शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
2
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
3
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
4
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
5
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
6
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
7
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
8
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
9
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
10
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
13
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
14
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
15
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
16
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
18
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
19
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
20
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!

दर्यापूर बुजले अतिक्रमणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2017 23:46 IST

गत अनेक वर्षांपासून प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्यामुळे शहरात अतिक्रमण वाढले आहे. याचा फटका सर्वसामान्य जनतेला बसत असल्यामुळे शहरातून पायी चालणेही कठीण झाले आहे.

ठळक मुद्देकधी राबविणार मोहिम? : नागरिक त्रस्त, अधिकारी सुस्त; पायी चालणेही कठीण

लोकमत न्यूज नेटवर्कदर्यापूर : गत अनेक वर्षांपासून प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्यामुळे शहरात अतिक्रमण वाढले आहे. याचा फटका सर्वसामान्य जनतेला बसत असल्यामुळे शहरातून पायी चालणेही कठीण झाले आहे. मार्गाचे नूतनीकरण केल्यावर अतिक्रमण कमी होण्याची आशा नागरिकांना होती, ती मात्र फोल ठरली आहे.शहरातील प्रमुख वर्दळीचे स्थान असलेल्या बसस्थानक परिसरात नियबाह्य पार्किंग केली जाते. यामुळे वाहनचालकांना व पादचाºयांना चालताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. बसस्थानकाच्या चारही बाजूने भिंत घालण्यात आली आहे. यामुळे खासगी दुकानदारांनी थेट रस्त्यावर माल विक्री करणे सुरू केला आहे. अकोट मार्गावरील आदर्श हायस्कूल, रत्नाबाई कन्या शाळेसमोरसुद्धा खासगी विक्रेत्यांनी आपली दुकाने थाटून वाहतुकीला अडथळा निर्माण केला आहे. यासंदर्भात शहरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी तक्रारी केल्यावरही कारवाई केली नाही. त्यामुळे विद्यार्थी, नागरिकांना रस्त्यावरून चालणेही कठीण झाले आहे. शहरातील विविध मार्गावर प्रवासी वाहने, काळीपिळी व मालवाहतुकीच्या गाड्या मधोमध उभ्या असतात. त्यामुळे शहरात दर दोन दिवसांनी अपघात घडतात. हे अतिक्रमण सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हद्दीत येत असले तरी नगर पालिकेच्या हद्दीतील सामान्य जनतेला याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.कारवाई केल्यास राजकीय हस्तक्षेपअतिक्रमणावर प्रशासनाने कारवाई सुरू केल्यास स्थानिक राजकारणी यात आपला रस दाखविण्यास सुरुवात करतात. यामुळे प्रशासनाला माघार घ्यावी लागते. यामुळे अतिक्रमण करणारे धाजावत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. यामुळे प्रशासन सर्वसामान्य जनतेसाठी आहे की राजकारण्यांचे दुकान चालविण्यासाठी, असा सवाल यानिमित्ताने नागरिक करीत आहेत.फळविक्रेत्यांचेही अतिक्रमणबसस्थानक परिसरात फळविक्रेते मुख्य रस्त्यापर्यंत हातगाड्या लावतात. त्यामुळे वाहतुकीला मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होतो. याठिकाणी फळ विक्रेत्यांनी संपूर्ण रस्ताच व्यापला आहे. यामुळे येथे कोणत्याही क्षणी मोठा अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.शहरातील मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्रव्यवहार केलेला आहे. अतिक्रमण काढण्यासाठी नगर पालिकेतर्फे पूर्ण मदत केली जाईल.- गीता वंजारी,मुख्याधिकारी, दर्यापूरकाही महिन्यांपूर्वी शाळेसमोर असलेल्या अतिक्रमणामुळे एका विद्यार्थिनीचा मृत्यू झाला. त्यामुळे शाळेसमोरील अतिक्रमण काढण्यासाठी पत्रव्यवहार केला. मात्र, अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही.- राजेंद्र गायगोले,मुख्याध्यापक, रत्नाबाई राठी कन्या शाळा, दर्यापूर