शहरं
Join us  
Trending Stories
1
सात दिवसांपूर्वीच भुजबळांना कळविण्यात आलं होतं; पडद्यामागे नेमकं काय काय घडलं? या तीन नेत्यांनी घेतला निर्णय
2
केवळ योगायोग, की...? दोन लागोपाठ अपयशांनी इस्रोने चिंतन आणि आत्मपरीक्षण करण्याची गरज
3
छगन भुजबळ अचानक कसे चर्चेत आले? आज मंत्रिपदाची शपथ घेणार, असे जाहीर केले...
4
फ्रान्सचा बांगलादेशला झटका; मॅक्रो यांनी युनूस यांच्यासोबत द्विपक्षीय बैठकीस दिला नकार
5
ठाकरेंचे ५० टक्के माजी नगरसेवक शिंदेसेनेत; बैठकाच नाही, नाराजांची नाराजी कळणार कधी अन् कशी?
6
भारताने तुर्कस्तानला धडा शिकवला! चॉकलेट, फळं, कपड्यांपासून ते पर्यटन; 'या' गोष्टी झाल्या बॉयकॉट
7
"आत्महत्या करण्यापूर्वी तिने सूरजला फोन करुन.."; जिया खानच्या मृत्यूनंतर १२ वर्षांनी झरीना वहाब यांचा मोठा खुलासा
8
भारत-पाक संघर्षात ड्रॅगनची खेळी, खरा विजय चीनचा झाल्याचा दावा; करणार तगडी कमाई, पण कशी?
9
“सरकारचे POKवर स्पष्ट धोरण नाही, युद्धकाळात पारदर्शकता राखायला हवी होती”: पृथ्वीराज चव्हाण
10
बॉलिवूडकर गप्प, पण सई ताम्हणकरने थेट घेतलं पाकिस्तानचं नाव; म्हणाली, "ज्यांना सरळ भाषा..."
11
'तोपर्यंत ऑपरेशन सिंदूर संपणार नाही...', भारताचे पाकिस्तानला सडेतोड उत्तर!
12
'अण्वस्त्रांचा मारा करू, असा इशारा पाकने दिला नव्हता; लढाई पारंपरिक पद्धतीनेच'
13
बंदी असतानाही गुजरातमध्ये दारूचा महापूर; वर्षाला १५,००० कोटींची दारू येतेय तरी कुठून?
14
'ऑपरेशन सिंदूर'च्या यशाबद्दल रेल्वेने तिकिटावर छापला PM मोदींचा फोटो; म्हणाले, "हा तर शौर्याला सलाम..."
15
भारत धर्मशाळा नाही की कुणीही यावे अन् स्थायिक व्हावे, आश्रयाच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाचे परखड मत
16
"पहलगाम हल्ला दहशतवाद्यांची नाही, पर्यटकांची चूक"; पोलिसांसमोर ज्योती काय काय म्हणाली?
17
१२ वर्षांनी मोठ्या अभिनेत्यासोबत बोहल्यावर चढणार सई, लग्नाची तारीखही केली जाहीर
18
पाकच्या विजयासाठी चीनने लावता होता पूर्ण जोर, भारताची हेरगिरीही केली; अहवालातून माहिती समोर
19
“अमेरिका तहव्वूर राणाचे प्रत्यार्पण करू शकते, तर पाक सईद-लख्वी भारताला का देऊ शकत नाही”
20
आजचे राशीभविष्य २० मे २०२५ : थकबाकी मिळण्यास, व्यापारातील वसुली होण्यास उत्तम दिवस

उघडे रेल्वे फाटक अपघातासाठी धोक्याचे

By admin | Updated: October 16, 2015 00:40 IST

रेल्वे फाटकावर अपघात होण्याच्या घटना बघता रेल्वे प्रशासनातर्फे फाटकावरील गार्डची नियुक्ती केली आहे.

रेल्वे प्रशासनाचा हलगर्जीपणा : नागरिकांमध्ये संतापसुमित हरकूट चांदूरबाजाररेल्वे फाटकावर अपघात होण्याच्या घटना बघता रेल्वे प्रशासनातर्फे फाटकावरील गार्डची नियुक्ती केली आहे. मात्र नरखेड मार्गावरील चांदूरबाजार तालुक्यातील बेलोरा मार्गावरील रेल्वे फाटकावर गार्ड उपस्थित राहत नसल्याने भविष्यात मोठ्या अपघाताची शक्यता आहे. अमरावती-नरखेड मार्गावर दररोज ६-७ रेल्वे गा्या धावतात. तसेच देशाची राजधानी दिल्ली येथे जान्याकरिता सर्वात ‘शॉर्टकट’ मार्ग असलेला नरखेड मार्गावरुन इंदौर-यशवंतपुर, जयपूर-सिंकदराबाद, काचीकुडा एक्सप्रेससह अनेक मालगाड्या धावतात. या मार्गावर अमरावती, चांदूरबाजार, मोर्शी, वरुड येथून मोठ्या प्रमाणात प्रवासी दररोज प्रवास करतात. यामुळे हा रेल्वेमार्ग फार वर्दळीचा आहे. तसेच नागपूरहून लांब पल्ल्याचा धावणाऱ्या गाड्या त्या मार्गावर अपघात झाल्यास या नरखेड मार्गावरून वळविल्या जातात.अशातच या मार्गावरून अनेक लहान मोठ्या गावांतून ही रेल्वे जाते. तेव्हा या गावातील रेल्वे क्रॉसिंगच्या फाटकावर गार्डची नियुक्ती केलेली असते हे गार्ड सिग्नल मिळताच रेल्वे फाटक बंद करतात. वर रस्त्यावरीव वाहतूक थांबवितात. ज्यामुळे होणारा अपघात टळतो. परंतु बेलोरा रेल्वे क्रॉसिंगवर गार्डची नियुक्ती नसल्याने या मार्गावरून धावणाऱ्या गाड्या जेव्हा ये- जा करतात तेव्हा सदर रेल्वे फाटक उघडेच असते व वाहतूकही सर्रास सुरुच असते. या क्रॉसिंगवरून शाळकरी विद्यार्थी, चरणारी गुरे, नागरिक दिवसभर ये-जा करतात. मात्र रेल्वे फाटक उघडे असल्याने रेल्वे सध्या येण्याचे गृहीत धरून वाहतूक सुरुच असते.