शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

आटणारे जलस्रोत वन्यप्राण्यांच्या मुळावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2019 22:55 IST

यंदा वणव्याची तीव्रता आणि कोरडे जलस्त्रोत वन्य प्राण्यांच्या मृत्युसाठी कारणीभूत ठरणार असल्याची भीती व्यक्त होत आहे.

ठळक मुद्देउन्हाळ्याची चाहूल : वन्यप्राण्यांची गावांकडे धाव, डबक्यांवर तहान

अमोल कोहळे।लोकमत न्यूज नेटवर्कपोहरा बंदी : यंदा वणव्याची तीव्रता आणि कोरडे जलस्त्रोत वन्य प्राण्यांच्या मृत्युसाठी कारणीभूत ठरणार असल्याची भीती व्यक्त होत आहे.वणव्याची धग सोसवणारी नसल्याने वन्यप्राणी वेगाने जंगलाबाहेर पडण्यास सुरूवात होते. जंगलातील जलस्त्रोत आटल्याने हरणांवर त्याचा सर्वाधिक दुष्परिणाम होणार आहे. पोहरा जंगलात हरिणांची संख्या सर्वाधिक असून त्यांना वणव्याची भीती आहे. उन्हाळ्यापुर्वीच जलस्त्रोत आटू लागल्याने उन्हाळ्यात वन्यप्राण्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागणार आहे. त्यामुळे यावर्षी पोहरा-चिरोडी जंगलात नैसर्गिक पाणवठ्यासह कृत्रिम पाणवठे निर्माण करण्यात आले आहेत. वन्यप्राणी पाण्यासाठी वनक्षेत्राबाहेर जाऊ नये अशी व्यवस्था करण्यात आली आहे.यंदा पाऊस अतिशय कमी झाल्यामुळे नैसर्गिक स्त्रोत पूर्णपणे आटले. पाणवठ्यांमध्ये वर्षभर पाणी राहायचे. ते देखिल आता पूर्णपणे आटलेले आहेत. कृत्रिम पाणवठे तयार करण्यात आले. त्याचा थोडा आधार झाला पण तरीही तो पुरेसा नाही कारण काही पाणवठे पुन्हा आटले आहेत. वन्यप्राण्यांच्या ठिकाणानुसार पाणवठे असायला हवेत, मात्र तशी व्यवस्था नसल्याने वन्यप्राणी जंगलाबाहेर पडण्याची भीती आहे.जंगलाबाहेर भटकंतीउन्हाळ्याची चाहूल लागल्याने जंगलातील वन्यप्राण्यांसाठी वनविभागाने सिमेंटचे चार पाणवठयांची निर्मिती केली आहे. मात्र त्या पाणवठ्यावर वन्यप्राण्यांची तहान भागणे कठीण झाल्याने वन्यप्राणी जंगलाशेजारच्या गावपरिसरातील डबक्यात तृष्णा भागवित आहे. उन्हाळ्याच्या सुरूवातीलाच त्यांची जंगलाबाहेर भटकंती सुरु झाली आहे. सोमवारी वरूडानजिक हे चित्र दिसले.