शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तराखंडच्या राज्यपालांचा धामींना धक्का ! UCC दुरुस्ती व धर्मांतर विरोधी सुधारणा विधेयक परत पाठविले
2
न्यायाधीशांना ई-मेल पाठवून नागपूर जिल्हा न्यायालयात बॉम्बस्फोट करण्याची धमकी
3
माजी आमदार प्रज्ञा सातव यांचा भाजपमध्ये प्रवेश! काँग्रेसचं काय चुकतंय विचारताच, म्हणाल्या...
4
खळबळजनक दावा! "मुंबईत १० हजार कोटींचं बजेट, प्रत्येक उमेदवाराला शिंदेसेना देणार १० कोटी"
5
‘मला उमेदवारी द्या, अन्यथा माझ्या जीवाचं काही बरंवाईट झाल्यास पक्ष जबाबदार राहील’, भाजपाच्या निष्ठावंत कार्यकर्त्याची धमकी
6
चांदीची 'पांढरी' लाट! सोन्याला मागे टाकत गाठला २ लाखांचा ऐतिहासिक टप्पा; काय आहेत भाववाढीची कारणे?
7
डोनाल्ड ट्रम्प यांनी अचानक का वापरलं 'भारत मॉडेल'?; मिड टर्म निवडणुकीपूर्वी अमेरिकेत मोफत खैरात
8
'पुढे दरोडा पडलाय, दागिने काढून ठेवा'; पोलिसांच्या वेशातील टोळीचा पर्दाफाश, लोकांना घाबरवून लुटायचे
9
Donald Trump :"टॅरिफ माझा फेव्हरीट, मी 10 महिन्यांत...!" डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा
10
"विश्वविख्यात बोलले म्हणजे त्यांचे २९ महापालिकांत पराभव पक्के", भाजपाने संजय राऊतांना डिवचलं
11
Car 360 Degree Camera: कारमध्ये ३६० डिग्री कॅमेरा असणं किती फायद्याचं? नेमकं कसं आणि काय काम करतो?
12
Mumbai: खड्ड्यात दुचाकी आदळून तरुणाचा मृत्यू, पण पोलिसांनी मृतावरच नोंदवला गुन्हा!
13
"आम्ही काही मैत्रिणी नाही आहोत...", लारा दत्तासोबत काम केल्यावर रिंकू राजगुरुची प्रतिक्रिया
14
Supriya Sule: "धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात घेतले तर...", खासदार सुप्रिया सुळेंचा इशारा!
15
मोठी बातमी! प्रज्ञा सातव यांचा काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा
16
अर्टिगाचे काही खरे नाही...! ७-सीटर 'ग्रॅव्हाईट' लाँच होणार, ६ लाखांत मिळणार हाय-टेक फीचर्स...
17
निष्काळजीपणाचा कळस! 'A' पॉझिटिव्ह ऐवजी 'B+' रक्त अन्...; ७५ वर्षीय रुग्णाच्या जीवाशी खेळ
18
Ola Electric च्या शेअर्समध्ये मोठी घसरण! भाविश अग्रवाल यांनी हिस्सा विकून फेडलं कर्ज; पण गुंतवणूकदारांची चिंता वाढली
19
"हा माझा शेवटचा व्हिडीओ आहे, मला रशियाने बळजबरी युद्धात..."; भारतीय तरुणाचा मृत्यू, आईवडिलांवर आघात
20
तुम्हाला क्युट वाटणारा 'सांताक्लॉज' म्हणजे कोका-कोलाचा बिझनेस मास्टरस्ट्रोक! सत्य वाचून बसेल धक्का
Daily Top 2Weekly Top 5

दर्यापूर तालुक्यात हजार हेक्टरमधील पिके पाण्यात

By admin | Updated: August 11, 2016 00:02 IST

जुलै-आॅगस्ट महिन्यात सातत्याने सुरू असलेल्या पावसामुळे तालुक्यातील पिकांना जोरदार फटका बसला आहे.

