शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
3
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
4
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
5
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
6
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
7
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
8
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
9
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
10
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
11
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
12
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
13
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
14
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
15
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
16
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
17
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
18
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
19
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

‘रोहयो’मध्ये राबतात मृत व्यक्ती

By admin | Updated: March 29, 2015 00:34 IST

शासनाने ग्रामीण भागातील मजुरांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी, या हेतुने सुरू केलेली रोजगार हमी योजना भ्रष्टाचाराचे कुरण झाले आहे.

श्रीकृष्ण मालपे नेरपिंगळाईशासनाने ग्रामीण भागातील मजुरांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी, या हेतुने सुरू केलेली रोजगार हमी योजना भ्रष्टाचाराचे कुरण झाले आहे. शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचे संगनमताने या योजनेला सुरूंग लागला आहे. येथे रोहयोतील एका मजूर महिलेचा मृत्यू झाल्यानंतर चक्क एक वर्षानंतर तिने रोहयोत काम केल्याची व मजुरी घेतल्याची नोंद आहे.प्राप्त माहितीनुसार, सुनीता संजय रेवस्कर नामक महिला रोहयोच्या कामावर कार्यरत होती. या महिलेचा २८ फेब्रुवारी २०१२ रोजी मृत्यू झाल्यानंतर पंचायत समितीच्या सिमेंट काँक्रीट रस्त्याचे काम ५ एप्रिल २०१२ रोजी सुरू झाले. या कामावर सदर महिला २३-मार्च -१३ ते २९-मार्च-१३ व ५-एप्रिल-१३ ते ११-एप्रिल -१३ पर्यंत कामावर हजर असल्याची नोंद हजेरी बूकात होती. कामाचा मोबदला म्हणून १२६७ रुपये व ५२७ रुपये मजुरी घेतल्याची नोंद आहे. सदर महिलेचा जॉब कार्ड क्र. एम.एच. २४-००२-५२३-००१/२३३३ असून ८३४५६४८ व ११७ या हजेरी क्रमांकावर तिने काम केल्याची नोंद आहे. त्यानंतर पुन्हा २३-४-२०१४ रोजी पुन्हा काम मागितल्याची सुद्धा नोंद आहे. एखादी व्यक्ती जीवंत किंवा मृत असल्याचे दाखले ग्रामसेवक, सरपंच देत असतात. रोजगार हमी योजनेवर काम करणारे मजूर जिवंत आहेत किंवा नाही याची शहानिशा न करता हजेरी मंजूर करण्यात आलेली आहे. मजुरांची हजेरी घेण्याचे काम रोजगार सेवकाचे असते परंतु कुणालाही याबाबतीत चौकशी करावीशी वाटली नाही. शासनाच्या अत्यंत महत्वाकांक्षी असणाऱ्या या योजनेमध्ये मृत व्यक्तींच्या नावाने काम दाखवून पैसे काढल्या जात असतील तर जिवंत व्यक्तीच्या नावाने मोठा भ्रष्टाचार होत असला पाहिजे.या प्रकरणाबरोबरच २०१३-१४ मध्ये झालेल्या मंगरुळ-भिलापूर पांधण रस्त्यामध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार झाल्याची चर्चा आहे. नेरपिंगळाई ते नामडोल या रस्त्यावर लावण्यात आलेल्या वृक्षापैकी एकही वृक्ष जिवंत नाही. याही योजनेवर मोठ्या प्रमाणात खर्च दाखविण्यात आला आहे. तसेच सावरखेड ते वाघोली पांधण रस्ता (आर्थिक वर्ष २०१२-१३) या कामावर आवश्यकतेपेक्षा जास्त खर्च केला असून काम निकृष्ठ दर्जाचे आहे. प्रकरणांची योग्य चौकशी, व्हावी याकरिता ४ मार्च २०१५ रोजी तक्रार निवारण प्राधिकारी भेंडे यांचेकडे लेखी तक्रार दिली असून एक महिना उलटूनही चौकशी झाली नाही. तरी या प्रकरणाची त्वरीत चौकशी व्हावी व दोषींवर कठोर कार्यवाही व्हावी, अशी मागणी तक्रारकर्ते ज्ञानेश्वर बरडे यांनी केली आहे. रोहयोच्या कामात अशा प्रकारे भ्रष्टाचार होत असल्याचे देखील तक्रारीत म्हटले आहे.