शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

‘डीसीपीएस’चा गुंता सुटेना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2018 23:04 IST

महापालिका आस्थापनेवर कार्यरत असताना मृत्यू पावलेला अधिकारी-कर्मचाऱ्यांना त्यांच्या मृत्यूपश्चातही अंशदायी योजनेचा लाभ मिळू शकलेला नाही. सन २००५ पासून तांत्रिकतेत अडकलेला ‘डीसीपीएस’चा गुंता अद्यापही न सुटल्याने महापालिकेतील कर्मचाºयांचे आर्थिक भवितव्य धोक्यात आले आहे.

ठळक मुद्देमृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना प्रतीक्षा : महापालिका बॅकफुटवर

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : महापालिका आस्थापनेवर कार्यरत असताना मृत्यू पावलेला अधिकारी-कर्मचाऱ्यांना त्यांच्या मृत्यूपश्चातही अंशदायी योजनेचा लाभ मिळू शकलेला नाही. सन २००५ पासून तांत्रिकतेत अडकलेला ‘डीसीपीएस’चा गुंता अद्यापही न सुटल्याने महापालिकेतील कर्मचाºयांचे आर्थिक भवितव्य धोक्यात आले आहे.१ नोव्हेंबर २००५ नंतर राज्य शासकीय सेवेत आलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी ‘डीसीपीएस’ ही निवृतीवेतन योजना कार्यान्वित झाली. डीसीपीएस अर्थात परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना अमरावती महापालिकेतही लागू करण्यात आली. मात्र या योजनेतील कपातीचा हिशोब अद्यापही कर्मचाºयांना मिळालेला नाही. योजना लागू झाल्यानंतर तब्बल सात वर्षानंतर खाते मिळाले, तरीपण कधी कपात सुरू व कधी कपात बंद, असा नित्यक्रम कर्मचाऱ्यांसोबत सुरू आहे. आतापर्यंत किती कपात झाली, याचा हिशोब महापालिकेकडे नाही. त्यामुळे कर्मचारी-अधिकाऱ्यांमध्ये असंतोष माजला आहे.डीसीपीएसअंतर्गत संबंधित कर्मचाºयांच्या वेतनातून १० टक्के व तेवढीच रक्कम महापालिकेला संबंधित कर्मचाºयाच्या खात्यात जमा करायची होती. मात्र महापालिकेतील ६२८ पेक्षा अधिक कर्मचारी-अधिकाऱ्यांना त्यांच्या ‘डीसीपीएस’ कपातीचा हिशेब मिळालेला नाही. याबाबत मध्यंतरी सॉफ्टवेअरचा गुंता निर्माण झाला होता. तो सोडविण्याचा दावा करण्यात आला. तथापि २००५ नंतरच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनातून प्रतिमाह १० टक्के व महापालिकेकडून टाकल्या जाणाऱ्या १० टक्के व त्यावरील व्याजाचा कुठलाही हिशोब नाही. कर्मचाऱ्यांना कपातीच्या पावत्या मिळत नसल्याने कपातीची रक्कम जमा झाली की कसे? याबाबतही साशंकता आहे. या पार्श्वभूमिवर २००५ नंतर महापालिकेच्या सेवेत आलेले मात्र निवृत्तीपूर्वीच अकाली मृत्यू पावलेल्या कर्मचाºयांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. वर्ष-दोन वर्षानंतरही त्या मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना डिसीपीएस योजनेतील आर्थिक परतावा देण्यात आलेला नाही.गावंडे, पोपटकरसह १५ कुटुंबियपशूशल्यचिकित्सक सुधीर गावंडे, संगणक अभियंता सचिन पोपटकर यांच्यासह शिक्षक व स्वच्छता कामगार अशा एकूण १३ ते १५ कर्मचारी, अधिकाºयांचा मृत्यू झाला. ते सर्वजण डीसीपीएसधारक होते. मात्र अद्यापही त्यांच्या कुटुंबियांना कपातीची रक्कम मिळालेली नाही.पतीच्या मृत्यूनंतर त्यांच्या डीसीपीएस परताव्याबाबत महापालिका प्रशासनाशी पत्रव्यवहार केला. तथापि सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही.- जया सुधीर गावंडे.जे डीसीपीएसधारक कर्मचारी अधिकारी मृत झालेत, त्याबाबतचा प्रस्ताव आयुक्तांना सादर करण्यात येईल. तपासणी केल्यानंतर अंशदानाची रक्कम प्रदान करण्यात येईल.- प्रेमदास राठोड, मुख्यलेखाधिकारी