संततधार पावसाचा परिणाम : शेतकरी पुन्हा चिंताग्रस्त, दुबार पेरणीचे संकटदर्यापूर : जुलै-आॅगस्ट महिन्यात सातत्याने सुरू असलेल्या पावसामुळे तालुक्यातील पिकांना जोरदार फटका बसला आहे. पावसामुळे तालुक्यातील सुमारे हजार हेक्टर जमिनीतील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. दर्यापूर तालुक्यातील विविध गावांमध्ये पिकांची हानी झाली आहे.तुरीचे पीक शेतकऱ्यांच्या हातून गेले आहे. यावर्षी जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून पावसाने जोरदार हजेरी लावली होती. त्यातही आॅगस्ट महिन्याच्या सुरवातीला संततधार व पाऊस सुरु आहे. परिणामी सखल भागातील पिके पाण्याखाली गेली आहेत. नदी-नाल्यांना पूर आला. याचा फटका तालुक्यातील नदीकाठावरील गावांमधील शेतीला बसला. तालुक्यातील सुमारे ७०० ते ८०० हेक्टरमधील पिकांचे पूर व पावसामुळे नुकसान झाले. खारपाणपट्ट्यात पावसाच्या पाण्याचा निचरा न झाल्याने पिके अद्यापही पाण्याखाली आहेत. बऱ्याच ठिकाणी शेतात पाणी साचल्याने आंतरमशागत करणे शक्य नाही. जुलै महिन्यात काही ठिकाणी अतिवृष्टीसदृश पाऊस झाला आहे. त्यामुळे तूर, मूग व अन्य पिकांची प्रचंड हानी झाली आहे. तब्बल ६०० हेक्टरमधील पिके पाण्याखाली आहेत.काही ठिकाणी पुरामुळे पिके खरडून गेली आहेत. तालुक्यात मागील तीन वर्षांपासून पाऊस कमी झाल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त होते. चालू वर्षात मात्र २ टक्क्याने अधिक पाऊस झाला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदाचा पाऊस अधिक आहे. तालुक्यातील खल्लार सर्कलमधील अकरा गावांमध्ये पंधरा दिवसांपूर्वी वडाळी नाल्याचा बांध फुटल्याने खल्लार, सांगवा, घडा, महिमापूर, उपराई व इतर गावांमधील शेतांमध्ये पाणी शिरल्याने हजारो हेक्टर पिकांचे नुकसान झाले आहे. शासनामार्फत ज्यांच्या शेतातील पिकांचे नुकसान झाले आहे त्यांचा सर्वे करण्यात आला. परंतु अद्याप शेतकऱ्यांना कोणतीही मदत मिळाली नाही. दुबार पेरणीची वेळ शेतकऱ्यांवर आल्याने त्यांना तातडीने शासनाकडून मदत अपेक्षित आहे. परिसरातील पीकहानीचे सर्वेक्षण करून तातडीने नुकसानभरपाई देण्याच्या मागणीसाठी विविध संघटनांच्यावतीने उपविभागीय अधिकारी व तहसीलदारांना निवेदन देण्यात आले होते. परंतु अद्यापही कोणतीच मदत मिळाली नाही, त्यामुळे तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाले आहेत. मदतीची मागणी केली जात आहे. (शहर प्रतिनिधी)माझ्या एकूण ५ एकर शेतातील पीक वडाळी नाल्याचा बांध फुटल्याने खरडून गेले. परंतु शासनामार्फत अद्यापही कोणतीच मदत मिळालेली नाही. तातडीने मदत मिळावी. -राजू कराडे,शेतकरीतालुक्यात ज्याठिकाणी पावसामुळे पिकांचे नुकसान झाले, त्याची पाहणी करण्यात आली आहे. पुढील अहवाल शासनाकडे पाठविण्यात आला आहे. -पी.डी.लंगोटे, कृषी अधिकारी, अचलपूर