शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

बंद पथदिव्यांमुळे अंधाराचे साम्राज्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2018 22:58 IST

शहरातील दुभाजकांवरील पथदिवे वर्षभरापासून बंद आहेत. यामुळे मुख्य रस्त्यावर रात्रीच्यावेळी अंधाराचे साम्राज्य निर्माण झाले आहे. याशिवाय अनेक प्रभागातील पथदिवे बंद राहात असून नगर परिषद प्रशासन व सत्ताधाºयांचे दुर्लक्ष असल्याचा आरोप नागरिक करीत आहे.

ठळक मुद्देआरोप : नगर परिषद प्रशासन व सत्ताधाऱ्यांचे दुर्लक्ष

प्रभाकर भगोले ।लोकमत न्यूज नेटवर्कचांदूर रेल्वे : शहरातील दुभाजकांवरील पथदिवे वर्षभरापासून बंद आहेत. यामुळे मुख्य रस्त्यावर रात्रीच्यावेळी अंधाराचे साम्राज्य निर्माण झाले आहे. याशिवाय अनेक प्रभागातील पथदिवे बंद राहात असून नगर परिषद प्रशासन व सत्ताधाºयांचे दुर्लक्ष असल्याचा आरोप नागरिक करीत आहे.चांदूर रेल्वे शहराचे सौंदर्यीकरण व्हावे, या दृष्टीने विशेष निधीतून रेल्वे स्टेशन ते सिनेमा चौकापर्यंत दुभाजकावर दोन्ही बाजूने १०५ पथदिवे ४ वर्षांपूर्वी बसविण्यात आले. यामुळे शहर प्रकाशझोतात आले होते. याच मुख्य रस्त्यावरून नागरिकांची सतत वर्दळ सुरू राहते. रात्रीच्या वेळी व पहाटे असंख्य प्रवासी रेल्वेतून उतरत चौकाकडे येत असताना सगळीकडे अंधार पसरलेला असतो. वर्षभरापासून सदर पथदिवे बंद असून ते केवळ शोभेची वस्तू बनली आहेत. शुक्रवारी गाडगेबाबा मार्केट, शिक्षक कॉलनी रोड, रामनगर भागातील अनेक पथदिवे बंद दिसून आले. याशिवाय शहरातील अनेक भागांतील पथदिवे बंद राहत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. बंद पथदिव्यांबाबत नगर परिषद प्रशासनाचे तसेच सत्ताधाºयांचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप शहरवासी करीत आहे. त्यामुळे दुभाजकासह संपूर्ण शहरातील पथदिवे कधी दुरूस्त होऊन शहरात प्रकाशझोत पहावयास मिळणार, हे येणारा काळच सांगेल. मॉर्निंग वॉक करणारे जातात टॉर्च घेऊनपहाटेदरम्यान अनेक शहरवासी मॉर्निंग वॉककरिता रेल्वे स्टेशनकडे जातात. परंतु पहाटेच्या वेळी बंद पथदिव्यांमुळे चक्क टॉर्च सोबत घेऊन शहरवासीयांना मॉर्निंग वॉकला जाणे भाग पडत आहे.दोन दिवसांनंतर रमजान महिना प्रारंभयेत्या २ दिवसांनंतर मुस्लिम बांधवांच्या पवित्र रमजान महिन्याला सुरूवात होणार आहे. या अंधाराच्या साम्राज्यामुळे त्यांनासुध्दा नाहक त्रास सहन करावा लागणार असल्याची शक्यता आहे. याचा विचार करून नगर परिषदेने त्वरित पथदिवे सुरू करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.दुभाजकावरील पथदिव्यांच्या आतील वायरिंंग नादुरूस्त आहे. या संपूर्ण कामाकरिता अंदाजे १० ते १२ लाखांचा निधी अपेक्षित आहे. निधी उपलब्धीसाठी प्रयत्न सुरू आहे.- रवींद्र पाटील, मुख्याधिकारी, नगर परिषद