शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

जिल्हा परिषदेत डेंग्यू अळ्यांच्या धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:10 IST

डासांची उत्पत्तिस्थाने, कुठे कूलरमध्ये पाणी, कुठे ड्रेनेज तुंबले अमरावती : डेंग्यू व अन्य आजारांना कारणीभूत असलेल्या डासांची उत्पत्तीस्थाने म्हणजे ...

डासांची उत्पत्तिस्थाने, कुठे कूलरमध्ये पाणी, कुठे ड्रेनेज तुंबले

अमरावती : डेंग्यू व अन्य आजारांना कारणीभूत असलेल्या डासांची उत्पत्तीस्थाने म्हणजे साचून राहिलेले पाणी. त्यामुळे पाणी साचू देऊ नका, असे आवाहन जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडून करण्यात येते. मात्र, स्वत:च्या दिव्याखालचा अंधार प्रशासकीय यंत्रणेला दिसत नाही, अशी स्थिती लोकमतने शुक्रवारी जिल्हा परिषदेत केलेल्या निरीक्षणात दिसून आले. यात काही विभागात कूलर सुरू असून यात डासांची पैदास निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

कूलरच्या टपात पाणी साचू देऊ नका. कचरा वेळोवेळी साफ करा. अडगळीचे सामान पडू देऊ नका. यात पाणी साठवून डेंग्यूचा आजार होण्याचा धोका असतो, असे प्रशासन वारंवार सांगत आहे. डेंग्यूचा प्रसार रोखण्यासाठी सूक्ष्म नियोजन करण्याचे निर्देश जिल्हा परिषद प्रशासनाने दिले. यासाठी नुकताच मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी नुकताच आढावा घेऊन उपाययोजना करण्याच्या सूचनाही दिल्या. मात्र, खुद्द जिल्हा परिषदेच्या आरोग्य, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या कार्यालयात कूलरच्या टाक्यात पाणी साचून असल्याचे चित्र दिसून आले, तर बांधकाम विभागाच्या बाजूला सांडपाणी वाहून नेणारी नाल्या तुडुंब भरल्याचे दिसले. ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या बाजूलाच कचऱ्याचे ढीगही तसेच पडून आहेत. ज्या ठिकाणाहून प्रशासनाचा कारभार चालतो, त्याची प्रचिती जिल्हा परिषद कार्यालयात दिसून आली.

बॉक्स

गावखेड्यात घरोघरी तपासणी, मग इकडे का नाही?

डेंग्यूचा डास सकाळी व सायंकाळच्या सुमारास डंख मारत असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. एडिस इजिप्टाय या डासापासून डेंग्यू आणि चिकनगुनियाही होऊ शकतो. हा डास स्वच्छ पाण्यात होतो. आतापर्यंत कूलरच्या पाण्यात त्याची उत्पत्ती अधिक प्रमाणात झाल्याचे आरोग्य विभागाने केलेल्या निष्कर्षात पुढे आले आहे. शहरासह जिल्ह्यात काही दिवसापासून डेंग्यू रुग्णांची संख्या वाढलेली आहे. त्यामुळे संबंधित गावात सर्वेक्षणाचे काम घरोघरी सुरू आहे. असे असताना गावात सर्वेक्षण मात्र कार्यालयात कोण करणार, हा प्रश्न उपस्थित होत आहे.

बॉक्स

अस्वच्छता प्रशासनाला का दिसत नाही?

जिल्हा परिषद कार्यालयात सांडपाणी वाहून नेणाऱ्या नालीमध्ये पाणी तुंबले. आजूबाजूला कचरा पडला. या दूषित पाण्यामुळे विविध संसर्गजन्य आजारांचा धोका निर्माण झाला आहे. जिल्हा परिषद कार्यालयातील कूलरमध्ये पाणी साचले आहे. याचबरोबर अडगळीच्या साहित्यात पाणी साचून डेंग्यूचे डास वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. ज्या विभागात लगत कूलर लागले आहेत त्या कूलरमधील पाणीही कित्येक दिवसांपासून बदललेले नाही. नागरिकांना दिसणारी ही अस्वच्छता अधिकारी-कर्मचाऱ्यांना दिसत नाही का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.