहवाल पाठविला आहे. आतापर्यंत १२५० पालकांना आपल्या पाल्याच्या शाळा प्रवेशाचे एसएमएस धडकले आहे. सुमारे ४९० अर्ज प्रलंबित आहेत. आरटीईनुसार वंचित तसेच आर्थिक दुर्बल घटकातील पाल्यांसाठी इंग्रजी शाळांमध्ये २५ टक्के जागा राखीव ठेवल्या आहेत. याकरिता पहिल्यांदाच प्राथमिक शिक्षणाधिकारी श्रीराम पानझाडे, विस्तार अधिकारी किशोर पुरी यांच्या मार्गदर्शनात प्रक्रिया राबविण्यात आली. जिल्ह्यातील एकूण ३४६९ अर्ज शिक्षण विभागाला प्राप्त झाले होते. त्यापैकी १६०१ विद्यार्थ्यांचे अर्ज पात्र ठरलेत. ७ एप्रिलला शिक्षण विभागामार्फत लकी ड्रॉ काढण्यात आला. यातील ११११ विद्यार्थ्यांना शाळा देण्यात आला आहेत. पहिल्या टप्प्यातील शाळांमध्ये २३ एप्रिलपर्यत प्रवेश घेणे बंधनकारक केले होते. मात्र या मुदतीत पात्र ठरलेल्या बऱ्याच पालकांनी प्रवेश प्रक्रिया पूर्ण केली नाही. त्यामुळे पालकांनी २९ एप्रिलपर्यंत प्रवेश पूर्ण करून घेणे आवश्यक आहे.