शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

कुंभाराच्या जीवनात अंधार

By admin | Updated: October 21, 2014 22:44 IST

दिवाळी ही भारतीय सणांची सम्राज्ञी, भारतीयांच्या सर्वात महत्वपूर्ण दिवाळी सणात मातीच्या पणत्याला सर्वाधिक मान आहे. आधुनिक युगात विविध प्रतीच्या पणत्या बाजारात येत असल्या तरी आजही

सुरेश सवळे - चांदूरबाजारदिवाळी ही भारतीय सणांची सम्राज्ञी, भारतीयांच्या सर्वात महत्वपूर्ण दिवाळी सणात मातीच्या पणत्याला सर्वाधिक मान आहे. आधुनिक युगात विविध प्रतीच्या पणत्या बाजारात येत असल्या तरी आजही मातीच्या पणत्यांना विशेष महत्व आहे. सर्व समाजाची दिवाळी प्रकाशमय पणत्यांनी उजळून टाकणाऱ्या कुंभाराचे जीवन मात्र अंधारमय झाले असल्याचे वास्तव आहे. गावातील परंपरा जपणारा कुंभार मातीच्या पारंपारिक पणत्या आजही आपल्या हातांनी त्यांना आकार देतो आहे. बाजारात उपलब्ध असलेल्या कलाकुसरीच्या पणत्यामुळे मातीच्या पणत्याकडे ग्राहक पाठ फिरवित आहेत. चोवीस तासावर आलेल्या दिवाळीने चांदूरबाजार शहरातील जयस्तंभ चौक, गांधी चौक, आठवडी बाजार चौकात पणत्या, मापुल विकणाऱ्यांनी आपली दुकाने थाटली आहेत. यात आकर्षक अशा इंग्रजी मातीच्या, प्लास्टर आॅफ पॅरीसच्या वेगवेगळ्या आकारातील पणत्या ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करीत आहेत. त्याच्याच जोडीला इलेक्ट्रीक पणत्याही सजल्या आहेत. त्यामुळे स्थानिक कुंभार जातीच्या कारागिरांनी पारंपारिक पद्धतीने बनविलेल्या मातीच्या पणत्याची मागणी अत्यंत कमी झाल्याचे चित्र बघायला मिळत आहे. लक्ष्मीपुजनासाठी लागणाऱ्या पाचच मातीच्या पणत्या आणि मापुल या पलिकडे मातीच्या पणत्यांना आज तरी बाजारात फारशी मागणी दिसत नाही. आज विद्युत रोषणाईला सुगीचे दिवस आल्याने मातीच्या पणत्याची मागणी कमी झाली आहे. साधारणपणे पाच दिवस चालणाऱ्या दिवाळीतील लक्ष्मीपुजनाच्या दिवशी घरात, घरासमोरील प्रवेशद्वारात नक्षीदार रांगोळीवर घराच्या छतावर ओळीने पणत्या पेटविल्या जातात.वर्षातील दिवाळी हा महत्वाचा सण असल्याने परिसरातील कुंभार व त्यांचे कुटूंब तीन-चार महिन्यापूर्वी पासून फिरत्या चाकावर आपल्या हातानी मातीच्या पणत्या बनविण्याच्या कामाला लागलेला असतो. नदीकाठावरील गाळाच्या मातीत घोड्याची लिद मिसळून या मातीला पाण्याने भिजवून ८ ते १० दिवस या मातीवर मेहनत करतो. त्यानंतर तयार मातीपासून पारंपारिक पणत्या तयार केल्या जातात. नंतर त्याला आव्यामध्ये भाजून गेरूच्या पाण्यात बुडवून रंग दिल्या जातो. या सगळ्या संस्कारातून तयार झालेल्या गावरान पणत्याकडे ग्राहकांनी मात्र पाठ फिरविली आहे. सर्व समाजाची दिवाळी आपल्या कलाकुसरीने प्रकाशमय करणाऱ्या कुंभाराचे जीवन अंधारमय झाले आहे. दिवाळीच्या पारंपारिक लोकगीतात ‘चला जाऊ कुंभार पाहू, कुंभार माती काय तुडवितो’ यासारखे गीत म्हटले जाई आज कुंभार असतांनाही त्याच्या मातीला मोलही राहीले नाही. दिवाळीच्या लोकगीतातून आणि आजच्या समाज जीवनातून एकेकाळचा बलुतेदार असलेला कुंभार आधुनिक काळात मात्र उपेक्षितच राहीला आहे.