शहरं
Join us  
Trending Stories
1
Sikandar Shaikh Arrested: महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला अटक, पंजाब पोलिसांची कारवाई; प्रकरण काय?
2
"सारखं फुकटात, सारखं फुकटात; सारखं माफ, कसं व्हायचं"; कर्जमाफीवरून अजित पवारांनी शेतकऱ्यांना सुनावलं
3
"रुपाली चाकणकरांनी एका बाईला आमदाराविरोधात व्हिडीओ तयार लावलेला, ती बाई..."; रुपाली ठोंबरेंचा स्फोटक आरोप
4
किंमती वाढल्या, भारतात सोने खरेदी वाढली की कमी झाली? अवाक् करणारी आकडेवारी
5
Babar Azam World Record: धावांसाठी संघर्ष करणाऱ्या बाबर आझमनं मोडला हिटमॅन रोहित शर्माचा विश्वविक्रम
6
"मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देते"; रुपाली ठोंबरे पाटलांचा पोलीस ठाण्यात संताप, माधवी खंडाळकर प्रकरण तापलं
7
वडिलांचे निधन, स्वतः आयसीयूत दाखल... तरीही स्वप्न केले पूर्ण ! राज्यसेवा परीक्षेत नागपूरची प्रगती अनुसूचित जातीतून आली राज्यात पहिली
8
"नाव लक्षात ठेवा!" नेहमी तिखट भाष्य करणाऱ्या इंग्लिश क्रिकेटरचं जेमी संदर्भातील 'ते' ट्विट व्हायरल
9
संजय राऊतांची प्रकृती बिघाड, २ महिने उपचार घेणार; PM नरेंद्र मोदींनी घेतली दखल, म्हणाले...
10
टोयोटा २०३० पर्यंत भारतात १५ नवीन वाहने आणणार, दोन नवीन SUV अन् एक पिकअप ट्रकचा समावेश
11
Smartphones: नवा फोन घेण्याचा विचार करताय? थांबा! बाजारात येतायेत एकापेक्षा एक भारी फोन
12
धक्कादायक! विद्यापीठात महिलेवर लैंगित अत्याचार; बंगळुरू विद्यापीठाच्या प्राध्यापकाला अटक
13
"काहीतरी गडबड आहे!" आरोपी रोहित आर्यवर कसा आला संशय?; प्रत्यक्षदर्शीने सांगितली रेस्क्यू कहाणी
14
मेट्रो ठेकेदार जे. कुमार इन्फ्राला ५ लाखाचा दंड; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर एमएमआरडीएचा दणका
15
Dularchand Yadav: दुलारचंद यादव यांचा मृत्यू गोळी लागल्याने झाला नाही, डॉक्टरांचा मोठा खुलासा!
16
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
17
मोबाईलचे जीपीएस ठरू शकते तुमच्या डिजिटल अरेस्टचे कारण; आयआयटी दिल्लीत महत्त्वाचा रिसर्च
18
बॉर्डर पार करुन एकाचा भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न; BSF जवानांनी पाकिस्तानी नागरिकाला पकडले
19
ICC T20 Rankings : टीम इंडियाचं अव्वलस्थान धोक्यात! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर दुहेरी आव्हान
20
"मी त्याला काही वर्षांपूर्वीही भेटले होते...:, रोहित आर्याबद्दल रुचिता जाधवचा खुलासा, ९ मिनिटं...

दर्यापूर बुजले अतिक्रमणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2017 23:46 IST

गत अनेक वर्षांपासून प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्यामुळे शहरात अतिक्रमण वाढले आहे. याचा फटका सर्वसामान्य जनतेला बसत असल्यामुळे शहरातून पायी चालणेही कठीण झाले आहे.

ठळक मुद्देकधी राबविणार मोहिम? : नागरिक त्रस्त, अधिकारी सुस्त; पायी चालणेही कठीण

लोकमत न्यूज नेटवर्कदर्यापूर : गत अनेक वर्षांपासून प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्यामुळे शहरात अतिक्रमण वाढले आहे. याचा फटका सर्वसामान्य जनतेला बसत असल्यामुळे शहरातून पायी चालणेही कठीण झाले आहे. मार्गाचे नूतनीकरण केल्यावर अतिक्रमण कमी होण्याची आशा नागरिकांना होती, ती मात्र फोल ठरली आहे.शहरातील प्रमुख वर्दळीचे स्थान असलेल्या बसस्थानक परिसरात नियबाह्य पार्किंग केली जाते. यामुळे वाहनचालकांना व पादचाºयांना चालताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. बसस्थानकाच्या चारही बाजूने भिंत घालण्यात आली आहे. यामुळे खासगी दुकानदारांनी थेट रस्त्यावर माल विक्री करणे सुरू केला आहे. अकोट मार्गावरील आदर्श हायस्कूल, रत्नाबाई कन्या शाळेसमोरसुद्धा खासगी विक्रेत्यांनी आपली दुकाने थाटून वाहतुकीला अडथळा निर्माण केला आहे. यासंदर्भात शहरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी तक्रारी केल्यावरही कारवाई केली नाही. त्यामुळे विद्यार्थी, नागरिकांना रस्त्यावरून चालणेही कठीण झाले आहे. शहरातील विविध मार्गावर प्रवासी वाहने, काळीपिळी व मालवाहतुकीच्या गाड्या मधोमध उभ्या असतात. त्यामुळे शहरात दर दोन दिवसांनी अपघात घडतात. हे अतिक्रमण सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हद्दीत येत असले तरी नगर पालिकेच्या हद्दीतील सामान्य जनतेला याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.कारवाई केल्यास राजकीय हस्तक्षेपअतिक्रमणावर प्रशासनाने कारवाई सुरू केल्यास स्थानिक राजकारणी यात आपला रस दाखविण्यास सुरुवात करतात. यामुळे प्रशासनाला माघार घ्यावी लागते. यामुळे अतिक्रमण करणारे धाजावत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. यामुळे प्रशासन सर्वसामान्य जनतेसाठी आहे की राजकारण्यांचे दुकान चालविण्यासाठी, असा सवाल यानिमित्ताने नागरिक करीत आहेत.फळविक्रेत्यांचेही अतिक्रमणबसस्थानक परिसरात फळविक्रेते मुख्य रस्त्यापर्यंत हातगाड्या लावतात. त्यामुळे वाहतुकीला मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होतो. याठिकाणी फळ विक्रेत्यांनी संपूर्ण रस्ताच व्यापला आहे. यामुळे येथे कोणत्याही क्षणी मोठा अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.शहरातील मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्रव्यवहार केलेला आहे. अतिक्रमण काढण्यासाठी नगर पालिकेतर्फे पूर्ण मदत केली जाईल.- गीता वंजारी,मुख्याधिकारी, दर्यापूरकाही महिन्यांपूर्वी शाळेसमोर असलेल्या अतिक्रमणामुळे एका विद्यार्थिनीचा मृत्यू झाला. त्यामुळे शाळेसमोरील अतिक्रमण काढण्यासाठी पत्रव्यवहार केला. मात्र, अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही.- राजेंद्र गायगोले,मुख्याध्यापक, रत्नाबाई राठी कन्या शाळा, दर्यापूर