शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

अमरावती जिल्हा कचेरीवर ‘प्रहार’चे दशक्रिया आंदोलन; अवकाळीचे पंचनामे नाहीत

By गजानन उत्तमराव मोहोड | Updated: January 16, 2024 19:54 IST

प्रशासनाच्या उदासीन धोरणाने शेतकऱ्याची आत्महत्या झाल्याचा आरोप

अमरावती : अवकाळी पावसाने नुकसान झाल्यानंतरही महसूल विभागाने तिवसा तालुक्यातील पिकांचे पंचनामे केले नाहीत. त्यामुळे तालुका शासन मदतीपासून वंचित राहिला आहे. याच्या निषेधार्थ प्रहारद्वारा संजय देशमुख यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयावर मंगळवारी आत्महत्या केलेल्या वऱ्हा येथील शेतकऱ्याची दशक्रिया करून निषेध नोंदविण्यात आला.

नोव्हेंबरअखेरीस झालेल्या अवकाळी पावसाने तिवसा तालुक्यातील खरीप, रब्बी, भाजीपाला व फळपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. वेचणी राहिलेला कापूस बोंडातच भिजला. त्यामुळे शेतकरी अडचणीत आला. अशा परिस्थितीत जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांचा आदेश असतानाही महसूल व कृषी प्रशासनाने बाधित भागाचे पंचनामे केले नाहीत, त्यामुळे शासनाला अहवाल गेलेला नाही. परिणामी, नुकसान झाल्यावरही तालुका शासन मदतीपासून वंचित राहण्याची शक्यता आहे.

नापिकीला कंटाळून वऱ्हा येथील शेतकरी राजू चर्जन याने आत्महत्या केलेली आहे. त्यामुळे प्रहारद्वारा मंगळवारी या शेतकऱ्याची दशक्रिया जिल्हाधिकारी कार्यालयाचे परिसरात करण्यात आली. यावेळी योगेश लोखंडे, बाबाराव ठाकरे, अंकुश गायकवाड, सतीश गावंडे, अशोकराव लांजेवार, पंकज चौधरी, प्रवीण केणे, रवी पाथरे, नरेंद्र काकडे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.