शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
2
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
3
Eknath Shinde: आपली पोरं सांभाळू शकत नाहीत, मुंबई काय सांभाळणार? एकनाथ शिंदेंची ठाकरे बंधूंवर टीका
4
"पराभव समोर दिसताच भाजप पैसा आणि जातीचे राजकारण सुरू करते" आदित्य ठाकरेंची बोचरी टीका!
5
विराट सेंच्युरी! किंग कोहलीनं मोडला मास्टर ब्लास्टर सचिनचा रेकॉर्ड; वेगाने गाठला १६००० धावांचा पल्ला
6
नितेश राणे, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना कोर्टाचा दणका, बजावलं अजामिनपात्र वॉरंट
7
जपानमध्ये शंभरी पार करणार्‍यांची संख्या लक्षावधी, महिलांचे प्रमाण अधिक; दीर्घायुष्याचे गुपित काय?
8
युतीची घोषणा मात्र जागांचा सस्पेन्स; उद्धवसेना-मनसेत जागावाटपावर 'असा' ठरलाय फॉर्म्युला?
9
सोनं थांबेना, चांदी आवरेना! सोन्याच्या दरात ७०% तर चांदीत १५० टक्क्यांची वाढ; पाहा कुठे पोहोचतील किमती?
10
राष्ट्रवादीचे नेते राहुल कलाटे भाजपमध्ये;पक्षातील कार्यकर्त्यांचा विरोध डावलून दिला प्रवेश
11
'या' वाक्यापासून आम्ही एकत्र येण्याची सुरुवात झाली; राज ठाकरेंनी सांगितली 'मनोमिलना'ची कथा
12
Christmas Sale 2025: स्मार्टफोन, कपडे आणि घरगुती उपकरणांवर सवलतींचा पाऊस; वर्षाच्या शेवटी कुठे आहेत बंपर ऑफर्स
13
युती होताच दाखवलं शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतरच पहिलं भाषण; भाजपनं राज ठाकरेंना डिवचलं
14
रोहितच्या शतकानं मन भरलं नाही! चाहत्याची थेट मुंबईचा कर्णधार शार्दुल ठाकूरला विनंती! आम्हाला...
15
नोकरी गेली तरी भीती नाही, तुमच्या कर्जाचा हप्ता आता विमा कंपनी भरेल; नक्की काय आहे प्रकरण?
16
उल्हासनगरात उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; कल्याण जिल्हाप्रमुख धनंजय बोडारे यांचा भाजपात प्रवेश
17
"आमचा हिंदुत्ववाद केवळ पूजापद्धतीवर आधारित नाही तर..."; CM फडणवीसांनी ठाकरे बंधूंना सुनावलं
18
मेष वार्षिक राशिभविष्य २०२६: 'आत्मिक शांती' आणि प्रगतीचे वर्ष; आव्हाने पेलून गाठता येणार यशाचे शिखर!
19
प्राजक्ताच्या स्वप्नातील राजकुमार आहे तरी कसा? लग्नासाठी तिची एकच अट; सिंगल राहण्यामागचं खरं कारण समोर
20
जालना महापालिकेत भाजपानं युती न केल्यास सर्व पर्याय खुले; शिंदेसेनेचे आमदार खोतकरांचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

अमरावती जिल्हा कचेरीवर ‘प्रहार’चे दशक्रिया आंदोलन; अवकाळीचे पंचनामे नाहीत

By गजानन उत्तमराव मोहोड | Updated: January 16, 2024 19:54 IST

प्रशासनाच्या उदासीन धोरणाने शेतकऱ्याची आत्महत्या झाल्याचा आरोप

अमरावती : अवकाळी पावसाने नुकसान झाल्यानंतरही महसूल विभागाने तिवसा तालुक्यातील पिकांचे पंचनामे केले नाहीत. त्यामुळे तालुका शासन मदतीपासून वंचित राहिला आहे. याच्या निषेधार्थ प्रहारद्वारा संजय देशमुख यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयावर मंगळवारी आत्महत्या केलेल्या वऱ्हा येथील शेतकऱ्याची दशक्रिया करून निषेध नोंदविण्यात आला.

नोव्हेंबरअखेरीस झालेल्या अवकाळी पावसाने तिवसा तालुक्यातील खरीप, रब्बी, भाजीपाला व फळपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. वेचणी राहिलेला कापूस बोंडातच भिजला. त्यामुळे शेतकरी अडचणीत आला. अशा परिस्थितीत जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांचा आदेश असतानाही महसूल व कृषी प्रशासनाने बाधित भागाचे पंचनामे केले नाहीत, त्यामुळे शासनाला अहवाल गेलेला नाही. परिणामी, नुकसान झाल्यावरही तालुका शासन मदतीपासून वंचित राहण्याची शक्यता आहे.

नापिकीला कंटाळून वऱ्हा येथील शेतकरी राजू चर्जन याने आत्महत्या केलेली आहे. त्यामुळे प्रहारद्वारा मंगळवारी या शेतकऱ्याची दशक्रिया जिल्हाधिकारी कार्यालयाचे परिसरात करण्यात आली. यावेळी योगेश लोखंडे, बाबाराव ठाकरे, अंकुश गायकवाड, सतीश गावंडे, अशोकराव लांजेवार, पंकज चौधरी, प्रवीण केणे, रवी पाथरे, नरेंद्र काकडे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.