शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
3
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
4
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
5
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
6
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
7
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
8
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
9
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
10
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
11
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
12
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
13
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
14
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
15
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
16
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
17
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
18
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
19
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल
20
भारताने दाखवले मोठे मन; पाकिस्तानला पुराबाबत केले सतर्क, ऑपरेशन सिंदूर नंतर पहिल्यांदाच चर्चा

जंगलाच्या आगीचे नुकसान आजही बैलबंडीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:13 IST

अनिल कडू परतवाडा : मेळघाटच्या जंगलाला लागलेल्या आणि लागत असलेल्या आगीत होत असलेले नुकसान वन व वन्यजीव विभागाकडून ...

अनिल कडू

परतवाडा : मेळघाटच्या जंगलाला लागलेल्या आणि लागत असलेल्या आगीत होत असलेले नुकसान वन व वन्यजीव विभागाकडून आजही बैलबंडीत मोजल्या जात आहे. इंग्रजांपासून असलेली ही बैलबंडी वन विभागाने आजही कायम ठेवली आहे.

मेळघाटच्या जंगलाला काही दिवसांत मोठ्या प्रमाणात आगी लागल्या आहेत. यात हजारो हेक्टर जंगल क्षेत्र काळवंडले आहे. मौल्यवान वनसंपदा जळून खाक झाली आहे. वन, वन्यजीव व पर्यावरणीय दृष्टीने यात हानी झाली आहे.

आजही मेळघाटचे जंगल आगीत धगधगत आहे. लागलेली आग विझवायला, आटोक्यात आणायला दोन ते तीन दिवस लागत आहेत. असे असतानाही या आगीत केवळ पाला-पाचोळा, गवत जळाल्याच्या नोंदी वनविभागाच्या रेकॉर्डला नोंदविल्या जात आहेत.

आगीत झालेल्या व होत असलेल्या नुकसानीची वन, वन्यजीव व पर्यावरणीय दृष्टिकोनातून आकडेवारी मांडताना कुठलेही अधिकृत मापदंड वनविभागाकडे नाहीत. प्रत्यक्ष लागलेले आगक्षेत्र, जळालेले जंगलक्षेत्र दुर्लक्षित करून केवळ अंदाजीत आणि तेही निम्म्याहून कमी रेकॉर्डला घेतल्या जात आहे. प्रत्यक्षात जळालेले जंगल क्षेत्र व रेकॉर्डला घेतल्या जात असलेले जंगल क्षेत्र यात मोठी तफावत आढळून येत आहे. दरम्यान जेवढे हेक्टर क्षेत्र दाखविल्या गेले, तेवढ्याच बैलबंड्या पालापाचोळा, गवत जळाल्याचे दाखविण्यापर्यंत मजल गेली आहे. आगीत जळालेल्या पालापाचोळा व गवताची किंमत वनविभागाच्या नजरेत नगण्य आहे.

बॉक्स

आरोपी बेपत्ता

जंगलाला लागत असलेल्या आगी मानवनिर्मित आहेत. त्या नैसर्गिक नाहीत. असे वन व वन्यजीव विभागाचे म्हणणे आहे. त्यामुळे आग लागली की वनगुन्हा नोंदविला जातो. हा वनगुन्हा अज्ञान आरोपीविरुद्ध दाखल केला जातो. पण, या आगीच्या अनुषंगाने अज्ञात आरोपीचा शोध घेण्याचा प्रयत्न केलाच जात नाही. एक-दोन अपवाद वगळता आगीच्या शेकडो वनगुन्ह्यातील मुजरीम आजही बेपत्ता आहेत.