शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
2
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
3
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
4
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
5
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
6
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
7
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
8
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
9
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
10
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
11
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
12
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
13
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
14
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
15
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
16
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
17
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
18
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
19
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
20
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना

दर्यापूर सूतगिरणी बंद होणार?

By admin | Updated: August 9, 2016 00:07 IST

येथील अनेक वर्षांपासून बंद असलेल्या संत गाडगेबाबा सहकारी सूतगिरणीचा लिलाव करण्याचा एमएस बँकेचा घाट असल्याचा आरोप कामगार नेता रवि कोरडे यांनी केला आहे.

कामगारांचे भविष्य धोक्यात : एमएस बँकेचा घाट, पुनरूज्जीवनाची मागणीदर्यापूर : येथील अनेक वर्षांपासून बंद असलेल्या संत गाडगेबाबा सहकारी सूतगिरणीचा लिलाव करण्याचा एमएस बँकेचा घाट असल्याचा आरोप कामगार नेता रवि कोरडे यांनी केला आहे. कामगारांच्या शेतकऱ्यांच्या हक्काची असलेली ही सूतगिरणी वाचविण्यासाठी सर्व नेत्यांनी व सामाजिक संघटनांनी एकत्रित येऊन लढा द्यावा, असे मत रवि कोरडे यांनी व्यक्त केले.दर्यापूरची सूतगिरणी २००७ पासून बंद आहे. या सूतगिरणीवर कोट्यवधी रुपयांचे राज्य सहकारी बँक (एमएस बँक)चे कर्ज आहे. त्यामुळे बँकेने या सूतगिरणीला सील लावले आहे. गेल्या ९ वर्षांपासून ७०० कामगारांचा रोजगार यामुळे बंद पडला आहे. काहींनी दुसरा रोजगार शोधला, तर अनेकांवर उपासमारीची पाळी आली असून ज्या कामगारांनी आयुष्यभर या सूतगिरणीत काम केले. ते कामगार सूतगिरणी सुरूहोईल, या भाबड्या आशेने चातक पक्षाप्रमाणे वाट पाहत आहेत. सूतगिरणी बंद पडायला अनेक कारणे आहेत. बँकेकडून सूतगिरणीेच्या उभारणीसाठी जे कर्ज घेण्यात आले त्या कर्जाचे नेहमीत हप्ते न भरणे, वीज वितरण कंपनीचे थकीत बिल व वारंवार सूतगिरणी बंद पडणे, अशा अनेक कारणांमुळे सूतगिरणीला अखेरची घरघर लाभली आहे. एप्रिल २०१६ मध्ये वस्त्रोउद्योग मंत्री ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत गिरणी ही भाडेतत्त्वावर चालविण्याबाबत चर्चा करून या बैठकीत सूतगिरणीचे पुनर्जीवन करण्यासंदर्भात शासनाच्या विचारधीन होते. सदर सूतगिरणी अवसायनात निघाल्यामुळे उच्च न्यायालयाच्या आदेशाने सदर सूतगिरणी अवसायकाने विकून बँकेचे कर्ज फेडावे, असे एमएस बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. पण शासनाने हा मुद्या गंभीरतेने घेतला नाही. गिरणीची विक्री करण्याबाबतचे आदेश बँकेच्या अधिकाऱ्यांना मिळाले असून ही गिरणी जर विकली तर याची २२ कोटी एवढी निधारित किंमत असून गिरणीकडून बँकेचे कर्ज, सभासद, भागभांडवल, शासन भागभांडवल, हमी, शुल्क, हमी शुल्कावरील दंड व्याज, दीर्घ मुदत कर्ज, वीज बिल असे २००५ च्या अहवालानुसार व इतर देणी असे १२२ क ोटींच्या घरात देणी असून ही सूतगिरणी बँकेने विकली. बँकेचे व अनेकांचे कर्ज बुडेल, त्यामुळे शासनाने पुढाकार घेऊन या सूतगिरणीला पुनर्जीवित करावे व भाडेतत्त्वावर देऊन त्याचे उत्पन्न वाढवावे व बँकेचे कर्ज व शेतकऱ्यांचे भागभांडवलचा यातून भरणा करावा व कामगारांना रोजगार मिळवून द्यावा, अशी कामगारांची व शेतकऱ्यांची मागणी आहे. (शहर प्रतिनिधी)