शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
6
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
7
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
8
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
9
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
10
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
11
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
12
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
13
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
14
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
15
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
16
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
17
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
18
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
19
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
20
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला

शिफारस नसलेली औषध फवारणीने सोयाबीन पिकाचे नुकसान .

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:18 IST

कृषी केद्रचालकावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी अंजनगांव सुर्जी : कापूसतळणी येथील शेतकरी मधुकर देविदास ...

कृषी केद्रचालकावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी

अंजनगांव सुर्जी : कापूसतळणी येथील शेतकरी मधुकर देविदास काळे यांचे सराय मौजे मधील आठ एकर शेतात दि.१७ जूनला पेरणी केलेलं सोयाबीन पिकावर फुलोरा स्थितीत फवारणी केली असता.संपुर्ण फुलोर जळाल्याने शेतकऱ्याचे लाखो रुपयाचे नुकसान झाले असुन कापुसतळणी येथील सागर ॲग्रो सर्विस च्या संचालकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी प्रहारचे उपतालुकाप्रमुख अरुण शेवाणे यांनी केली आहे.

फुलोरा अवस्थेत असलेल्या आठ एकर सोयाबीन पिकांवर फवारणीसाठी शेतकरी मधुकर काळे यांनी सागर अँग्रोमधुन किटकनाशाके घेतली आणी फवारणी केली. सात - आठ दिवसानंतर पिकाची पाहणी केली असता संपूर्ण फुलाची गळ झाल्याचे दिसून आले. ही बाब कीटकनाशक विक्रेता लक्ष्मीकांत राठी यांना सांगितले. परंतु श्री राठी यांनी सदर बाबीकडे जाणून बुजून दुर्लक्ष करून आठ दिवस वेळ मारुण नेल्याचे शेतकऱ्याचे म्हणने आहे. औषध विक्रेता यांनी सदर औषध कंपनीला माहिती देऊन सदर शेताची पाहणी करून शेतकऱ्यांना दिलासा देऊन उपाययोजना करणे अपेक्षित असतांना. किटकनाशक विक्रेत्यांनी तसे केले नाही यावर उपतालुकाप्रमुख अरुण शेवाणे यांनी तालुका कृषी अधिकारी यांना दि.२७/८/२०२१ ला निवेदन दिले आणि दि. ३/९/२०२१ पर्यंत सदर पिकाची पाहणी शास्त्रज्ञां करून दोषींवर कारवाई करणे तसेच शेतकऱ्यांना नुकसान भरपाई पोटी हेक्टरी 30 क्विंटल भरपाई मिळावी अशी मागणी करुण आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्या अनुषंगाने तालुका कृषी अधिकारी यांनी दिनांक २/९/२०२१ ला समिती गठित करण्यात आली या समितीमध्ये डॉ. पंजाबराव कृषी विद्यापीठ अकोला येथील कीटकनाशक शास्त्रज्ञ कु. सोनल नागे, सदस्य तसेच एम .जी .कोरे (ता.कृ.अ.) सदस्य, ए.बी .राठोड (कृ.अ.प.स.) सदस्य सचिव, जी. आर. मोरे (कृ.अ.) एम .एम. जाधव(कृ.स.), तक्रार कर्ता अरुण शेवाणे, औषध विक्रेता लक्ष्मिकांत राठी , आदामा कंपनीचे प्रतिनिधी प्रशांत मोरे,पंच संजय हिंगे, प्रशांत सरदार, गजानन हरणे, शेतकरी सत्यम काळे आदींच्या समक्ष पाहणी झाली. समितीने क्लोरोपायरीफॉस सायपरमेथ्रीन हे औषध सोयाबीन पिकासाठी शिफारशीत नसल्यामुळे सोयाबीन पिकाचा संपूर्ण फुलोऱ्याची गळ झाली आणि भविष्यात उत्पन्न होऊ शकणार नाही अशाप्रकारचा अहवाल दिला. म्हणून औषध विक्रेता व कंपनी यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांचे परवाने रद्द करण्यात यावे व शेतकऱ्यांना 30 क्विंटल ची मदत मिळावी अशी मागणी तक्रार कर्ते अरुण शेवाणे व शेतकऱ्यांनी केली आहे.