शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
2
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
3
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
4
IND vs AUS : बढती मिळताच अय्यरनं टीम इंडियाला जिंकून दिली ट्रॉफी; घरच्या मैदानात कांगारुंची शिकार
5
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
6
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
7
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
8
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
9
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
10
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
11
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
12
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
13
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
14
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
15
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
16
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
17
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
18
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
19
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
20
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार

कुंभाराच्या जीवनात अंधार

By admin | Updated: October 21, 2014 22:44 IST

दिवाळी ही भारतीय सणांची सम्राज्ञी, भारतीयांच्या सर्वात महत्वपूर्ण दिवाळी सणात मातीच्या पणत्याला सर्वाधिक मान आहे. आधुनिक युगात विविध प्रतीच्या पणत्या बाजारात येत असल्या तरी आजही

सुरेश सवळे - चांदूरबाजारदिवाळी ही भारतीय सणांची सम्राज्ञी, भारतीयांच्या सर्वात महत्वपूर्ण दिवाळी सणात मातीच्या पणत्याला सर्वाधिक मान आहे. आधुनिक युगात विविध प्रतीच्या पणत्या बाजारात येत असल्या तरी आजही मातीच्या पणत्यांना विशेष महत्व आहे. सर्व समाजाची दिवाळी प्रकाशमय पणत्यांनी उजळून टाकणाऱ्या कुंभाराचे जीवन मात्र अंधारमय झाले असल्याचे वास्तव आहे. गावातील परंपरा जपणारा कुंभार मातीच्या पारंपारिक पणत्या आजही आपल्या हातांनी त्यांना आकार देतो आहे. बाजारात उपलब्ध असलेल्या कलाकुसरीच्या पणत्यामुळे मातीच्या पणत्याकडे ग्राहक पाठ फिरवित आहेत. चोवीस तासावर आलेल्या दिवाळीने चांदूरबाजार शहरातील जयस्तंभ चौक, गांधी चौक, आठवडी बाजार चौकात पणत्या, मापुल विकणाऱ्यांनी आपली दुकाने थाटली आहेत. यात आकर्षक अशा इंग्रजी मातीच्या, प्लास्टर आॅफ पॅरीसच्या वेगवेगळ्या आकारातील पणत्या ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करीत आहेत. त्याच्याच जोडीला इलेक्ट्रीक पणत्याही सजल्या आहेत. त्यामुळे स्थानिक कुंभार जातीच्या कारागिरांनी पारंपारिक पद्धतीने बनविलेल्या मातीच्या पणत्याची मागणी अत्यंत कमी झाल्याचे चित्र बघायला मिळत आहे. लक्ष्मीपुजनासाठी लागणाऱ्या पाचच मातीच्या पणत्या आणि मापुल या पलिकडे मातीच्या पणत्यांना आज तरी बाजारात फारशी मागणी दिसत नाही. आज विद्युत रोषणाईला सुगीचे दिवस आल्याने मातीच्या पणत्याची मागणी कमी झाली आहे. साधारणपणे पाच दिवस चालणाऱ्या दिवाळीतील लक्ष्मीपुजनाच्या दिवशी घरात, घरासमोरील प्रवेशद्वारात नक्षीदार रांगोळीवर घराच्या छतावर ओळीने पणत्या पेटविल्या जातात.वर्षातील दिवाळी हा महत्वाचा सण असल्याने परिसरातील कुंभार व त्यांचे कुटूंब तीन-चार महिन्यापूर्वी पासून फिरत्या चाकावर आपल्या हातानी मातीच्या पणत्या बनविण्याच्या कामाला लागलेला असतो. नदीकाठावरील गाळाच्या मातीत घोड्याची लिद मिसळून या मातीला पाण्याने भिजवून ८ ते १० दिवस या मातीवर मेहनत करतो. त्यानंतर तयार मातीपासून पारंपारिक पणत्या तयार केल्या जातात. नंतर त्याला आव्यामध्ये भाजून गेरूच्या पाण्यात बुडवून रंग दिल्या जातो. या सगळ्या संस्कारातून तयार झालेल्या गावरान पणत्याकडे ग्राहकांनी मात्र पाठ फिरविली आहे. सर्व समाजाची दिवाळी आपल्या कलाकुसरीने प्रकाशमय करणाऱ्या कुंभाराचे जीवन अंधारमय झाले आहे. दिवाळीच्या पारंपारिक लोकगीतात ‘चला जाऊ कुंभार पाहू, कुंभार माती काय तुडवितो’ यासारखे गीत म्हटले जाई आज कुंभार असतांनाही त्याच्या मातीला मोलही राहीले नाही. दिवाळीच्या लोकगीतातून आणि आजच्या समाज जीवनातून एकेकाळचा बलुतेदार असलेला कुंभार आधुनिक काळात मात्र उपेक्षितच राहीला आहे.