शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

दर्यापूर बुजले अतिक्रमणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2017 23:46 IST

गत अनेक वर्षांपासून प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्यामुळे शहरात अतिक्रमण वाढले आहे. याचा फटका सर्वसामान्य जनतेला बसत असल्यामुळे शहरातून पायी चालणेही कठीण झाले आहे.

ठळक मुद्देकधी राबविणार मोहिम? : नागरिक त्रस्त, अधिकारी सुस्त; पायी चालणेही कठीण

लोकमत न्यूज नेटवर्कदर्यापूर : गत अनेक वर्षांपासून प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्यामुळे शहरात अतिक्रमण वाढले आहे. याचा फटका सर्वसामान्य जनतेला बसत असल्यामुळे शहरातून पायी चालणेही कठीण झाले आहे. मार्गाचे नूतनीकरण केल्यावर अतिक्रमण कमी होण्याची आशा नागरिकांना होती, ती मात्र फोल ठरली आहे.शहरातील प्रमुख वर्दळीचे स्थान असलेल्या बसस्थानक परिसरात नियबाह्य पार्किंग केली जाते. यामुळे वाहनचालकांना व पादचाºयांना चालताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. बसस्थानकाच्या चारही बाजूने भिंत घालण्यात आली आहे. यामुळे खासगी दुकानदारांनी थेट रस्त्यावर माल विक्री करणे सुरू केला आहे. अकोट मार्गावरील आदर्श हायस्कूल, रत्नाबाई कन्या शाळेसमोरसुद्धा खासगी विक्रेत्यांनी आपली दुकाने थाटून वाहतुकीला अडथळा निर्माण केला आहे. यासंदर्भात शहरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी तक्रारी केल्यावरही कारवाई केली नाही. त्यामुळे विद्यार्थी, नागरिकांना रस्त्यावरून चालणेही कठीण झाले आहे. शहरातील विविध मार्गावर प्रवासी वाहने, काळीपिळी व मालवाहतुकीच्या गाड्या मधोमध उभ्या असतात. त्यामुळे शहरात दर दोन दिवसांनी अपघात घडतात. हे अतिक्रमण सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हद्दीत येत असले तरी नगर पालिकेच्या हद्दीतील सामान्य जनतेला याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.कारवाई केल्यास राजकीय हस्तक्षेपअतिक्रमणावर प्रशासनाने कारवाई सुरू केल्यास स्थानिक राजकारणी यात आपला रस दाखविण्यास सुरुवात करतात. यामुळे प्रशासनाला माघार घ्यावी लागते. यामुळे अतिक्रमण करणारे धाजावत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. यामुळे प्रशासन सर्वसामान्य जनतेसाठी आहे की राजकारण्यांचे दुकान चालविण्यासाठी, असा सवाल यानिमित्ताने नागरिक करीत आहेत.फळविक्रेत्यांचेही अतिक्रमणबसस्थानक परिसरात फळविक्रेते मुख्य रस्त्यापर्यंत हातगाड्या लावतात. त्यामुळे वाहतुकीला मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होतो. याठिकाणी फळ विक्रेत्यांनी संपूर्ण रस्ताच व्यापला आहे. यामुळे येथे कोणत्याही क्षणी मोठा अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.शहरातील मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्रव्यवहार केलेला आहे. अतिक्रमण काढण्यासाठी नगर पालिकेतर्फे पूर्ण मदत केली जाईल.- गीता वंजारी,मुख्याधिकारी, दर्यापूरकाही महिन्यांपूर्वी शाळेसमोर असलेल्या अतिक्रमणामुळे एका विद्यार्थिनीचा मृत्यू झाला. त्यामुळे शाळेसमोरील अतिक्रमण काढण्यासाठी पत्रव्यवहार केला. मात्र, अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही.- राजेंद्र गायगोले,मुख्याध्यापक, रत्नाबाई राठी कन्या शाळा, दर्यापूर