शहरं
Join us  
Trending Stories
1
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
2
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
3
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
4
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
5
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
6
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
7
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
8
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
9
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
10
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
11
कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा
12
Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?
13
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
14
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
15
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
16
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
17
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
18
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
19
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात
20
नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 

अमरावती जिल्हा कचेरीवर ‘प्रहार’चे दशक्रिया आंदोलन; अवकाळीचे पंचनामे नाहीत

By गजानन उत्तमराव मोहोड | Updated: January 16, 2024 19:54 IST

प्रशासनाच्या उदासीन धोरणाने शेतकऱ्याची आत्महत्या झाल्याचा आरोप

अमरावती : अवकाळी पावसाने नुकसान झाल्यानंतरही महसूल विभागाने तिवसा तालुक्यातील पिकांचे पंचनामे केले नाहीत. त्यामुळे तालुका शासन मदतीपासून वंचित राहिला आहे. याच्या निषेधार्थ प्रहारद्वारा संजय देशमुख यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयावर मंगळवारी आत्महत्या केलेल्या वऱ्हा येथील शेतकऱ्याची दशक्रिया करून निषेध नोंदविण्यात आला.

नोव्हेंबरअखेरीस झालेल्या अवकाळी पावसाने तिवसा तालुक्यातील खरीप, रब्बी, भाजीपाला व फळपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. वेचणी राहिलेला कापूस बोंडातच भिजला. त्यामुळे शेतकरी अडचणीत आला. अशा परिस्थितीत जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांचा आदेश असतानाही महसूल व कृषी प्रशासनाने बाधित भागाचे पंचनामे केले नाहीत, त्यामुळे शासनाला अहवाल गेलेला नाही. परिणामी, नुकसान झाल्यावरही तालुका शासन मदतीपासून वंचित राहण्याची शक्यता आहे.

नापिकीला कंटाळून वऱ्हा येथील शेतकरी राजू चर्जन याने आत्महत्या केलेली आहे. त्यामुळे प्रहारद्वारा मंगळवारी या शेतकऱ्याची दशक्रिया जिल्हाधिकारी कार्यालयाचे परिसरात करण्यात आली. यावेळी योगेश लोखंडे, बाबाराव ठाकरे, अंकुश गायकवाड, सतीश गावंडे, अशोकराव लांजेवार, पंकज चौधरी, प्रवीण केणे, रवी पाथरे, नरेंद्र काकडे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.