शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

‘रोहयो’मध्ये राबतात मृत व्यक्ती

By admin | Updated: March 29, 2015 00:34 IST

शासनाने ग्रामीण भागातील मजुरांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी, या हेतुने सुरू केलेली रोजगार हमी योजना भ्रष्टाचाराचे कुरण झाले आहे.

श्रीकृष्ण मालपे नेरपिंगळाईशासनाने ग्रामीण भागातील मजुरांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी, या हेतुने सुरू केलेली रोजगार हमी योजना भ्रष्टाचाराचे कुरण झाले आहे. शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचे संगनमताने या योजनेला सुरूंग लागला आहे. येथे रोहयोतील एका मजूर महिलेचा मृत्यू झाल्यानंतर चक्क एक वर्षानंतर तिने रोहयोत काम केल्याची व मजुरी घेतल्याची नोंद आहे.प्राप्त माहितीनुसार, सुनीता संजय रेवस्कर नामक महिला रोहयोच्या कामावर कार्यरत होती. या महिलेचा २८ फेब्रुवारी २०१२ रोजी मृत्यू झाल्यानंतर पंचायत समितीच्या सिमेंट काँक्रीट रस्त्याचे काम ५ एप्रिल २०१२ रोजी सुरू झाले. या कामावर सदर महिला २३-मार्च -१३ ते २९-मार्च-१३ व ५-एप्रिल-१३ ते ११-एप्रिल -१३ पर्यंत कामावर हजर असल्याची नोंद हजेरी बूकात होती. कामाचा मोबदला म्हणून १२६७ रुपये व ५२७ रुपये मजुरी घेतल्याची नोंद आहे. सदर महिलेचा जॉब कार्ड क्र. एम.एच. २४-००२-५२३-००१/२३३३ असून ८३४५६४८ व ११७ या हजेरी क्रमांकावर तिने काम केल्याची नोंद आहे. त्यानंतर पुन्हा २३-४-२०१४ रोजी पुन्हा काम मागितल्याची सुद्धा नोंद आहे. एखादी व्यक्ती जीवंत किंवा मृत असल्याचे दाखले ग्रामसेवक, सरपंच देत असतात. रोजगार हमी योजनेवर काम करणारे मजूर जिवंत आहेत किंवा नाही याची शहानिशा न करता हजेरी मंजूर करण्यात आलेली आहे. मजुरांची हजेरी घेण्याचे काम रोजगार सेवकाचे असते परंतु कुणालाही याबाबतीत चौकशी करावीशी वाटली नाही. शासनाच्या अत्यंत महत्वाकांक्षी असणाऱ्या या योजनेमध्ये मृत व्यक्तींच्या नावाने काम दाखवून पैसे काढल्या जात असतील तर जिवंत व्यक्तीच्या नावाने मोठा भ्रष्टाचार होत असला पाहिजे.या प्रकरणाबरोबरच २०१३-१४ मध्ये झालेल्या मंगरुळ-भिलापूर पांधण रस्त्यामध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार झाल्याची चर्चा आहे. नेरपिंगळाई ते नामडोल या रस्त्यावर लावण्यात आलेल्या वृक्षापैकी एकही वृक्ष जिवंत नाही. याही योजनेवर मोठ्या प्रमाणात खर्च दाखविण्यात आला आहे. तसेच सावरखेड ते वाघोली पांधण रस्ता (आर्थिक वर्ष २०१२-१३) या कामावर आवश्यकतेपेक्षा जास्त खर्च केला असून काम निकृष्ठ दर्जाचे आहे. प्रकरणांची योग्य चौकशी, व्हावी याकरिता ४ मार्च २०१५ रोजी तक्रार निवारण प्राधिकारी भेंडे यांचेकडे लेखी तक्रार दिली असून एक महिना उलटूनही चौकशी झाली नाही. तरी या प्रकरणाची त्वरीत चौकशी व्हावी व दोषींवर कठोर कार्यवाही व्हावी, अशी मागणी तक्रारकर्ते ज्ञानेश्वर बरडे यांनी केली आहे. रोहयोच्या कामात अशा प्रकारे भ्रष्टाचार होत असल्याचे देखील तक्रारीत म्हटले आहे.