शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

कुंभाराच्या जीवनात अंधार

By admin | Updated: October 21, 2014 22:44 IST

दिवाळी ही भारतीय सणांची सम्राज्ञी, भारतीयांच्या सर्वात महत्वपूर्ण दिवाळी सणात मातीच्या पणत्याला सर्वाधिक मान आहे. आधुनिक युगात विविध प्रतीच्या पणत्या बाजारात येत असल्या तरी आजही

सुरेश सवळे - चांदूरबाजारदिवाळी ही भारतीय सणांची सम्राज्ञी, भारतीयांच्या सर्वात महत्वपूर्ण दिवाळी सणात मातीच्या पणत्याला सर्वाधिक मान आहे. आधुनिक युगात विविध प्रतीच्या पणत्या बाजारात येत असल्या तरी आजही मातीच्या पणत्यांना विशेष महत्व आहे. सर्व समाजाची दिवाळी प्रकाशमय पणत्यांनी उजळून टाकणाऱ्या कुंभाराचे जीवन मात्र अंधारमय झाले असल्याचे वास्तव आहे. गावातील परंपरा जपणारा कुंभार मातीच्या पारंपारिक पणत्या आजही आपल्या हातांनी त्यांना आकार देतो आहे. बाजारात उपलब्ध असलेल्या कलाकुसरीच्या पणत्यामुळे मातीच्या पणत्याकडे ग्राहक पाठ फिरवित आहेत. चोवीस तासावर आलेल्या दिवाळीने चांदूरबाजार शहरातील जयस्तंभ चौक, गांधी चौक, आठवडी बाजार चौकात पणत्या, मापुल विकणाऱ्यांनी आपली दुकाने थाटली आहेत. यात आकर्षक अशा इंग्रजी मातीच्या, प्लास्टर आॅफ पॅरीसच्या वेगवेगळ्या आकारातील पणत्या ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करीत आहेत. त्याच्याच जोडीला इलेक्ट्रीक पणत्याही सजल्या आहेत. त्यामुळे स्थानिक कुंभार जातीच्या कारागिरांनी पारंपारिक पद्धतीने बनविलेल्या मातीच्या पणत्याची मागणी अत्यंत कमी झाल्याचे चित्र बघायला मिळत आहे. लक्ष्मीपुजनासाठी लागणाऱ्या पाचच मातीच्या पणत्या आणि मापुल या पलिकडे मातीच्या पणत्यांना आज तरी बाजारात फारशी मागणी दिसत नाही. आज विद्युत रोषणाईला सुगीचे दिवस आल्याने मातीच्या पणत्याची मागणी कमी झाली आहे. साधारणपणे पाच दिवस चालणाऱ्या दिवाळीतील लक्ष्मीपुजनाच्या दिवशी घरात, घरासमोरील प्रवेशद्वारात नक्षीदार रांगोळीवर घराच्या छतावर ओळीने पणत्या पेटविल्या जातात.वर्षातील दिवाळी हा महत्वाचा सण असल्याने परिसरातील कुंभार व त्यांचे कुटूंब तीन-चार महिन्यापूर्वी पासून फिरत्या चाकावर आपल्या हातानी मातीच्या पणत्या बनविण्याच्या कामाला लागलेला असतो. नदीकाठावरील गाळाच्या मातीत घोड्याची लिद मिसळून या मातीला पाण्याने भिजवून ८ ते १० दिवस या मातीवर मेहनत करतो. त्यानंतर तयार मातीपासून पारंपारिक पणत्या तयार केल्या जातात. नंतर त्याला आव्यामध्ये भाजून गेरूच्या पाण्यात बुडवून रंग दिल्या जातो. या सगळ्या संस्कारातून तयार झालेल्या गावरान पणत्याकडे ग्राहकांनी मात्र पाठ फिरविली आहे. सर्व समाजाची दिवाळी आपल्या कलाकुसरीने प्रकाशमय करणाऱ्या कुंभाराचे जीवन अंधारमय झाले आहे. दिवाळीच्या पारंपारिक लोकगीतात ‘चला जाऊ कुंभार पाहू, कुंभार माती काय तुडवितो’ यासारखे गीत म्हटले जाई आज कुंभार असतांनाही त्याच्या मातीला मोलही राहीले नाही. दिवाळीच्या लोकगीतातून आणि आजच्या समाज जीवनातून एकेकाळचा बलुतेदार असलेला कुंभार आधुनिक काळात मात्र उपेक्षितच राहीला आहे.