शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्यरात्रीनंतर सोलार एक्सप्लोजिव्हधील स्फोटांनी हादरले बाजारगाव, एकाचा मृत्यू : १६ कामगार जखमी, चौघे अत्यवस्थ
2
पाकिस्तानी क्रिकेटरवर लैंगिक अत्याचाराचा आरोप, पोलिसांनी मैदानातून उचललं, कोर्टानेदिला निकाल
3
बळीराजाची खरी दिवाळी...! जीएसटी कपातीचा शेतकऱ्यांना काय-काय फायदा होणार? एकदा पहाच... 
4
आजचे राशीभविष्य - ४ सप्टेंबर २०२५, आज यश, कीर्ती व आनंद लाभेल, नोकरीत सहकारी चांगले सहकार्य करतील
5
वाट माझी बघतोय रिक्षावाला संघटना खूश होणार; कार, दुचाकींवर लागणार एवढा जीएसटी...
6
GST: मोठी घोषणा! २२ सप्टेंबरपासून नवीन जीएसटी दर लागू होणार; काय स्वस्त काय महागले...
7
GST Rate Cuts News: आरोग्य विमा, जीवन विम्यासह ३३ औषधांवर शून्य GST; विद्यार्थ्यांना काय...? 
8
दिल्ली पोलीस पुण्यात आले, बेड्या ठोकून घेऊन गेले; बलात्कार प्रकरणी अभिनेता आशिष कपूरला अटक
9
कामगारांनो, आता ९ तासांऐवजी १२ तास काम, मात्र...; राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय
10
दादर टर्मिनसबाहेरील पार्किंगमध्ये दुचाकी पेटल्या; १०-१२ दुचाकी खाक
11
भिवंडीत उड्डाणपुलावर दोन भरधाव कारचा अपघात, दुचाकीस्वाराचा थेट रस्त्यावर पडून दुर्दैवी मृत्यू
12
यमुनेचा रौद्रावतार! पुरग्रस्तांच्या छावण्यांतही पाणी घुसले; २०१३ ची पातळी ओलांडली
13
मराठा आंदोलन संपताच राज ठाकरे वर्षा बंगल्यावर; घेतले गणपतीचे दर्शन, मुख्यमंत्र्यांकडून स्वागत
14
जिओ कंपनी उदार झाली...! ९ वर्ष झाल्याचे सेलिब्रेशन करणार; एक महिन्याचा रिचार्ज फ्री देणार...
15
जीएसटी परिषदेबाबत पहिली बातमी! २५०० रुपयांच्या आतील चप्पल, बुटांवर ५ टक्के कर : रिपोर्ट
16
...तोपर्यंत उपोषण, शासन निर्णय फाडणे, होळी करणे थांबवा; छगन भुजबळांचं OBC कार्यकर्त्यांना आवाहन
17
प्रमोशन दिलं नाही, महिला कर्मचारी बॉसवर संतापली! 'असा' बदला घेतला की सगळेच अवाक् झाले
18
सावधान! ChatGPT सोबत गप्पा मारताय? तुमची प्रत्येक गोष्ट ऐकू शकतात पोलीस
19
येत्या काही महिन्यात देशात राजकीय बदल होणार; ‘हायड्रोजन बॉम्ब’चा अर्थ काय? २ नेत्यांचे मोठे दावे
20
उत्तर प्रदेशात एक खाजगी बस पाण्यात उलटली, एका मुलासह दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी

दर्यापूर तालुक्यात हजार हेक्टरमधील पिके पाण्यात

By admin | Updated: August 11, 2016 00:02 IST

जुलै-आॅगस्ट महिन्यात सातत्याने सुरू असलेल्या पावसामुळे तालुक्यातील पिकांना जोरदार फटका बसला आहे.

संततधार पावसाचा परिणाम : शेतकरी पुन्हा चिंताग्रस्त, दुबार पेरणीचे संकटदर्यापूर : जुलै-आॅगस्ट महिन्यात सातत्याने सुरू असलेल्या पावसामुळे तालुक्यातील पिकांना जोरदार फटका बसला आहे. पावसामुळे तालुक्यातील सुमारे हजार हेक्टर जमिनीतील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. दर्यापूर तालुक्यातील विविध गावांमध्ये पिकांची हानी झाली आहे.तुरीचे पीक शेतकऱ्यांच्या हातून गेले आहे. यावर्षी जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून पावसाने जोरदार हजेरी लावली होती. त्यातही आॅगस्ट महिन्याच्या सुरवातीला संततधार व पाऊस सुरु आहे. परिणामी सखल भागातील पिके पाण्याखाली गेली आहेत. नदी-नाल्यांना पूर आला. याचा फटका तालुक्यातील नदीकाठावरील गावांमधील शेतीला बसला. तालुक्यातील सुमारे ७०० ते ८०० हेक्टरमधील पिकांचे पूर व पावसामुळे नुकसान झाले. खारपाणपट्ट्यात पावसाच्या पाण्याचा निचरा न झाल्याने पिके अद्यापही पाण्याखाली आहेत. बऱ्याच ठिकाणी शेतात पाणी साचल्याने आंतरमशागत करणे शक्य नाही. जुलै महिन्यात काही ठिकाणी अतिवृष्टीसदृश पाऊस झाला आहे. त्यामुळे तूर, मूग व अन्य पिकांची प्रचंड हानी झाली आहे. तब्बल ६०० हेक्टरमधील पिके पाण्याखाली आहेत.काही ठिकाणी पुरामुळे पिके खरडून गेली आहेत. तालुक्यात मागील तीन वर्षांपासून पाऊस कमी झाल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त होते. चालू वर्षात मात्र २ टक्क्याने अधिक पाऊस झाला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदाचा पाऊस अधिक आहे. तालुक्यातील खल्लार सर्कलमधील अकरा गावांमध्ये पंधरा दिवसांपूर्वी वडाळी नाल्याचा बांध फुटल्याने खल्लार, सांगवा, घडा, महिमापूर, उपराई व इतर गावांमधील शेतांमध्ये पाणी शिरल्याने हजारो हेक्टर पिकांचे नुकसान झाले आहे. शासनामार्फत ज्यांच्या शेतातील पिकांचे नुकसान झाले आहे त्यांचा सर्वे करण्यात आला. परंतु अद्याप शेतकऱ्यांना कोणतीही मदत मिळाली नाही. दुबार पेरणीची वेळ शेतकऱ्यांवर आल्याने त्यांना तातडीने शासनाकडून मदत अपेक्षित आहे. परिसरातील पीकहानीचे सर्वेक्षण करून तातडीने नुकसानभरपाई देण्याच्या मागणीसाठी विविध संघटनांच्यावतीने उपविभागीय अधिकारी व तहसीलदारांना निवेदन देण्यात आले होते. परंतु अद्यापही कोणतीच मदत मिळाली नाही, त्यामुळे तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाले आहेत. मदतीची मागणी केली जात आहे. (शहर प्रतिनिधी)माझ्या एकूण ५ एकर शेतातील पीक वडाळी नाल्याचा बांध फुटल्याने खरडून गेले. परंतु शासनामार्फत अद्यापही कोणतीच मदत मिळालेली नाही. तातडीने मदत मिळावी. -राजू कराडे,शेतकरीतालुक्यात ज्याठिकाणी पावसामुळे पिकांचे नुकसान झाले, त्याची पाहणी करण्यात आली आहे. पुढील अहवाल शासनाकडे पाठविण्यात आला आहे. -पी.डी.लंगोटे, कृषी अधिकारी, अचलपूर