शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
6
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
7
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
8
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
9
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
10
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
11
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
12
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
13
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
14
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
15
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
16
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
17
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
18
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
19
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
20
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी

संत्र्याला पवारांनीच केले शापित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2019 23:14 IST

विदर्भातील संत्रामध्ये एक प्रकारचे अ‍ॅसिड असल्याचे शरद पवार बोलले अन् तेव्हापासून संत्र्यांचे मार्केट कोलमडले. बीयात अ‍ॅसिड आहे हे मान्य. पण, संत्रा खायला गोड आहे. मात्र, विदर्भात उत्पादित होणाऱ्या संत्र्याला शरद पवारांनी शापित केले.

ठळक मुद्देप्रकाश आंबेडकर : वंचित बहुजन अघाडीच्या महासभेत आरोप

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : विदर्भातील संत्रामध्ये एक प्रकारचे अ‍ॅसिड असल्याचे शरद पवार बोलले अन् तेव्हापासून संत्र्यांचे मार्केट कोलमडले. बीयात अ‍ॅसिड आहे हे मान्य. पण, संत्रा खायला गोड आहे. मात्र, विदर्भात उत्पादित होणाऱ्या संत्र्याला शरद पवारांनी शापित केले. पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांनी स्वत:च्या स्वार्थासाठी विदर्भातील सगळे मार्केट संपविले, असा आरोप भारिप-बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी येथे केला.स्थानिक सायन्सकोर मैदानावर रविवारी वंचित बहुजन आघाडीची सभा घेण्यात आली. यावेळी ते बोलत प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर एमआयएमचे आ. वारीस खॉ पठाण, भारीप-बमसंचे प्रदेशाध्यक्ष अशोक सोनोने, माजी मंत्री दशरथ भांडे, सरचिटणीस गुणवंत देवपारे, युसूफ पिजांनी, सागर डबरासे, नदीम सिद्दीकी, बालमुकूंद भिरडी, नंदेश अंबाडकर, निकोसे, डी.एच मेश्राम, विद्या वानखडे, सलाउद्दीन, राजेंद्र महाडोळे, मो. नजीम, संध्या वाघोडे, वंदना तायडे, विपीन अलोकार, कॅप्टन खंडारे, नंदू सहारे, श्रद्धा चव्हाण, संतोष रहाटे आदी उपस्थित होते.संस्कृतीच्या ठेकेदारांचे अधिवेशन बडनेरा येथे सुरू आहे. कुठल्या संस्कृतीचे ठेकेदार आहात? ते तर पहिले सांगा. बहुजन ब्रिटीशांशी लढला हा त्यांचा गुन्हा. मात्र, संस्कृतीचे ठेकेदार तेव्हा ब्रिटिशांच्या मांडीवर बसले. त्यांना मदत केली आणि आज आपल्याला शहानपणा शिकवायला लागले. कोण राष्ट्रवादी अन् कोण राष्ट्रद्रोही. आता यांना आम्ही विचारतो येथील तेली, माळी, धनगर, पारधी अशा किती जनांना तिकीट देणार आहात. आम्ही सत्तेवर आल्यास मनुला हद्दपार करू. मनुचे पालन करणारे मानवतेच्या विरोधात आहे. कायद्याच्या विरोधात बोलला तर मोका लावू, बंड करण्याची भाषा बोललात तर नक्षलवादी अन् मुसलमानांना दहशतवादी ठरविल्या जाते. देश काय तुमच्या बापाचा आहे काय, असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी केला.एक संधी काय मिळाली की, सगळे मोडीत काढायला निघाले. काँग्रेसवाल्यांपेक्षा महाचोर भाजपचे सरकार आहे. ज्या नागरिकांनी गॅसची सबसिडी सोडली, त्यामधून सरकारला १८ हजार कोटी रूपये वर्षाला मिळाले. हे चार वर्षांचे पैसे गेले कुठे, असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी केला.निवडणुका जवळ आल्या की, सोनिया गांधी अन् जावयाच्या भानगडी काढता. त्यांना अटक का करत नाही, हे सांगा. नुसते नाव मलीन करण्याचा प्रकार असल्याचे ते म्हणाले. विवाहसंस्था मोडीत काढायला हे सरकार निघाले आहे. त्याची सुरूवात मुस्लिमांपासून केली. सरकारने विवाहाला गुन्हेगारीचे स्वरूप आणले असल्याचा आरोप आंबेडकरांनी केला. पक्षाचे प्रदेश सरचिटणीस गुणवंत देवपारे यांची अमरावती येथे व यवतमाळ लोकसभेसाठी प्रवीण पवार यांच्या उमेदवारीवर त्यांनी शिक्कामोर्तब केले. यावेळी एमआयएमचे आ. वारीस खॉ पठाण व पदाधिकाºयांनी मार्गदर्शन केले. सभेला हजारो नागरिक उपस्थित होते. दुपारी शासकीय विश्रामगृहात प्रकाश आंबेडकर यांनी भारिप-बहुजन महासंघाच्या पदाधिकाºयांशी संवाद साधला.मेट्रोचं मढं कुणावर येणार?हा देश कॉपीकॅट आहे. नकल करणाºया या देशात नितीन गडकरींचा पहिला क्रमांक लागतो. नागपूरच्या ३० लाख लोकसंख्येसाठी १८ ब्रीज बांधले आणि मेट्रो आणली. कुठे गेले, काही दिसले की लहान मुलासारखा मोदींकडे हट्ट करायचा. वेगळा विदर्भ झाल्यावर मेट्रोचं मढं कोणावर येणार? महाराष्ट्रावर की विदर्भावर? मेट्रो चालली तर माणसे कुठे, यासाठी ती डेन्सीटी लागते. असा सवाल आंबेडकरांनी केला.